शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

उत्खननातील खड्डे झाले ‘गार्बेज झोन’

By admin | Updated: April 2, 2016 02:37 IST

शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे.

टेकड्यांच्या उत्खननामुळे निसर्गाचे दोहन : पिपरी (मेघे), उमरी (मेघे) परिसरातील प्रकारश्रेया केने वर्धाशहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. अनेक वर्षांपासून या टेकड्या पोकलँडच्या सहाय्याने पोखरण्यात येत आहे. त्यामुळे येथे या परिसरात मोठमोठे खड्डे नजरेस पडतात. विशेष म्हणजे या खड्ड््यांचा उपयोग आता मंगल कार्यालयांमधील जमा होत असलेला कचरा टाकण्यासाठी होत आहे. त्यामुळे इतिहासजमा होत असलेल्या टेकड्या आणि यातील खड्ड्यांमधील कचरा एक नवीनच समस्या निर्माण होत आहे. नैसर्गिक संसाधनावर मानवी वस्तीचे होत असलेले अतिक्रमण वाढतच आहे. कुठलाही परिसर हा सर्वत्र सपाट नसतो. कुठे तो उंचसखल तर कुठे मैदानी असतो. यामुळे भूभागाचे संतुलन कायम राहते. या उंच भागालाच आपण टेकड्या, जास्त उंच भागाला पर्वत तर केवळ मातीच्या उंच भागाला गढी असे संबोधले जाते. नैसर्गिकदृष्ट्या त्याची निर्मिती झाल्याने निसर्गाचे संतुलन राखले जाते. परंतु मानवी शिरकाव जंगलांपर्यंत झाल्याने मानवी वस्तीबाहेर असलेल्या या टेकडी आणि गढी शहरात, गावांत दाखल झाली. त्यांच्याभोवताल वस्त्यांची संख्या वाढू लागली. घरांच्या बांधकामाकरिता या टेकड्यांना पोखरुन मुरूम आणि गढींमधील माती उपयोगात आणल्या जाऊ लागली. याचे प्रमाण वाढल्याने यावर निर्बंध लादण्यात आले. तसेच यामुळे संबंधित प्रशासनाला महसूलही मिळाला. हे उत्खनन मात्र या टेकड्यांच्या मुळावर उठले असून त्यामुळेही या टेकड्यांचे अतोनात दोहन होत आहे. वर्धा शहरानजिक पिपरी (मेघे) आणि उमरी(मेघे) हा परिसर टेकड्यांनी व्यापला आहे. या टेकड्यांचा मुरुमाचा उपयोग घराच्या बांधकामात जोत्यात भराईसाठी केला जातो. परिणामी अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात मुरुम मिळवून त्याचा उपयोग वाढला आहे. यासाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. त्यामुळे या दोन्ही परिसरात टेकड्या खोदल्या गेल्याने मोठमोठ खड्डे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांचा उपयोग आता शहरातील मंगल कार्यालयातील दुर्गंधीयुक्त प्लास्टिक कचरा टाकण्यासाठी होत आहे. हा कचरा खड्ड्यात लवकर सडत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. परिणामी निसर्गाचे दोन्ही प्रकारे दोहन होत आहे. या अवैध उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गढ्या होताहेत इतिहासजमापूर्वी अनेक गावे गढ्यांची गावे म्हणून ओलखली जात. पण कालौघात घरांच्या अतिक्रमणामुळे यातील माती खोदून नेल्यामुळे तर कधी गुप्तधनाच्या हव्यासापोटी गढ्यांचे उत्खनन होत राहिले. परिणामी गढ्या नामशेष होत आहेत. ग्रामीण भागात आजही गढ्यांचे उरलेसुरले अवशेष आपल्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत. या गढ्यांचे संवर्धन करण्याची आज गरज असून त्याकरिता उपाय करणेही महत्त्वाचे आहे टेकड्या व गढ्यांच्या निर्मिती ही नैसर्गिकरित्या होत असते. त्यामुळे निसर्गाचे संतुलन कायम राहते. गावांतील गढ्यादेखील नद्यांच्या आसपास आढळतात. त्यामुळे गावात नदीच्या पुराचे पाणी शिरत नाहीदिवसेंदिवस या गढ्याचे दोहन होत असल्याने पुराला अटकाव करणारी ही नैसर्गिक यंत्रणाच नष्ट होत आहे. याचा परिणामही ग्रामीण भागातील नागरिक सोसत आहे. टेकड्यांमुळे भूजल पातळी कायम राहते. पण अवैध उत्खननाने भूजल पातळी देखील खालावत आहे.