शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

रेल्वेस्थानक फलकावरील आश्रम स्थापनेची माहिती चुकीची

By admin | Updated: September 2, 2014 23:58 IST

वर्धा रेल्वे स्थानकावर १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या शेगाव येथील भूमीवर आश्रम स्थापन केल्याची नोंद आहे. या फलकावरील माहिती चुकीची आहे़ यातून महात्मा गांधी व त्यांच्या

सेवाग्राम : वर्धा रेल्वे स्थानकावर १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या शेगाव येथील भूमीवर आश्रम स्थापन केल्याची नोंद आहे. या फलकावरील माहिती चुकीची आहे़ यातून महात्मा गांधी व त्यांच्या सेवाग्राम आश्रमाबाबत लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचत असल्याचे दिसते़ यात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे़महात्मा गांधी यांचे शेगाव या गावी १९३६ मध्ये आगमन झाले. या गावाची कल्पना वा येथे येण्याचा गांधीजींचा विचार नव्हता. बापू वर्धेला आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह आले होते. यात मीरा बहन यांचाही समावेश होता. मीरा बहन यांना खेड्याचे आकर्षन व ग्रामीण महिलांसाठी कार्य करण्याची उत्सुकता होती. यामुळे त्या शेगाव या गावी येऊन राहिल्या़ त्या आजारी पडल्याने त्यांना भेटण्यासाठी बापू आले व बजाज यांच्या पेरूच्या बगीच्यात थांबले. गावात सभा झाली़ येथे येऊन राहण्याची व कार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यात बुढा पटेल (गणपतराव चव्हाण) यांनी आपण येथे राहून कार्य करणार, यात आम्हाला आनंद आहे, असे सांगितले. बजाज यांनी आश्रमासाठी एक एकर जमीन दिली़१९३४ मध्ये जमीन दान दिल्याचा पुरावा वा स्पष्टता दिसून येत नाही. बापूंचे सहकारी बलवंत सिंह यांचे ‘बापूकी छाया’ पुस्तक आहे. यात त्यांनी ‘बापूजी शेगाव या गावी आले. ज्या ठिकानावर आता आश्रम आहे, तेथे जमनालाल बजाज यांची शेती होती. त्यातील एक एकर जमीन त्यांनी आश्रमसाठी दिली होती. आदी निवास बनविण्याची जबाबदारी मीरा बहन व माझ्यावर होती, असे नमूद केले़ सेवाग्राम आश्रमातील आद्यनिवास फलकावर ३० एप्रिल १९३६ मध्ये सर्वप्रथम गांधीजी शेगाव येथे आले. पेरूच्या बगिचा व विहिरीजवळ थांबले. त्या ठिकाणी एक साधी झोपडी बनविण्यात आली होती. गावातील लोकांना भेटले. येण्याचा उद्देश त्यांना सांगून चर्चा केली. ५ मे १९३६ रोजी खादी यात्रेला ते रवाना झाले. १६ जून १९३६ मध्ये परत ते सेवाग्राम येथे येऊन राहू लागले.‘पुण्यधाम सेवाग्राम’ हे प्रेमा कंटक यांचे हिंदी पुस्तक आहे़ यात शेगावमध्ये जमनालाल बजाज यांची शेती होती. यातील एक एकर जमीन गांधीजींनी आश्रमच्या उपयोगासाठी घेतली. यावर आश्रमच्या विविध झोपड्यांचे निर्माण कार्य झाले, असे नमूद आहे़ या दोन पुस्तकांतील महितीवरून १९३४ ऐवजी १९३६ मध्ये जमीन दिल्याचे स्पष्ट होते. गांधी सेवा संघाचे अध्यक्ष कनकमल गांधी यांच्या मते आश्रमसाठी जमीन १९३६ मध्ये देण्यात आली़ वर्धा रेल्वे स्थानकावर नोंद चुकीची आहे़ यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले़(वार्ताहर)