शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

४३४ ग्रा.पं.ला हिरवे कार्ड

By admin | Updated: April 8, 2016 01:49 IST

नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय सर्वेक्षण वर्षातून दोनवेळा करण्यात येते.

संजय मीणा : २,८७५ पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षणवर्धा : नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय सर्वेक्षण वर्षातून दोनवेळा करण्यात येते. पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील ५१४ ग्रामपंचायतींना २ हजार ८७५ स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ४३४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले तर ८० ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरण करून तसेच ब्लिचिंग पावडर असलेलेच पाणी पुरवण्यालाच प्राधान्य देण्यात आल्यामुळे पाणी पिण्या अयोग्य असलेला एकही स्त्रोत नसल्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले नाही. पिण्याच्या पाण्यामुळे ग्रामीण भागात जलजन्य आजार उद्भवू नये यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करून पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीनंतर ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड, पिवळे कार्ड तसेच ज्या स्त्रोतांचे पाणी पिण्या अयोग्य आहे, अशा ग्रामपंचायतीमधील स्त्रोतांना लाल कार्ड देण्यात येते. जिल्ह्यात एकूण ७२५ ठिकाणी नळयोजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. या व्यतिरिक्त १,४०४ हातपंप व ७४५ विहिरी आहेत. या सर्वच स्त्रोताचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ४३४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. येथील पाणी पिण्यायोग्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.या व्यतिरिक्त पिवळे कार्ड देण्यात आलेल्या गावांना त्यांच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)९५ गावांना अस्वच्छ पाणी जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ८० ग्रामपंचायतींना पिवळे कार्डे देण्यात आले आहे. या गावात पुरविण्यात येत असलेले पाणी अशुद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. पाण्याच्या या अशुद्धीकरणाला ठिकठिकाणी होत असलेला पाण्याचा अपव्यय जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. या गावातील पाण्याच्या स्त्रोताजवळ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे दिसून आले आहे. या पिवळ्या कार्डाचे हिरव्या कार्डात रूपांतरित करण्यासाठी संबंधित स्वत:च्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असण्यासोबत फ्लॅटफॉर्म फुटलेला असेल, अनियमित शुद्धीकरण किंवा ब्लिचिंग याकरिता एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणी शुद्धीकरणासाठी जलसुरक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.