शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

फळेच देताहेत अनेक आजारांना निमंत्रण

By admin | Updated: April 12, 2015 01:56 IST

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत राखण्यासाठी डॉक्टर जलयुक्त फळे खाण्याचा सल्ला देतात.

वर्धा : उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत राखण्यासाठी डॉक्टर जलयुक्त फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र हल्ली फळे पिकविण्याच्या पद्धतीमुळे फळे खाणे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आहे. अन्न व औषधी प्रशासनाने फळे पिकविण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा उपयोग करणाऱ्याविरध्द दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.पोषक आहार म्हणून अनेकजण नियमित फळाचे सेवन करतात. पण या फळांचे सेवन करणे नागरिकांना विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरताना दिसते. काही विक्रेते नैसर्गिक फळ पिकविण्याच्या पध्दतीला फाटा देऊन फळे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा सर्रास वापर करू लागले आहे. आंबा, केळी, चिक्कू व टरबूज आदी फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनाचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाईडमुळे अवघ्या २४ तासांत आंबे व केळी पिकविली जातात. पण ही फळे जीवितास तेवढीच घातक ठरू शकतात. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना ही घातक फळे निमंत्रण देणारी ठरू शकतात. यामुळे पोटात आग होणे, चक्कर येणे, पोट बिघडणे, अशी दुखणे या फळ आहारामुळे होऊ शकतात. सगळीकडे रासायनिक प्रक्रिया केलेली फळे सर्रास विकली जात आहे. कच्ची फळे रसायनात बुडवून काही तास ठेवल्यास ही फळे पिवळी होतात. पण त्यात गोडवा राहत नाही. फळ विक्रेत्यांकडून मात्र ती ‘डायबटीक’केळी असल्याची बतावणी करून ग्राहकांना विकली जात असल्याची माहिती आहे. या बतावणीला ग्राहकही बळी पडत असल्याचे दिसते. पौष्टिक फळ म्हणून केळीला वर्षभर मागणी असते. दर कितीही वाढले तरीही केळीची विक्री हमखास होते. याप्रकारे रासायनिक फळांचा वापर करून फळे पिकविणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध विभागाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. याबाबत संबंधीत विभागाने दखल घेत कारवाई करून करण्याची मागणी आहे. नागरिकांत जागृती करण्याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)