शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

मदतीसाठी शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: February 19, 2015 01:30 IST

नैसर्गिक आपत्तीचे शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते़ यामुळे आपल्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे तपासण्यासाठी ..

सेलू : नैसर्गिक आपत्तीचे शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते़ यामुळे आपल्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागतात़ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही हे अनुदान मिळालेच नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ संबंधित प्रशासन व बँक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वळते करणे गरजेचे झाले आहे़शासनाने सर्वेक्षण करून तलाठी कार्यालयामार्फत अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्यात़ यानंतर संबंधित शेतकऱ्यांसाठी लागणारे अनुदानही संबंधित प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आल्या़ यानंतर पूढील कारवाई सुरू झाली़ संबंधित विभाग नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम काही दिवसांपासून जमा करीत आहे; पण काही मौजातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. आज वा उद्या ही रक्कम जमा होईल, या आशेमुळे शेतकरी वारंवार बँकेत चकरा मारतात; पण त्यांची निराशाच होत आहे़ या तालुक्यातील काही राष्ट्रीयकृत बँकेत पासबुकावर नोंद करणारी मशीनच बंद असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली बँकेतून परतून जावे लागत असल्याचे दिसते़ बहुतांश शेतकऱ्यांकडे पीक कर्ज थकित आहे़ अशा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलेली मदतीची रक्कम लिंक आणि बँकिंगच्या सॉफ्टवेअरमुळे कर्ज खात्यात जमा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत सातत्याने गर्दी दिसून येत आहे. कर्ज खात्यात जमा झालेली हे रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठीही बँकांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची भेट ्घ्यावी लागत आहे़ सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळणार असल्याचे महसूल विभागने सांगितले आहे़ यामुळे शेतकऱ्यांना आपल्या खात्यात ही रक्कम जमा झाली असावी म्हणून शेतकरी बँकेत चकरा मारत असल्याचे दिसते़(शहर प्रतिनिधी)बँकेचा खाते क्रमांकातील चुकीमुळे त्रास; वेळेचाही होतोय अपव्ययशेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचा क्रमांक तलाठी कार्यालयात दिला; पण निधी जमा करताना खाते क्रमांकात चुक होत असल्यसाने या शेतकऱ्यांचा निधी दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्याचे प्रकारही घडत असल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम पुन्हा परत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे़ प्रशासन आणि बँकेमध्ये शेतकरी पिचला जात आहे़प्रत्येक गावात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नसल्याने व बँकेत होत असलेल्या गर्दीमुळे शेतकऱ्यांना आपल्या खात्यात पैसे का जमा झाले नाही, याची माहिती मिळविण्यासाठी बँकेत व तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे़ दररोज होणाऱ्या या हेलपाट्यांमुळे शेतकऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होताना दिसते़ शिवाय आपल्या गावात बँक नसलेले शेतकरी दुसऱ्या गावात जाऊन चौकशी करीत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे़