शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

‘गांधी सेवा संघ’ झाला ९१ वर्षांचा

By admin | Updated: July 12, 2014 23:49 IST

महात्मा गांधी जिवंत असताना त्यांच्या नावाने स्थापना करण्यात आलेली एकमेव संस्था म्हणजे गांधी सेवा संघ होय! १३ जुलै १९२३ रोजी स्थापना झालेल्या या संस्थेला आज ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत़

दिलीप चव्हाण - सेवाग्राममहात्मा गांधी जिवंत असताना त्यांच्या नावाने स्थापना करण्यात आलेली एकमेव संस्था म्हणजे गांधी सेवा संघ होय! १३ जुलै १९२३ रोजी स्थापना झालेल्या या संस्थेला आज ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत़ गांधीजींच्या सूचनेप्रमाणे अखिल भारतीय रचनात्मक संस्थांच्या नोंदी, दस्तावेज, प्रकाशन, पुस्तक व पत्रिकांचे संकलन आदींचे कार्य करणे आणि त्यांचे सरंक्षण, उत्तम व्यवस्था करून चांगल्या प्रकारचे गं्रथालय उभे करण्याचे काम गांधी सेवा संघाने केले़ यातूनच सर्वोदय विचारांचे अध्ययन होण्यास हातभार लागण्याची दृष्टी होती़ आज ग्रंथालय सुस्थितीत असून आचार्यच्या अध्ययनासाठी या ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथांचा उपयोग घेतला जातो़ या ठिकाणी त्या काळातील सुधारित चरखा, बापूंचे पत्र, साहित्य, वस्तूंचे जतनही करण्यात आलेले आहे़ संघाच्या स्थापनेकरिता वर्धेला पहिली बैठक झाली़ यात चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉ़ राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभार्ई पटेल, श्रीकृष्णदास जाजू आदी उपस्थित होते़ गांधीजींच्या अहिंसात्मक असहयोग कार्यक्रमात पूर्णत: सहभागी कार्यकर्त्यांना मदत करण्याचा उद्देश संघ स्थापनेचा होता़ प्रत्येक सदस्य प्रांतामध्ये शाखा निर्माण करून संघटनात्मक कार्य करण्यासाठी संघाच्या केंद्रीय निधीतून ४० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे ठरले़ जेणेकरून विशाल अखिल भारतीय संघटन उभे राहील़ कार्यकर्त्यांच्या परिवाराची जीवन व्यापनाचीही व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले होते़गांधी सेवा संघ गांधीजींच्या विचारांची महत्त्वपूर्ण रचना मानल्या गेली आहे़ ही संस्था रचनात्मक कार्यासाठी समर्पित होती़ बापूंनी जो विचार व कार्य केले ते सदैव सर्वांसाठी पे्ररणेचे केंद्र बनले़ देशात ज्या रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था होत्या, त्या सर्वांना गांधीजींचे मार्गदर्शन मिळत होते; पण प्रत्येक संस्थेला आपली मर्यादा जाणवू लागली़ संस्थेने आपापले तंत्रज्ञान विकसित केले होते़ तंत्रज्ञानाबरोबर राष्ट्रीय स्तरावर मंत्रबोध करणारे राष्ट्रीय संघटन आवश्यक होते़ जे सर्व रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना एकसुत्रात बांधून योग्य दिशा प्रदान करेल़ सर्वांच्या दृष्टीने गांधी सेवा संघ हिच संस्था योग्य दिशादर्शक व आधारवड वाटायला लागली़ १९३४-३५ मध्ये बापूंनी संघाची धूरा सांभाळली़ त्यांनी याला अहिंसेची प्रयोगशाळा माणून कार्य सुरू केले़ अहिंसक समाज निर्माणासाठी समाजातील हिंसक व रचनात्मक संस्थांचे महत्त्व हळूहळू कमी करणे़ यामुळे मानवाला खरे स्वराज्य प्राप्त होईल़ स्वराज्य म्हणजे स्व वर नियंत्रण आणि स्वत:चे राज्य ‘हिंद स्वराज्य’ मध्ये नव समाजाचे वर्णन बापूंनी केले़ यास पृथ्वीवर प्रत्यक्ष साकार करण्यासाठी रचनात्मक संस्था व गांधी सेवा संघाने कार्य करावे, असा विचार गांधीजींचा होता़ १९४५ मध्ये कारावासातून सुटका झाल्यानंतर अखिल भारत चरखा संघाचे काम सांभाळले़ गावोगावी चरख्याच्या माध्यमातून स्वावलंबन व रोजगार निर्मितीचे काम सुरू केले़ ग्रामोद्योग वाढविला़ गावातील घरोघरी ग्रामोद्योग विकसित झाल्याने अहिंसात्मक प्रवृत्ती वाढीस लागली, अशाप्रकारे घरापासून तर गाव, नंतर देश, स्वावलंबन व स्वाभिमानाकडे वाटचाल करू लागले़ अन्न, वस्त्र निवारा व शिक्षणाची व्यवस्था गावातच व्हावी, याची व्यवस्था संघाकडे सोपविली़ १९४८ मध्ये विशुद्ध आत्मा बापूंची हत्या झाली; पण त्यांचे विचार, कार्य, तत्व आणि रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत़ सेवाग्राम येथील गांधी सेवा संघाचे कार्य ग्रंथालयाच्या माध्यमातून सुरू असून ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले़ बालकांपासून तर वृद्धापर्यंत नियमित अध्ययनासाठी येतात़ आचार्य अध्ययनासाठी मुली व मुले येत असून अनेकांनी याच ग्रंथालयातून आचार्य पदवी प्राप्त केली़ गांधी सेवा संघाचा इतिहास दिशा, प्रेरणा व स्फूर्ती देणारा असला तरी देशाच्या खऱ्या विकासाचे बिजारोपण यातून होऊ शकते़