शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

सालगड्याच्या शोधार्थ शेतकऱ्यांची भटकंती

By admin | Updated: April 5, 2016 04:40 IST

दरवर्षी गुडीपाडव्यापासून शेतात सालगडी कामाला लावले जातात; परंतु दुष्काळी स्थितीमुळे परिसरात हाताला काम

वर्धा : दरवर्षी गुडीपाडव्यापासून शेतात सालगडी कामाला लावले जातात; परंतु दुष्काळी स्थितीमुळे परिसरात हाताला काम नसल्याने अनेकजण तालुक्याच्या ठिकाणी तसेच इतर जिल्ह्यात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ यासह इतर राज्यात गेले आहेत. यामुळे यंदा सालगडी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना गावोगाव शोधमोहीम करावी लागत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस महागाईत वाढ हाते असून सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहेत. दुष्काळाबरोबरच महागाईचे चटके सर्वच स्तरातील नागरिकांना बसत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळेवर पाऊस पडत नसल्याने अनेक युवक शेती सोडून रोजगारासाठी शहराकडे जात असल्याचे दिसून येते; परंतु असे शेतकरी अजून आहे की त्यांना शेती सोडता येत नाही. त्यातही मोठ्या शेतकऱ्यांना शेती शिवाय पर्यायच नाही. स्वत: शेती करता येत नाही अश्या शेतकऱ्यांना सालगड्यांच्या भरवश्यावर शेती करावी लागते.गावातील अनेक जण शहरात रोजगारासाठी गेल्याने शेतीसाठी सालगडी कठीण झाले आहे. मराठी नवीन वर्ष म्हणून गुडीपाडव्याला सालगडी कामावर ठेवले जातात. पूर्वी ठराविक रक्कम आणि काही धान्याच्या मोबदल्यात सालगडी ठेवले जात असते. तेव्हा गडी मिळण्यास फारशी अडचण येत नव्हती; परंतु अलिकडच्या काही वर्षांपासून रोजंदारीवर तसेच उघड (गुत्ते) पद्धतीने काम केल्यावर कमी वेळेस जास्त पैसे मिळत असल्याने सालाने काम करण्यात मजूर नकार देतात. तसेच सालात वाढ झाल्याने सालगडी मिळणे अवघड झाले आहे.८०, ८५, ९० हजार रुपये देऊनही सालगडी मिळेणासे झाले आहे. परिणामी पाहुणे, नातेवाईकडे गड्याचे ठेपे शोधण्यासाठी शेतकऱ्यांना गावोगाव फिरून भटकंती करावी लागत आहे. बरेच सालगडी सालाची रक्कम घेतल्यावर मध्येच लग्न, दवाखान्याच्या नावावर पुन्हा मोठ्या रक्कमेची मागणी करतात. उचल देऊनही सालगडी वर्षभर काम करील याची खात्री नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडतात. शेतीचा खर्च सालगडी लग्नकार्य, दवाखाना, मुलाच शिक्षण, मध्येच अस्मानी संकट उद्भवल्यास शेतकऱ्यांचे पार आर्थिक कंबरडे मोडते. त्यात व्याजाने व कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती विकल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच४गत ३-४ वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटांची मालिकाच सुरू आहे. कधी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळवारा यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडत चालले आहे.४शासनाकडून बी.पी.एल. आणि ए.पी.एल. कार्डधारक मजुरांना राशन दुकानात स्वस्त धान्य मिळत असल्याने तसेच आठवड्यातून २-३ दिवस जरी रोजाने काम केले तरी महिन्याचा खर्च सहज निघत असल्याने कशाला वर्षभर राबायचे असे म्हणत काही जण सालाने काम करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांना शेतीसाठी सालगडी शोधावे लागत आहेत.