शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

एफसीआयच्या तूर खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: March 1, 2017 00:59 IST

तुरीला व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा अत्यल्प दर मिळत असल्याने शासनाच्यावतीने केंद्र सुरू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचा आरोप वर्धा : तुरीला व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा अत्यल्प दर मिळत असल्याने शासनाच्यावतीने केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रांवर शेतकऱ्यांची पिळवणूकच होत असल्याचे दिसून आले आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत निकषाच्या नावावर शेतकऱ्यांची तूर नाकरल्या जात आहे. यात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे विदर्भ सचिव किशोर किनकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली. शाासनाने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग गठित केला. परतु त्याच्या शिफारसी लागू केल्या नसल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे. वर्धा बाजार समितीत भारतीय खाद्य निगम कर्मचाऱ्यांकडून तूर खरेदीत देखील शेतकऱ्यांना निकषाच्या कैचीत पकडून व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे. सोमवारी किनकर यांनी स्वत: सकाळी ९ पासून सायंकाळी ९.३० वाजेपर्यंत याचा प्रत्यक्षात अनुभव घेतल्याचे नमूद केले आहे. यात ग्रेडर सुनील सिंग यांनी शेतकऱ्यांचा तुरी निकषात बसत नसल्याचे म्हणत त्या परत करण्याचा सपाटा सुरू केला होता. आणि याच वेळी सर्व नियब धाब्यावर बसवून एका व्यापाऱ्याची दर्जाहिन तूर खरेदी केली. या प्रकाराची माहिती किनकर यांनी उपनिबंधक कडू व तहसीलदार चव्हाण यांना दिली. यानंतर सिंग यांच्याशी बोलने झाले तरीही नंतरच्या खरेदीमध्ये सिंग तसेच एफ.सी.आय.अधिकारी यांनी आपले मुजोरी सुरूच ठेवली. शासनाने जाहीर केलेल्या हमी भावात व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी करावी व ती न केल्यास व्यापाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. व्यापारी, अधिकारी यांच्या संगणमताने होणारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेने केली. अन्यथा शेतकरी कामगार संघर्ष परिषदेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.(प्रतिनिधी)