शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उत्खननातील खड्डे झाले ‘गार्बेज झोन’

By admin | Updated: April 2, 2016 02:37 IST

शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे.

टेकड्यांच्या उत्खननामुळे निसर्गाचे दोहन : पिपरी (मेघे), उमरी (मेघे) परिसरातील प्रकारश्रेया केने वर्धाशहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. अनेक वर्षांपासून या टेकड्या पोकलँडच्या सहाय्याने पोखरण्यात येत आहे. त्यामुळे येथे या परिसरात मोठमोठे खड्डे नजरेस पडतात. विशेष म्हणजे या खड्ड््यांचा उपयोग आता मंगल कार्यालयांमधील जमा होत असलेला कचरा टाकण्यासाठी होत आहे. त्यामुळे इतिहासजमा होत असलेल्या टेकड्या आणि यातील खड्ड्यांमधील कचरा एक नवीनच समस्या निर्माण होत आहे. नैसर्गिक संसाधनावर मानवी वस्तीचे होत असलेले अतिक्रमण वाढतच आहे. कुठलाही परिसर हा सर्वत्र सपाट नसतो. कुठे तो उंचसखल तर कुठे मैदानी असतो. यामुळे भूभागाचे संतुलन कायम राहते. या उंच भागालाच आपण टेकड्या, जास्त उंच भागाला पर्वत तर केवळ मातीच्या उंच भागाला गढी असे संबोधले जाते. नैसर्गिकदृष्ट्या त्याची निर्मिती झाल्याने निसर्गाचे संतुलन राखले जाते. परंतु मानवी शिरकाव जंगलांपर्यंत झाल्याने मानवी वस्तीबाहेर असलेल्या या टेकडी आणि गढी शहरात, गावांत दाखल झाली. त्यांच्याभोवताल वस्त्यांची संख्या वाढू लागली. घरांच्या बांधकामाकरिता या टेकड्यांना पोखरुन मुरूम आणि गढींमधील माती उपयोगात आणल्या जाऊ लागली. याचे प्रमाण वाढल्याने यावर निर्बंध लादण्यात आले. तसेच यामुळे संबंधित प्रशासनाला महसूलही मिळाला. हे उत्खनन मात्र या टेकड्यांच्या मुळावर उठले असून त्यामुळेही या टेकड्यांचे अतोनात दोहन होत आहे. वर्धा शहरानजिक पिपरी (मेघे) आणि उमरी(मेघे) हा परिसर टेकड्यांनी व्यापला आहे. या टेकड्यांचा मुरुमाचा उपयोग घराच्या बांधकामात जोत्यात भराईसाठी केला जातो. परिणामी अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात मुरुम मिळवून त्याचा उपयोग वाढला आहे. यासाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. त्यामुळे या दोन्ही परिसरात टेकड्या खोदल्या गेल्याने मोठमोठ खड्डे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांचा उपयोग आता शहरातील मंगल कार्यालयातील दुर्गंधीयुक्त प्लास्टिक कचरा टाकण्यासाठी होत आहे. हा कचरा खड्ड्यात लवकर सडत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. परिणामी निसर्गाचे दोन्ही प्रकारे दोहन होत आहे. या अवैध उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गढ्या होताहेत इतिहासजमापूर्वी अनेक गावे गढ्यांची गावे म्हणून ओलखली जात. पण कालौघात घरांच्या अतिक्रमणामुळे यातील माती खोदून नेल्यामुळे तर कधी गुप्तधनाच्या हव्यासापोटी गढ्यांचे उत्खनन होत राहिले. परिणामी गढ्या नामशेष होत आहेत. ग्रामीण भागात आजही गढ्यांचे उरलेसुरले अवशेष आपल्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत. या गढ्यांचे संवर्धन करण्याची आज गरज असून त्याकरिता उपाय करणेही महत्त्वाचे आहे टेकड्या व गढ्यांच्या निर्मिती ही नैसर्गिकरित्या होत असते. त्यामुळे निसर्गाचे संतुलन कायम राहते. गावांतील गढ्यादेखील नद्यांच्या आसपास आढळतात. त्यामुळे गावात नदीच्या पुराचे पाणी शिरत नाहीदिवसेंदिवस या गढ्याचे दोहन होत असल्याने पुराला अटकाव करणारी ही नैसर्गिक यंत्रणाच नष्ट होत आहे. याचा परिणामही ग्रामीण भागातील नागरिक सोसत आहे. टेकड्यांमुळे भूजल पातळी कायम राहते. पण अवैध उत्खननाने भूजल पातळी देखील खालावत आहे.