शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सालगड्याच्या शोधार्थ शेतकऱ्यांची भटकंती

By admin | Updated: April 5, 2016 04:40 IST

दरवर्षी गुडीपाडव्यापासून शेतात सालगडी कामाला लावले जातात; परंतु दुष्काळी स्थितीमुळे परिसरात हाताला काम

वर्धा : दरवर्षी गुडीपाडव्यापासून शेतात सालगडी कामाला लावले जातात; परंतु दुष्काळी स्थितीमुळे परिसरात हाताला काम नसल्याने अनेकजण तालुक्याच्या ठिकाणी तसेच इतर जिल्ह्यात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ यासह इतर राज्यात गेले आहेत. यामुळे यंदा सालगडी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना गावोगाव शोधमोहीम करावी लागत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस महागाईत वाढ हाते असून सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहेत. दुष्काळाबरोबरच महागाईचे चटके सर्वच स्तरातील नागरिकांना बसत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळेवर पाऊस पडत नसल्याने अनेक युवक शेती सोडून रोजगारासाठी शहराकडे जात असल्याचे दिसून येते; परंतु असे शेतकरी अजून आहे की त्यांना शेती सोडता येत नाही. त्यातही मोठ्या शेतकऱ्यांना शेती शिवाय पर्यायच नाही. स्वत: शेती करता येत नाही अश्या शेतकऱ्यांना सालगड्यांच्या भरवश्यावर शेती करावी लागते.गावातील अनेक जण शहरात रोजगारासाठी गेल्याने शेतीसाठी सालगडी कठीण झाले आहे. मराठी नवीन वर्ष म्हणून गुडीपाडव्याला सालगडी कामावर ठेवले जातात. पूर्वी ठराविक रक्कम आणि काही धान्याच्या मोबदल्यात सालगडी ठेवले जात असते. तेव्हा गडी मिळण्यास फारशी अडचण येत नव्हती; परंतु अलिकडच्या काही वर्षांपासून रोजंदारीवर तसेच उघड (गुत्ते) पद्धतीने काम केल्यावर कमी वेळेस जास्त पैसे मिळत असल्याने सालाने काम करण्यात मजूर नकार देतात. तसेच सालात वाढ झाल्याने सालगडी मिळणे अवघड झाले आहे.८०, ८५, ९० हजार रुपये देऊनही सालगडी मिळेणासे झाले आहे. परिणामी पाहुणे, नातेवाईकडे गड्याचे ठेपे शोधण्यासाठी शेतकऱ्यांना गावोगाव फिरून भटकंती करावी लागत आहे. बरेच सालगडी सालाची रक्कम घेतल्यावर मध्येच लग्न, दवाखान्याच्या नावावर पुन्हा मोठ्या रक्कमेची मागणी करतात. उचल देऊनही सालगडी वर्षभर काम करील याची खात्री नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडतात. शेतीचा खर्च सालगडी लग्नकार्य, दवाखाना, मुलाच शिक्षण, मध्येच अस्मानी संकट उद्भवल्यास शेतकऱ्यांचे पार आर्थिक कंबरडे मोडते. त्यात व्याजाने व कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती विकल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच४गत ३-४ वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटांची मालिकाच सुरू आहे. कधी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळवारा यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडत चालले आहे.४शासनाकडून बी.पी.एल. आणि ए.पी.एल. कार्डधारक मजुरांना राशन दुकानात स्वस्त धान्य मिळत असल्याने तसेच आठवड्यातून २-३ दिवस जरी रोजाने काम केले तरी महिन्याचा खर्च सहज निघत असल्याने कशाला वर्षभर राबायचे असे म्हणत काही जण सालाने काम करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांना शेतीसाठी सालगडी शोधावे लागत आहेत.