शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतीपयोगी तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे

By admin | Updated: April 2, 2017 00:50 IST

देशाचा कणा शेतीक्षेत्र आहे. सुमारे ७० टक्के जनतेची उपजीविका शेतीवर आहे. अद्यावत तंत्रज्ञानाने उत्तुंग झेप घेतली आहे.

सोहम पंड्या : बा.दे. अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीयस्तरीय टेक्नॉवेन्झा मॉडेल मेकिंग स्पर्धा वर्धा : देशाचा कणा शेतीक्षेत्र आहे. सुमारे ७० टक्के जनतेची उपजीविका शेतीवर आहे. अद्यावत तंत्रज्ञानाने उत्तुंग झेप घेतली आहे. सर्व क्षेत्रात अगदी तळागाळापर्यंत तंत्रज्ञान पोहोचले. तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्र विस्तारत असताना शेतीक्षेत्र मागे राहता कामा नये. अद्यावत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचले पाहिजे. एवढ्यावरच न थांबता तंत्रज्ञानाचे भरीव योगदान शेतीसाठी असले पाहिजे. शेतीपयोगी तंत्रज्ञान विकसित झाले तर शेतीक्षेत्र प्रगत होईल. शेतकरी बांधवांची प्रगती होईल, असे मत ग्रामपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूरचे संचालक डॉ. सोहम पंड्या यांनी व्यक्त केले. सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महा.मध्ये आयोजित राष्ट्रीयस्तरीय टेक्नॉवेन्झा मॉडेल मेकिंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, डॉ. डी.आर. दांडेकर, टेक्नॉवेन्झाचे समन्वयक प्रा. आर.डी. कदम, प्रा. स्वप्नील धांदे, प्रा. हिंगणीकर उपस्थित होते. डॉ. पंड्या पूढे म्हणाले की, टेक्नॉवेन्झाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता निर्माण होते. नवनिर्मितीची बिजे येथूनच रोवली जातात. समाज व राष्ट्रपयोगी हित जोपासून अधिक संशोधन व्हावे. अभियंत्यांकडून हिच अपेक्षा असते. क्रिएटिव्हीटी महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून नवीन संकल्पना, तंत्रज्ञान रूजविण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या मॉडेलमधून त्यांची संशोधनवृत्ती दिसत असल्याचे सांगितले. टेक्नॉवेन्झामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नवनिर्मितीला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संयोजक प्रा. कदम यांनी दहा वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम बदलत्या तंत्रज्ञानाला आयाम देणारा असून विद्यार्थ्यांत सृजनशिलता, संशोधनवृत्ती निर्माण करणारा आहे, असे सांगितले. ही स्पर्धा मेगा व मिनी प्रोजेक्ट दोन गटात घेण्यात आली तर सर्कीट मेकींग स्पर्धाही झाली. यानंतर उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टची पाहणी करीत त्यांचे कौतुक केले. मेगा प्रोजेक्ट गटात इइइ ग्रुपमध्ये पराग नेवारे, रूपाली राणे, पायल दरणे, ऋतुजा कदारे, रोहीत ठावकार, सुयश भुसारी, योगेश पांडे, अक्षय रोकडे यांनी तयार केलेल्या ‘नोवेल टेक्नॉलॉजी आॅफ इफेक्टीव्ह फॉरमिंग सोलर पॅनल’ या प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. सीएसआयटी ग्रुपमध्ये ‘अटेन्डस ट्रेकींग अ‍ॅण्ड मोनेटरिंग सिस्टम युजिंग वाय फाय’ हा प्रोजेक्ट तयार करणारे आकाश झाडे, प्रतिक ठाकरे, स्वर झालटे, स्रेहल नानोटे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. मिनी प्रोजेक्ट इ.इ. ग्रुपमध्ये ‘लायब्ररी मॉनेटरिंग सिस्टम’ तर सीएसआयटी ग्रुपमध्ये ‘पॅरालेल थॅर्मल स्टेबॅलिटी इंटर लॉकिंग युजिंग इंटरनेट आॅफ थिंग्ज’ हा प्रोजेक्ट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सर्कीट मेकींगमध्ये पंकज दारपुरे, प्रितम इखार या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण, प्रा. इंदुरकर, प्रा. भिंगरे, प्रा. मांडवगणे, डॉ. दांडेकर, प्रा. ठाकरे, प्रा. धांदे, प्रा. श्रीवास्तव, डॉ. इंगळे, प्रा. सायंकार, प्रा. वारकर, प्रा. दगडकर, प्रा. भावरकर, प्रा. बागडे, प्रा. खत्री, प्रा. बोबडे, प्रा. कोरडे, प्रा. सदावर्ते, प्रा. झिलपे, प्रा. बोबडे, प्रा. गावंडे आदींनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)