शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

संततधारेने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: August 14, 2015 02:24 IST

गत दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे.

वर्धा : गत दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. सेलू तालुक्यातील खैरी गावाचा दोन दिवसांपासून जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे. सतत तीन दिवसांपासून पुलावरून पाणी वाहत आहे. मजरा रस्त्यावरूनही पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे. सर्व नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने ठेंगणे व जुने पूल पाण्याखाली आले आहेत. अप्पर व निम्न वर्धा प्रकल्पांतून पाणी सोडण्यात आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आकोली : धाम नदीच्या काठावर वसलेल्या खैरी गावाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पुलावरून पाणी असल्याने मंगळवारपासून शाळा कुलूपबंद आहे. आरोग्य व मुलभूत गरजांची चणचण भासत आहे. गावातील कामे ठप्प झाली असून जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.सोमवार रात्रीपासून पुलावरून पाणी वाहत आहे. गुरूवारीही पूल पाण्याखालीच असल्याने रहदारी ठप्प आहे. सततच्या पावसामुळे नदीचा जलस्तर वाढीवर आहे. पुराने १५०० लोकसंख्येच्या गावाला वेठीस धरल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. खैरी येथे चार वर्ग असून दोन शिक्षक आहेत. दरवर्षीचा अनुभव असताना शिक्षक पावसाळ्यात मुख्यालयी राहणे टाळतात. यामुळे शाळा कुलूपबंद ठेवण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थ सांगतात. शाळा बंद असल्याची माहिती शिक्षकांनी शिक्षण विभागापासून दडवून ठेवल्याचेही समोर आले आहे. गावातील रुग्णांचे हाल होत आहे. अनेक घरांत रुग्ण आहे. सुंदरा बावणे (५५) या महिलेला हृदयविकाराचा झटका आला; पण दैव बलवत्तर म्हणून त्या वाचल्या. भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री थांबली. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली.(वार्ताहर)पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यताआर्वी - काही क्षणाच्या विश्रांतीनंतर गुरूवारी सकाळपासून तालुक्यात संततधार सुरू झाला. या सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पुराच्या पावसाने बाकळी, आडनदी, वर्धा व इतर नदी-नाल्यांना मोठा पूर आला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातच गुरूवारी सकाळपासून तालुक्यात संततधार पावसाची सुरूवात झाल्याने याही आठवड्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. संततधार पावसाने फुलावर आलेल्या सोयाबीन पिकावर विपरित परिणाम होत आहे. कपाशी आणि तूर पिकालाही सततच्या पावसाचा चांगलाच फटका बसत आहे. तालुक्यातील शेत शिवारात जागोजागी पावसामुळे डबके साचले आहे.मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बाकळी, आड, वर्धा, आर्वीतील लेंडी नाला व गाव नाल्याच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ गेट उघडण्यात आले होते. मंगळवारी १५ तर बुधवारी पुन्हा ३१ दरवाजे उघडण्यात आले होते. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास निम्न वर्धा प्रकल्पाची सर्व दारे अधिक प्रमाणात उघडावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून डबके साचले आहे. संततधार पाऊस व अन्य समस्या यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)