शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मगन संग्रहालयात टकळी सूतयज्ञ

By admin | Updated: March 1, 2015 01:31 IST

महात्मा गांधी, विनोबा भावे, जे.सी. कुमारप्पा अशा अनेक महान व्यक्तिमत्त्वांच्या अस्तित्वाचे एक स्वर्णीम वलय वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.

वर्धा : महात्मा गांधी, विनोबा भावे, जे.सी. कुमारप्पा अशा अनेक महान व्यक्तिमत्त्वांच्या अस्तित्वाचे एक स्वर्णीम वलय वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र आंदोलनात चरखा, सूत व कपडा या गोष्टींचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. या बाबी विद्यार्थी जीवनात प्रत्यक्ष उतरवण्यासाठी स्थापना दिनानिमित्त मगन सग्रहालयात विद्यार्थ्यांसाठी सूत यज्ञाचे आयोजन करण्यात आले़ या सूतयज्ञामध्ये सुशील हिंमतसिंगका विद्यालय, वर्धा कन्या विद्यालय, आनंद मेघे विद्यालय बोरगाव मेघे, जगजीवनराम विद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी विद्यालयाच्या एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला़ या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर २०१४ पासून टकळीवर सूत कातण्याचे प्रशिक्षण मगन संग्रहालयाकडून देण्यात आले. महात्मा गांधींनी सूतकताईसाठी टकळी व चरखा या दोन माध्यमांचा उपयोग केला होता. यात टकळी हे साधन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुलभ व सहज हाताळण्याजोगे असल्याने मगन संग्रहालयाकडून विद्यार्थ्यांना टकळी व पेळू उपलब्ध करून देण्यात आले होते़ एकूण १ हजार ते १५०० पेळू सर्व विद्यार्थ्यांना नियमित वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यानी कातलेल्या सूताच्या एकूण ४५ ते ५० गुंडयांचा निवेदिता निलयम या संस्थेद्वारा कापड तयार करण्यात आला. या प्रथम सत्र सूतयज्ञाचा समापन कार्यक्रम मगन संग्रहालयाच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता, ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष करुणा फुटाणे पवनार, आश्रमाच्या भाविनी बहण, खल्लारकर, निवेदिता निलयमचे योगेश वाघ व विणकर महिला आदींच्या उपस्थितीत पार पडला़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी १०० विद्यार्थ्यांना खादीचा रूमाल भेट देण्यात आला. मगन संग्रहालयाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे़ कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन डॉ. विभा गुप्ता यांच्या मार्गदर्शनात सुषमा सोनटक्के यांनी केले़ कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता मगन संग्रहालयाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)