शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

एफसीआयच्या तूर खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: March 1, 2017 00:59 IST

तुरीला व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा अत्यल्प दर मिळत असल्याने शासनाच्यावतीने केंद्र सुरू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचा आरोप वर्धा : तुरीला व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा अत्यल्प दर मिळत असल्याने शासनाच्यावतीने केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रांवर शेतकऱ्यांची पिळवणूकच होत असल्याचे दिसून आले आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत निकषाच्या नावावर शेतकऱ्यांची तूर नाकरल्या जात आहे. यात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे विदर्भ सचिव किशोर किनकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली. शाासनाने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग गठित केला. परतु त्याच्या शिफारसी लागू केल्या नसल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे. वर्धा बाजार समितीत भारतीय खाद्य निगम कर्मचाऱ्यांकडून तूर खरेदीत देखील शेतकऱ्यांना निकषाच्या कैचीत पकडून व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे. सोमवारी किनकर यांनी स्वत: सकाळी ९ पासून सायंकाळी ९.३० वाजेपर्यंत याचा प्रत्यक्षात अनुभव घेतल्याचे नमूद केले आहे. यात ग्रेडर सुनील सिंग यांनी शेतकऱ्यांचा तुरी निकषात बसत नसल्याचे म्हणत त्या परत करण्याचा सपाटा सुरू केला होता. आणि याच वेळी सर्व नियब धाब्यावर बसवून एका व्यापाऱ्याची दर्जाहिन तूर खरेदी केली. या प्रकाराची माहिती किनकर यांनी उपनिबंधक कडू व तहसीलदार चव्हाण यांना दिली. यानंतर सिंग यांच्याशी बोलने झाले तरीही नंतरच्या खरेदीमध्ये सिंग तसेच एफ.सी.आय.अधिकारी यांनी आपले मुजोरी सुरूच ठेवली. शासनाने जाहीर केलेल्या हमी भावात व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी करावी व ती न केल्यास व्यापाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. व्यापारी, अधिकारी यांच्या संगणमताने होणारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेने केली. अन्यथा शेतकरी कामगार संघर्ष परिषदेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.(प्रतिनिधी)