शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठणाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

By admin | Updated: June 11, 2015 01:59 IST

विदर्भातील शेतकरी दोन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांची पेरणीची सोय उरली नाही.

बॅकेतून पाठविले जाते परत : शासन निर्णयाचा काढला जातो वेगवेगळा अर्थसेलू : विदर्भातील शेतकरी दोन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांची पेरणीची सोय उरली नाही. शासनाच्यास निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा; पण कर्जाचे पुनर्गठण करून नव्याने कर्ज देण्यास बँकांचे अधिकारी टाळाटाळ करीत आहे. शासनाच्या निर्णयाचा वेगवेगळा अर्थ काढून शेतकऱ्यांना आल्या पावलीच बँकेतून परत पाठविले जाते. यामुळे असंतोष पसरला आहे.शेतकरी बँकांत गेल्यावर त्यांना २०१४-१५ या वर्षाच्याच थकित कर्जाचे पुनर्गठण करून नव्याने कर्ज पुरवठा करण्यात येईल, असा अलिखीत नियम सेलू येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक डी.एम. निमजे यांनी शेतकऱ्यांना सांगणे सुरू केले आहे. १९९५ पासून खातेदार असलेला शालिक भीमराव चाफले प्रारंभापासून कर्ज घेत आहे. तो नियमित कर्जाची परतफेडही करतो; पण २०१३-१४ ला प्रथमच तो थकित कर्जदाराच्या यादीत आला. अडीच एकर शेती व तीही कोरडवाहू असून त्याला अडीच एकरात सहा पोते सोयाबीन झाले. तेही पाण्याने भिजल्याने काळवंडले. यामुळे लागवड खर्चही निघाला नाही. सहा पोते सवंगणी, काढणी व मजुरीतच संपले. बँकेचे भरण्यास दमडीही उरली नाही. २०१४-१५ मध्ये नातलगांकडून उसणवारीचे पैसे घेऊन पुन्हा पेरणी केली; पण मोड आली. यामुळे आर्थिक विवंचनेत अडकला असून तो त्रस्त आहे.(तालुका प्रतिनिधी)नवीन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता नवीन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रायोगिक तत्वावर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जे शेतकरी बँकींग नेटवर्कच्या बाहेर आहेत, त्यांना राष्ट्रीयकृत वा सहकारी बँकेचे खातेदार करून पतपुरवठा उपलब्ध होईल, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी दिले आहेत. काही तालुक्यात ३० ते ४० टक्के शेतकरी कुठल्याही बँकचे खातेदार नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांना खासगी सावकारांवर अवलंबून राहावे लागते. यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू आहे.बँक खाते नसलेल्या शेतकऱ्यांचे तातडीने जनधन योजनेच्या माध्यमातून खाते उघडण्याची मोहीम हाती घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासाठी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना पत पुरवठा सुलभ पद्धतीने कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांद्वारे देण्यात आल्या आहेत.शिवाय कर्ज पुनर्गठणाबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठीही बँका तसेच प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.२०१२-१३, २०१३-१४ च्या थकित कर्जाचे पुनर्गठन होऊ शकत नाही. पुनर्गठनाबाबत शासनाचे आदेश आहे. १ एप्रिल १४ ते २१ मार्च २०१५ च्या कर्जाचे पुर्नगठण करता येऊ शकते. हे कर्जपुनर्गठण फक्त पीक कर्जाचे होईल. हे कर्ज भरण्यासाठी जून २०१६-२० पर्यंत पाच वार्षिक हप्ते मिळेल. जुने व नवीन कर्ज देताना १ लाख रुपयांवर रक्कम गेल्यास गहाणखत करावे लागते.- डी.एम. निमजे, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया, सेलू.