शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

असंसर्गजन्य आजारांत महिलांची आघाडी

By admin | Updated: April 19, 2015 01:51 IST

जिल्ह्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत राबविलेल्या असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला़ ...

प्रभाकर शहाकार ल्ल पुलगावजिल्ह्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत राबविलेल्या असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला़ लाखावर लोकांनी तपासणी करून घेतली. प्राप्त अहवालात मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग या आजाराचे रुग्ण पुरुषांपेक्षा महिलाच अधिक दिसून आल्या़ नागरिकांचा प्रतिसाद मिळत असताना रोगनियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जात असल्याने सर्वच बुचकाळ्यात आहेत़देवळी तालुक्यात नाचणगाव परिसरात मधुमेह, रक्तदाब, कर्करोग या आजाराचे फेबु्रवारी व मार्च या केवळ दोन महिन्यांत ५९५ महिला व ३८२ पुरूष या तीन आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे़ या अहवालानंतर असंसर्गजन्य आजाराने पुरुषांपेक्षा महिलांना अधिक प्रमाणात ग्रासल्याचे वास्तव असताना संबंधित यंत्रणा या कार्यक्रमात कार्यरत कर्मचाऱ्यांना मासिक वेतनासाठी वेठीस धरत असल्याचे दिसते़ शिवाय आता ३१ मार्च रोजी काही कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्टात आणल्या. परिणामी, एप्रिल २०१५ च्या पंधरवड्यात कर्मचाऱ्याअभावी काही प्राथमिक आरोग्य केंद्रांत असंसर्गजन्य रोगनियंत्रणाचा कार्यक्रम ठप्प आहे. नागरिकांना निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात आॅगस्ट २०११ पासून कार्यरत झाला; पण दीड-दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत हा कार्यक्रम चालू झाला. यात जवळपास सर्वच आरोग्य केंद्रावर एनसीडी अंतर्गत एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, असे दोन तर ग्रामीण रुग्णालयात या दोघांव्यतिरिक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री आॅपरेटर, असे चार वा अधिक कर्मचारी तैनात झाले. या नॉन कॉन्टीजियस डिसीज कार्यक्रमात ३० वर्षावरील ओपीडीमध्ये येणाऱ्या संपूर्ण रुग्णांची रक्तशर्करा तपासणी व उच्च रक्तदाब तपासणी मोफत केली जात होती. मधुमेह, रक्तदाब, रक्तशर्करा, कर्करोग, पक्षाघात, हृदयरोग या आजारांची तपासणी संबंधित कर्मचारी करीत होत़ संदर्भसेवेसाठी काही संशयित गंभीर रुग्णांना सेवाग्राम रुग्णालयात चिकित्सा व उपचारासाठी पाठविले जात होते़ या कार्यक्रमांतर्गत रुग्ण तपासणीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. एका आरोग्य केंद्राच्या फेब्रु-मार्चच्या तपासणी अहवालावरून महिलांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग या आजारांचा आलेख वाढता आहे़ असे असताना ग्रामीण भागात रुग्णांना मोफत मिळणारी रक्तदाब तपासणी व रक्तशर्करा तपासणी सुविधा कर्मचाऱ्यांअभावी खंडीत झाली. परिणामी या कार्यक्रमात कार्यरत कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट आले़ शिवाय ग्रामस्थ रुग्णांची कुचंबना होत आहे़