शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

रकमेकरिता शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात ठिय्या

By admin | Updated: August 29, 2014 00:01 IST

गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. हे अनुदान आले असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते जमा झाले नाही.

हिंगणघाट : गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. हे अनुदान आले असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते जमा झाले नाही. याबाबत दोनदा निवेदन देऊनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही़ यामुळे किसान अधिकार अभियानने शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. २०१३-१४ या वर्षाच्या शेती हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले़ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक मागविण्यात आले. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी खाते क्रमांक दिले; पण अनेकांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. शासनाकडून २१ हजार ७०० शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत १० कोटी ३१ लाखाचे अनुदान तहसील कार्यालयास प्राप्त झाले़ पैकी २० हजार ९९० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार दीपक करंडे यांनी दिली. उर्वरित ७१० लाभार्थ्यांकरिता ५५ लाखांची मागणी शासनाकडे केल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने नुकसान भरपाई पाठविली. तहसील कार्यालयाने बँकेत पाठविली; पण संबंधित खात्यात जमा झाली नाही. शेतकरी संबंधित बँकेत चकरा मारून वैतागले़ अधिकारी उद्धट वागणूक देतात़ शेतकरी आर्थिक संकटात असल्याने आर्थिक मदत गरजेची आहे़ यामुळे त्वरित अनुदान द्यावे, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणाी किसान अधिकारने लावून धरली. यावेळी प्रवीण उपासे, बालू भोयर, शंकर जामूनकर, प्रवीण कलोडे, राजू मून, रणजीत हाते, नरेश हाते आदी उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)