शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा कुचकामी

By admin | Updated: October 25, 2014 01:42 IST

ग्रामीण भागात असलेली इंटरनेट सुविधा नेहमीच खंडीत होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे.

वर्धा : ग्रामीण भागात असलेली इंटरनेट सुविधा नेहमीच खंडीत होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. येथील नागरिकांना एका प्रमाणपत्राकरिता तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. यात त्याची मजुरी जात असून प्रवासाच्या खर्चाचाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या हिंगणघाट पंचायत समितीत ७६ च्या जवळपास ग्रामपंचायत कार्यालये आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणकासह आॅनलाईन सेवा पुरविण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. सर्व प्रमाणपत्रे आॅनलाईन देण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहे. मात्र संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दुर्लक्षाने आॅनलाईन सेवेचे तिनतेरा वाजले आहे. यामुळे प्रमाणपत्रासाठी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी व नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्रे घ्यावे लागतात. यासाठी नागरिकांना खर्च येत असल्याने संगणकीय प्रमाणपत्र ग्रामीण भागासाठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. वेणी येथील मेश्राम यांच्या मुलाला वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी सरपंचाचे प्रमाणपत्र पाहिजे होते; परंतु येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक, टोनर, रिम, पेपर आदी साहित्यासह इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने त्याला अडचणीचा सामना करावा लागला. केवळ ग्रामस्थांनाच नाही तर येथील उपसरपंच कैलास तेलंगे, धनराज ठाकरे, नरेश गंगापारी यांनाही विविध प्रमाणपत्रे पाहिजे होती. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्रे घ्यावी लागली.काही ठिकाणी भेटी दिल्या असता ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक आॅपरेटरच्या घरी वापरण्यात येत आहे. काही ठिकाणी जावे लागत आहे. काही ग्रामपंचायतच्या संगणकचालकांनी झेरॉक्सची दुकाने थाटली आहेत. शासन आम्हाला पगार देत नसल्यामुळे झेरॉक्सच्या माध्यमातून घर खर्च चालवत असल्याचे बोलण्यास येथील कर्मचारी मागे येत नाही. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष हेच एक कारण आहे. हा सर्व प्रकार हिंगणघाट पंचायत समितीमधील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये सुरू असताना आॅनलाईनसेवा कमी आॅफलाइन सेवा सुरू आहे. याकडे गटविकास अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष असून ते या सर्व बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)