शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

शेतकऱ्यांच्या हाती तंत्रज्ञान दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:54 IST

शेतकऱ्यांच्या हाती असे तंत्रज्ञान दिले पाहिजे ज्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून त्याला हमखास उत्पन्नाची हमी मिळेल असे प्रतिपादन जैन इरिगेशन जळगावचे संचालक अभय जैन यांनी केले. पवनार येथील प्रगतीशील शेतकरी कुंदन वाघमारे त्यांच्या शेतात आयोजित केळी पीक पाहणी कार्यक्रम व जैन ठिंबक केळी लागवडीचे मार्गदर्शन या मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देअभय जैन : पवनार येथील केळी पीक पाहणी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : शेतकऱ्यांच्या हाती असे तंत्रज्ञान दिले पाहिजे ज्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून त्याला हमखास उत्पन्नाची हमी मिळेल असे प्रतिपादन जैन इरिगेशन जळगावचे संचालक अभय जैन यांनी केले. पवनार येथील प्रगतीशील शेतकरी कुंदन वाघमारे त्यांच्या शेतात आयोजित केळी पीक पाहणी कार्यक्रम व जैन ठिंबक केळी लागवडीचे मार्गदर्शन या मेळाव्यात ते बोलत होते.सर्वप्रथम जैन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी जी. ्आर.कापसे, मुख्य केळी तज्ज्ञ डॉ. के.व्ही. पाटील, तांदुळवाडी रावेर येथून आलेले कृषीभूषण प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन, विनय काकडे, कृषीभूषण डॉ. नंदकिशोर तोटे, शेतकरी कुंदन वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्ताविकामध्ये शेतकरी कुंदन वाघमारे यांनी वर्धा, सेलू तालुक्यामध्ये केळी पिकाचे क्षेत्र वाढवून या क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. व सोबतच त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने केली. पीक घेतल्यास ते कसे फायद्याचे आहे हे उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. के.व्ही. पाटील यांनी आपल्या विस्तृत मार्गदर्शनातून केळी पिकाच्या लागवडीचे तंत्र समजावून सांगितले. जगातील ३० टक्के केळीचे उत्पादन एकट्या भारतात असून केळी उत्पादनात भारत हा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर चीनन, फिसीपाईन्स, इक्विडोर या देशाचा नंबर लागतो. संपूर्ण देशाच्या शेतीला तंत्रज्ञान शिकविणारे पिक म्हणजे केळी असेही ते म्हणाले. साधारणत: केळी हे पीक शास्त्रीय दृष्ट्या १५ ते ४० सेल्सीअंश तापमानात घेता येते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने खानदेश व विदर्भात उन्हाळ्यात असलेल्या ४७ सेल्सीअंश तापमानातही यशस्वीरित्या केली. पीक घेतल्या जाऊ शकते हे सिध्द झाल्याचेही ते म्हणाले. अभय जैन पुढे म्हणाले की, शेतकरी मोठा झाला तरच उद्योजक मोठा होईल. तेव्हा उद्योजकांनी शेतकऱ्याला काय दिले पाहिजे त्याचा विचार होणे गरजेचे आहे. जैन उद्योग समुहाने जेव्हा ठिंबक सिंचन आणले तेव्हा थेंबा थेंबने पीक कसे वाढेल हा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला होता. परंतु प्रयोगाअंती ते सिध्द झाले व पर्यायाने पाणी समस्येवर मात करणारा पर्याय शोधून राष्ट्रहिताचे कार्य करता आल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला परिसरातील व जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावली.