शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘गांधी सेवा संघ’ झाला ९१ वर्षांचा

By admin | Updated: July 12, 2014 23:49 IST

महात्मा गांधी जिवंत असताना त्यांच्या नावाने स्थापना करण्यात आलेली एकमेव संस्था म्हणजे गांधी सेवा संघ होय! १३ जुलै १९२३ रोजी स्थापना झालेल्या या संस्थेला आज ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत़

दिलीप चव्हाण - सेवाग्राममहात्मा गांधी जिवंत असताना त्यांच्या नावाने स्थापना करण्यात आलेली एकमेव संस्था म्हणजे गांधी सेवा संघ होय! १३ जुलै १९२३ रोजी स्थापना झालेल्या या संस्थेला आज ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत़ गांधीजींच्या सूचनेप्रमाणे अखिल भारतीय रचनात्मक संस्थांच्या नोंदी, दस्तावेज, प्रकाशन, पुस्तक व पत्रिकांचे संकलन आदींचे कार्य करणे आणि त्यांचे सरंक्षण, उत्तम व्यवस्था करून चांगल्या प्रकारचे गं्रथालय उभे करण्याचे काम गांधी सेवा संघाने केले़ यातूनच सर्वोदय विचारांचे अध्ययन होण्यास हातभार लागण्याची दृष्टी होती़ आज ग्रंथालय सुस्थितीत असून आचार्यच्या अध्ययनासाठी या ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथांचा उपयोग घेतला जातो़ या ठिकाणी त्या काळातील सुधारित चरखा, बापूंचे पत्र, साहित्य, वस्तूंचे जतनही करण्यात आलेले आहे़ संघाच्या स्थापनेकरिता वर्धेला पहिली बैठक झाली़ यात चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉ़ राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभार्ई पटेल, श्रीकृष्णदास जाजू आदी उपस्थित होते़ गांधीजींच्या अहिंसात्मक असहयोग कार्यक्रमात पूर्णत: सहभागी कार्यकर्त्यांना मदत करण्याचा उद्देश संघ स्थापनेचा होता़ प्रत्येक सदस्य प्रांतामध्ये शाखा निर्माण करून संघटनात्मक कार्य करण्यासाठी संघाच्या केंद्रीय निधीतून ४० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे ठरले़ जेणेकरून विशाल अखिल भारतीय संघटन उभे राहील़ कार्यकर्त्यांच्या परिवाराची जीवन व्यापनाचीही व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले होते़गांधी सेवा संघ गांधीजींच्या विचारांची महत्त्वपूर्ण रचना मानल्या गेली आहे़ ही संस्था रचनात्मक कार्यासाठी समर्पित होती़ बापूंनी जो विचार व कार्य केले ते सदैव सर्वांसाठी पे्ररणेचे केंद्र बनले़ देशात ज्या रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था होत्या, त्या सर्वांना गांधीजींचे मार्गदर्शन मिळत होते; पण प्रत्येक संस्थेला आपली मर्यादा जाणवू लागली़ संस्थेने आपापले तंत्रज्ञान विकसित केले होते़ तंत्रज्ञानाबरोबर राष्ट्रीय स्तरावर मंत्रबोध करणारे राष्ट्रीय संघटन आवश्यक होते़ जे सर्व रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना एकसुत्रात बांधून योग्य दिशा प्रदान करेल़ सर्वांच्या दृष्टीने गांधी सेवा संघ हिच संस्था योग्य दिशादर्शक व आधारवड वाटायला लागली़ १९३४-३५ मध्ये बापूंनी संघाची धूरा सांभाळली़ त्यांनी याला अहिंसेची प्रयोगशाळा माणून कार्य सुरू केले़ अहिंसक समाज निर्माणासाठी समाजातील हिंसक व रचनात्मक संस्थांचे महत्त्व हळूहळू कमी करणे़ यामुळे मानवाला खरे स्वराज्य प्राप्त होईल़ स्वराज्य म्हणजे स्व वर नियंत्रण आणि स्वत:चे राज्य ‘हिंद स्वराज्य’ मध्ये नव समाजाचे वर्णन बापूंनी केले़ यास पृथ्वीवर प्रत्यक्ष साकार करण्यासाठी रचनात्मक संस्था व गांधी सेवा संघाने कार्य करावे, असा विचार गांधीजींचा होता़ १९४५ मध्ये कारावासातून सुटका झाल्यानंतर अखिल भारत चरखा संघाचे काम सांभाळले़ गावोगावी चरख्याच्या माध्यमातून स्वावलंबन व रोजगार निर्मितीचे काम सुरू केले़ ग्रामोद्योग वाढविला़ गावातील घरोघरी ग्रामोद्योग विकसित झाल्याने अहिंसात्मक प्रवृत्ती वाढीस लागली, अशाप्रकारे घरापासून तर गाव, नंतर देश, स्वावलंबन व स्वाभिमानाकडे वाटचाल करू लागले़ अन्न, वस्त्र निवारा व शिक्षणाची व्यवस्था गावातच व्हावी, याची व्यवस्था संघाकडे सोपविली़ १९४८ मध्ये विशुद्ध आत्मा बापूंची हत्या झाली; पण त्यांचे विचार, कार्य, तत्व आणि रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत़ सेवाग्राम येथील गांधी सेवा संघाचे कार्य ग्रंथालयाच्या माध्यमातून सुरू असून ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले़ बालकांपासून तर वृद्धापर्यंत नियमित अध्ययनासाठी येतात़ आचार्य अध्ययनासाठी मुली व मुले येत असून अनेकांनी याच ग्रंथालयातून आचार्य पदवी प्राप्त केली़ गांधी सेवा संघाचा इतिहास दिशा, प्रेरणा व स्फूर्ती देणारा असला तरी देशाच्या खऱ्या विकासाचे बिजारोपण यातून होऊ शकते़