शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

मदतीसाठी शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: February 19, 2015 01:30 IST

नैसर्गिक आपत्तीचे शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते़ यामुळे आपल्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे तपासण्यासाठी ..

सेलू : नैसर्गिक आपत्तीचे शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते़ यामुळे आपल्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागतात़ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही हे अनुदान मिळालेच नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ संबंधित प्रशासन व बँक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वळते करणे गरजेचे झाले आहे़शासनाने सर्वेक्षण करून तलाठी कार्यालयामार्फत अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्यात़ यानंतर संबंधित शेतकऱ्यांसाठी लागणारे अनुदानही संबंधित प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आल्या़ यानंतर पूढील कारवाई सुरू झाली़ संबंधित विभाग नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम काही दिवसांपासून जमा करीत आहे; पण काही मौजातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. आज वा उद्या ही रक्कम जमा होईल, या आशेमुळे शेतकरी वारंवार बँकेत चकरा मारतात; पण त्यांची निराशाच होत आहे़ या तालुक्यातील काही राष्ट्रीयकृत बँकेत पासबुकावर नोंद करणारी मशीनच बंद असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली बँकेतून परतून जावे लागत असल्याचे दिसते़ बहुतांश शेतकऱ्यांकडे पीक कर्ज थकित आहे़ अशा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलेली मदतीची रक्कम लिंक आणि बँकिंगच्या सॉफ्टवेअरमुळे कर्ज खात्यात जमा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत सातत्याने गर्दी दिसून येत आहे. कर्ज खात्यात जमा झालेली हे रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठीही बँकांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची भेट ्घ्यावी लागत आहे़ सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळणार असल्याचे महसूल विभागने सांगितले आहे़ यामुळे शेतकऱ्यांना आपल्या खात्यात ही रक्कम जमा झाली असावी म्हणून शेतकरी बँकेत चकरा मारत असल्याचे दिसते़(शहर प्रतिनिधी)बँकेचा खाते क्रमांकातील चुकीमुळे त्रास; वेळेचाही होतोय अपव्ययशेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचा क्रमांक तलाठी कार्यालयात दिला; पण निधी जमा करताना खाते क्रमांकात चुक होत असल्यसाने या शेतकऱ्यांचा निधी दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्याचे प्रकारही घडत असल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम पुन्हा परत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे़ प्रशासन आणि बँकेमध्ये शेतकरी पिचला जात आहे़प्रत्येक गावात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नसल्याने व बँकेत होत असलेल्या गर्दीमुळे शेतकऱ्यांना आपल्या खात्यात पैसे का जमा झाले नाही, याची माहिती मिळविण्यासाठी बँकेत व तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे़ दररोज होणाऱ्या या हेलपाट्यांमुळे शेतकऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होताना दिसते़ शिवाय आपल्या गावात बँक नसलेले शेतकरी दुसऱ्या गावात जाऊन चौकशी करीत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे़