शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

फळेच देताहेत अनेक आजारांना निमंत्रण

By admin | Updated: April 12, 2015 01:56 IST

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत राखण्यासाठी डॉक्टर जलयुक्त फळे खाण्याचा सल्ला देतात.

वर्धा : उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत राखण्यासाठी डॉक्टर जलयुक्त फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र हल्ली फळे पिकविण्याच्या पद्धतीमुळे फळे खाणे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आहे. अन्न व औषधी प्रशासनाने फळे पिकविण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा उपयोग करणाऱ्याविरध्द दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.पोषक आहार म्हणून अनेकजण नियमित फळाचे सेवन करतात. पण या फळांचे सेवन करणे नागरिकांना विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरताना दिसते. काही विक्रेते नैसर्गिक फळ पिकविण्याच्या पध्दतीला फाटा देऊन फळे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा सर्रास वापर करू लागले आहे. आंबा, केळी, चिक्कू व टरबूज आदी फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनाचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाईडमुळे अवघ्या २४ तासांत आंबे व केळी पिकविली जातात. पण ही फळे जीवितास तेवढीच घातक ठरू शकतात. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना ही घातक फळे निमंत्रण देणारी ठरू शकतात. यामुळे पोटात आग होणे, चक्कर येणे, पोट बिघडणे, अशी दुखणे या फळ आहारामुळे होऊ शकतात. सगळीकडे रासायनिक प्रक्रिया केलेली फळे सर्रास विकली जात आहे. कच्ची फळे रसायनात बुडवून काही तास ठेवल्यास ही फळे पिवळी होतात. पण त्यात गोडवा राहत नाही. फळ विक्रेत्यांकडून मात्र ती ‘डायबटीक’केळी असल्याची बतावणी करून ग्राहकांना विकली जात असल्याची माहिती आहे. या बतावणीला ग्राहकही बळी पडत असल्याचे दिसते. पौष्टिक फळ म्हणून केळीला वर्षभर मागणी असते. दर कितीही वाढले तरीही केळीची विक्री हमखास होते. याप्रकारे रासायनिक फळांचा वापर करून फळे पिकविणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध विभागाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. याबाबत संबंधीत विभागाने दखल घेत कारवाई करून करण्याची मागणी आहे. नागरिकांत जागृती करण्याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)