शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

फळेच देताहेत अनेक आजारांना निमंत्रण

By admin | Updated: April 12, 2015 01:56 IST

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत राखण्यासाठी डॉक्टर जलयुक्त फळे खाण्याचा सल्ला देतात.

वर्धा : उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत राखण्यासाठी डॉक्टर जलयुक्त फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र हल्ली फळे पिकविण्याच्या पद्धतीमुळे फळे खाणे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आहे. अन्न व औषधी प्रशासनाने फळे पिकविण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा उपयोग करणाऱ्याविरध्द दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.पोषक आहार म्हणून अनेकजण नियमित फळाचे सेवन करतात. पण या फळांचे सेवन करणे नागरिकांना विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरताना दिसते. काही विक्रेते नैसर्गिक फळ पिकविण्याच्या पध्दतीला फाटा देऊन फळे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा सर्रास वापर करू लागले आहे. आंबा, केळी, चिक्कू व टरबूज आदी फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनाचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाईडमुळे अवघ्या २४ तासांत आंबे व केळी पिकविली जातात. पण ही फळे जीवितास तेवढीच घातक ठरू शकतात. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना ही घातक फळे निमंत्रण देणारी ठरू शकतात. यामुळे पोटात आग होणे, चक्कर येणे, पोट बिघडणे, अशी दुखणे या फळ आहारामुळे होऊ शकतात. सगळीकडे रासायनिक प्रक्रिया केलेली फळे सर्रास विकली जात आहे. कच्ची फळे रसायनात बुडवून काही तास ठेवल्यास ही फळे पिवळी होतात. पण त्यात गोडवा राहत नाही. फळ विक्रेत्यांकडून मात्र ती ‘डायबटीक’केळी असल्याची बतावणी करून ग्राहकांना विकली जात असल्याची माहिती आहे. या बतावणीला ग्राहकही बळी पडत असल्याचे दिसते. पौष्टिक फळ म्हणून केळीला वर्षभर मागणी असते. दर कितीही वाढले तरीही केळीची विक्री हमखास होते. याप्रकारे रासायनिक फळांचा वापर करून फळे पिकविणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध विभागाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. याबाबत संबंधीत विभागाने दखल घेत कारवाई करून करण्याची मागणी आहे. नागरिकांत जागृती करण्याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)