शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

असंसर्गजन्य आजारांत महिलांची आघाडी

By admin | Updated: April 19, 2015 01:51 IST

जिल्ह्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत राबविलेल्या असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला़ ...

प्रभाकर शहाकार ल्ल पुलगावजिल्ह्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत राबविलेल्या असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला़ लाखावर लोकांनी तपासणी करून घेतली. प्राप्त अहवालात मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग या आजाराचे रुग्ण पुरुषांपेक्षा महिलाच अधिक दिसून आल्या़ नागरिकांचा प्रतिसाद मिळत असताना रोगनियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जात असल्याने सर्वच बुचकाळ्यात आहेत़देवळी तालुक्यात नाचणगाव परिसरात मधुमेह, रक्तदाब, कर्करोग या आजाराचे फेबु्रवारी व मार्च या केवळ दोन महिन्यांत ५९५ महिला व ३८२ पुरूष या तीन आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे़ या अहवालानंतर असंसर्गजन्य आजाराने पुरुषांपेक्षा महिलांना अधिक प्रमाणात ग्रासल्याचे वास्तव असताना संबंधित यंत्रणा या कार्यक्रमात कार्यरत कर्मचाऱ्यांना मासिक वेतनासाठी वेठीस धरत असल्याचे दिसते़ शिवाय आता ३१ मार्च रोजी काही कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्टात आणल्या. परिणामी, एप्रिल २०१५ च्या पंधरवड्यात कर्मचाऱ्याअभावी काही प्राथमिक आरोग्य केंद्रांत असंसर्गजन्य रोगनियंत्रणाचा कार्यक्रम ठप्प आहे. नागरिकांना निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात आॅगस्ट २०११ पासून कार्यरत झाला; पण दीड-दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत हा कार्यक्रम चालू झाला. यात जवळपास सर्वच आरोग्य केंद्रावर एनसीडी अंतर्गत एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, असे दोन तर ग्रामीण रुग्णालयात या दोघांव्यतिरिक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री आॅपरेटर, असे चार वा अधिक कर्मचारी तैनात झाले. या नॉन कॉन्टीजियस डिसीज कार्यक्रमात ३० वर्षावरील ओपीडीमध्ये येणाऱ्या संपूर्ण रुग्णांची रक्तशर्करा तपासणी व उच्च रक्तदाब तपासणी मोफत केली जात होती. मधुमेह, रक्तदाब, रक्तशर्करा, कर्करोग, पक्षाघात, हृदयरोग या आजारांची तपासणी संबंधित कर्मचारी करीत होत़ संदर्भसेवेसाठी काही संशयित गंभीर रुग्णांना सेवाग्राम रुग्णालयात चिकित्सा व उपचारासाठी पाठविले जात होते़ या कार्यक्रमांतर्गत रुग्ण तपासणीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. एका आरोग्य केंद्राच्या फेब्रु-मार्चच्या तपासणी अहवालावरून महिलांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग या आजारांचा आलेख वाढता आहे़ असे असताना ग्रामीण भागात रुग्णांना मोफत मिळणारी रक्तदाब तपासणी व रक्तशर्करा तपासणी सुविधा कर्मचाऱ्यांअभावी खंडीत झाली. परिणामी या कार्यक्रमात कार्यरत कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट आले़ शिवाय ग्रामस्थ रुग्णांची कुचंबना होत आहे़