शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

कर्ज पुनर्गठणाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

By admin | Updated: June 11, 2015 01:59 IST

विदर्भातील शेतकरी दोन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांची पेरणीची सोय उरली नाही.

बॅकेतून पाठविले जाते परत : शासन निर्णयाचा काढला जातो वेगवेगळा अर्थसेलू : विदर्भातील शेतकरी दोन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांची पेरणीची सोय उरली नाही. शासनाच्यास निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा; पण कर्जाचे पुनर्गठण करून नव्याने कर्ज देण्यास बँकांचे अधिकारी टाळाटाळ करीत आहे. शासनाच्या निर्णयाचा वेगवेगळा अर्थ काढून शेतकऱ्यांना आल्या पावलीच बँकेतून परत पाठविले जाते. यामुळे असंतोष पसरला आहे.शेतकरी बँकांत गेल्यावर त्यांना २०१४-१५ या वर्षाच्याच थकित कर्जाचे पुनर्गठण करून नव्याने कर्ज पुरवठा करण्यात येईल, असा अलिखीत नियम सेलू येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक डी.एम. निमजे यांनी शेतकऱ्यांना सांगणे सुरू केले आहे. १९९५ पासून खातेदार असलेला शालिक भीमराव चाफले प्रारंभापासून कर्ज घेत आहे. तो नियमित कर्जाची परतफेडही करतो; पण २०१३-१४ ला प्रथमच तो थकित कर्जदाराच्या यादीत आला. अडीच एकर शेती व तीही कोरडवाहू असून त्याला अडीच एकरात सहा पोते सोयाबीन झाले. तेही पाण्याने भिजल्याने काळवंडले. यामुळे लागवड खर्चही निघाला नाही. सहा पोते सवंगणी, काढणी व मजुरीतच संपले. बँकेचे भरण्यास दमडीही उरली नाही. २०१४-१५ मध्ये नातलगांकडून उसणवारीचे पैसे घेऊन पुन्हा पेरणी केली; पण मोड आली. यामुळे आर्थिक विवंचनेत अडकला असून तो त्रस्त आहे.(तालुका प्रतिनिधी)नवीन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता नवीन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रायोगिक तत्वावर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जे शेतकरी बँकींग नेटवर्कच्या बाहेर आहेत, त्यांना राष्ट्रीयकृत वा सहकारी बँकेचे खातेदार करून पतपुरवठा उपलब्ध होईल, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी दिले आहेत. काही तालुक्यात ३० ते ४० टक्के शेतकरी कुठल्याही बँकचे खातेदार नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांना खासगी सावकारांवर अवलंबून राहावे लागते. यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू आहे.बँक खाते नसलेल्या शेतकऱ्यांचे तातडीने जनधन योजनेच्या माध्यमातून खाते उघडण्याची मोहीम हाती घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासाठी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना पत पुरवठा सुलभ पद्धतीने कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांद्वारे देण्यात आल्या आहेत.शिवाय कर्ज पुनर्गठणाबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठीही बँका तसेच प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.२०१२-१३, २०१३-१४ च्या थकित कर्जाचे पुनर्गठन होऊ शकत नाही. पुनर्गठनाबाबत शासनाचे आदेश आहे. १ एप्रिल १४ ते २१ मार्च २०१५ च्या कर्जाचे पुर्नगठण करता येऊ शकते. हे कर्जपुनर्गठण फक्त पीक कर्जाचे होईल. हे कर्ज भरण्यासाठी जून २०१६-२० पर्यंत पाच वार्षिक हप्ते मिळेल. जुने व नवीन कर्ज देताना १ लाख रुपयांवर रक्कम गेल्यास गहाणखत करावे लागते.- डी.एम. निमजे, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया, सेलू.