शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रेल्वेस्थानक फलकावरील आश्रम स्थापनेची माहिती चुकीची

By admin | Updated: September 2, 2014 23:58 IST

वर्धा रेल्वे स्थानकावर १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या शेगाव येथील भूमीवर आश्रम स्थापन केल्याची नोंद आहे. या फलकावरील माहिती चुकीची आहे़ यातून महात्मा गांधी व त्यांच्या

सेवाग्राम : वर्धा रेल्वे स्थानकावर १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या शेगाव येथील भूमीवर आश्रम स्थापन केल्याची नोंद आहे. या फलकावरील माहिती चुकीची आहे़ यातून महात्मा गांधी व त्यांच्या सेवाग्राम आश्रमाबाबत लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचत असल्याचे दिसते़ यात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे़महात्मा गांधी यांचे शेगाव या गावी १९३६ मध्ये आगमन झाले. या गावाची कल्पना वा येथे येण्याचा गांधीजींचा विचार नव्हता. बापू वर्धेला आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह आले होते. यात मीरा बहन यांचाही समावेश होता. मीरा बहन यांना खेड्याचे आकर्षन व ग्रामीण महिलांसाठी कार्य करण्याची उत्सुकता होती. यामुळे त्या शेगाव या गावी येऊन राहिल्या़ त्या आजारी पडल्याने त्यांना भेटण्यासाठी बापू आले व बजाज यांच्या पेरूच्या बगीच्यात थांबले. गावात सभा झाली़ येथे येऊन राहण्याची व कार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यात बुढा पटेल (गणपतराव चव्हाण) यांनी आपण येथे राहून कार्य करणार, यात आम्हाला आनंद आहे, असे सांगितले. बजाज यांनी आश्रमासाठी एक एकर जमीन दिली़१९३४ मध्ये जमीन दान दिल्याचा पुरावा वा स्पष्टता दिसून येत नाही. बापूंचे सहकारी बलवंत सिंह यांचे ‘बापूकी छाया’ पुस्तक आहे. यात त्यांनी ‘बापूजी शेगाव या गावी आले. ज्या ठिकानावर आता आश्रम आहे, तेथे जमनालाल बजाज यांची शेती होती. त्यातील एक एकर जमीन त्यांनी आश्रमसाठी दिली होती. आदी निवास बनविण्याची जबाबदारी मीरा बहन व माझ्यावर होती, असे नमूद केले़ सेवाग्राम आश्रमातील आद्यनिवास फलकावर ३० एप्रिल १९३६ मध्ये सर्वप्रथम गांधीजी शेगाव येथे आले. पेरूच्या बगिचा व विहिरीजवळ थांबले. त्या ठिकाणी एक साधी झोपडी बनविण्यात आली होती. गावातील लोकांना भेटले. येण्याचा उद्देश त्यांना सांगून चर्चा केली. ५ मे १९३६ रोजी खादी यात्रेला ते रवाना झाले. १६ जून १९३६ मध्ये परत ते सेवाग्राम येथे येऊन राहू लागले.‘पुण्यधाम सेवाग्राम’ हे प्रेमा कंटक यांचे हिंदी पुस्तक आहे़ यात शेगावमध्ये जमनालाल बजाज यांची शेती होती. यातील एक एकर जमीन गांधीजींनी आश्रमच्या उपयोगासाठी घेतली. यावर आश्रमच्या विविध झोपड्यांचे निर्माण कार्य झाले, असे नमूद आहे़ या दोन पुस्तकांतील महितीवरून १९३४ ऐवजी १९३६ मध्ये जमीन दिल्याचे स्पष्ट होते. गांधी सेवा संघाचे अध्यक्ष कनकमल गांधी यांच्या मते आश्रमसाठी जमीन १९३६ मध्ये देण्यात आली़ वर्धा रेल्वे स्थानकावर नोंद चुकीची आहे़ यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले़(वार्ताहर)