शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

आमगावात बसविण्यात आला पहिला सौर कृषी पंप

By admin | Updated: May 26, 2016 00:59 IST

शेतीला शाश्वत व निरंतर सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतीला शेतकऱ्यांना बारमाही पीक घेण्यासाठी सौर कृषी पंप योजना उपयुक्त ठरली आहे.

११ पंपांद्वारे सिंचन : जिल्हाधिकाऱ्यांद्वारे हमदापूर, देऊळगावची पाहणीवर्धा : शेतीला शाश्वत व निरंतर सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतीला शेतकऱ्यांना बारमाही पीक घेण्यासाठी सौर कृषी पंप योजना उपयुक्त ठरली आहे. या योजनेतील पहिला सौर कृषी पंप आमगाव येथील हेमंत मोहरील या शेतकऱ्याकडे लावण्यात आला आहे. सदर सौर कृषी पंप यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त या जिल्ह्यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या केवळ पाच टक्के रक्कम भरल्यानंतर लाभार्थ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात येत आहे. या योजनेमुळे विद्युत जोडणीपासून वंचित राहणाऱ्या बऱ्याच एकरापर्यंत शेती असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजने सहभागी होऊन बारमाही पिके घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यात ११ सौर कृषभ पंप बसविण्यात आले असून आठवड्यात २८ पंप बसविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्याला ९२० सौर कृषी पंपपचे उद्दिष्ट आहे. १७६ सौर कृषी पंपांना पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आता निसर्गावर अवलंबून न राहता आपल्या शेतात पारंपरिक पिकांऐवजी रोख भाजीपाला, फळाची शेती करून आर्थिक विवंचनेतून बाहेर पडावे. विजेची जोडणी मिळण्यास पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्यासने लाभ मिळत असून सौर कृषभ पंपांमुळे विजेच्या बिलापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळत आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊन भाजीपाला व फळबागासारखे बारमाही पिके घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी नवाल यांनी केली आहे. सेलू तालुक्यातील हमदापूर येथे सुधाकर मारोतराव डोणे, देऊळगावच्या भीमराव निंदे या शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या सौर कृषी पंपांची पाहणी करीत जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हमदापूरच्या सुधाकर डोणे यांच्याकडे तीन एकर शेती असून शेतात विहिरीला पाणी आहे. केवळ वीज जोडणी नसल्याने सिंचन करणे शक्य नव्हते. सौर उर्जा कृषी पंपामुळे केवळ १६ हजार २०० रुपये भरून ३ लाख २४ हजार रुपयांच्या तीन एचपीचा पंप व सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले. सौर कृषी पंपामुळे आता बारमाही पिके घेणे सुलभ होणार आहे. प्रत्येक महिन्याला विजेचे देयक भरावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.जिल्ह्यात बसविलेल्या ११ सौर कृषी पंपाची यशस्वी चाचणी झाली आहे. सौर ऊर्जेमुळे शाश्वत व निरंतर सिंचनाचा लाभ मिळणार असल्याने पारंपरिक ऊर्जास्त्राताऐवजी अपारंपरिक नवीन उर्जास्त्रोताचा वापर शेतीसाठी फायदेशीर ठरणार आहे.शेतकऱ्यांनी सौर उर्जेचा वापर वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. सातबारावर कुटुंबातील व्यक्तीच्या एकत्र असलेल्या नोंदीऐवजी हिस्से-वाटणीनुसार सातबारा उपलब्ध करून देण्यात येतील. अधिकाधिक शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.प्रारंभी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी सौर कृषी पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत असून प्रत्यक्ष सौर पंप सुरू झाल्यानंतर इतर शेतकऱ्यांना याची उपयुक्तता माहिती होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी पाच टक्के सहभाग द्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, भागवत कुंभार, उपकार्यकारी अभियंता सुहास पडोळे, चंदन गावंडे, मिलिंद माने आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून रोख पिके घेण्याचे आवाहन केले.(कार्यालय प्रतिनिधी)