शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नोटीसनंतरही ३३ शिकस्त इमारती उभ्याच

By admin | Updated: July 23, 2016 02:34 IST

शहरातील ३३ शिकस्त इमारतींना पालिका प्रशासनाद्वारे अनेकवार नोटीस बजावण्यात आली आहे.

पावसाच्या दिवसांत दुर्घटनेची शक्यता : पालिका बजावू शकते केवळ नोटीस पराग मगर वर्धा शहरातील ३३ शिकस्त इमारतींना पालिका प्रशासनाद्वारे अनेकवार नोटीस बजावण्यात आली आहे. दर पावसाळ्यात ही नोटीस दिली जाते. पण यातील एकही इमारत मालकाकडून या नोटीसींकडे दुर्लक्ष होत आहे. शिकस्त झालेल्या या इमारतीच्या डागडुजीकडे किंवा त्या पाडण्याकडे त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसून त्या तशाच उभ्या आहेत. उभ्या असलेल्या इमारतींपैकी बऱ्याच इमारतीत भाडेकरी असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शिकस्त झालेल्या बऱ्याच इमारती शहरातील बाजार परिसरात आहे. त्या इमारतींच्या पायथ्यांशी अनेक छोटी दुकाने आहे. वर्धेतील पत्रावळी चौक परिसरात पावसाळ्याच्या दिवसात शिकस्त इमारतीची भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घटना काही वर्षांपूर्वी घडली आहे. असे असताना ती इमारत आजही तशीच उभी आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शिकस्त झालेली एखादी इमारत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील शिकस्त इमारती दरवर्षी वाढत आहे. गरवर्षी ३१ असलेला शिकस्त इमारतींचा आकडा या पावसाळ्यात ३३ वर गेला. पालिका प्रशासनाद्वारे यंदाही सर्वांना सदर घरे पाडण्याबाबत नोटीस बजावली आहे. पण यातील एकाही घरमालकाने ही बाब मनावर न घेतल्याने शिकस्त इमारती तश्याच पडक्या स्थितीत उभ्या आहेत. शहरातील नागरिकांना शहरात वावरताना कसलीही भीती वाटू नये यासाठी अश्या शिकस्त इमारती पाडण्याबाबत घरमालकाला सूचित केले जाते. विशेष म्हणजे पालिका प्रशासन स्वत: शी घरे पाडण्याची कारवाई करू शकत नाही. याचाच फायदा घेत घरमालक इमारती शिकस्त इमारती पाडण्यास तयात नाही. यामुळे धोक्याची तलवार शहरातील नागरिकांच्या डोक्यावर कायम आहे. उद्या एखादा अपघात झाल्यास त्यास जबाबदार होण असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. वारंवार नोटीस बजावूनही या शिकस्त इमारती पाडत नसलेल्या घरमालकांवर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत. शिकस्त इमारतींखालीच बाजार शहरातील बाजार परिसरात असलेल्या या इमारतींखालीव वर्धेचा बाजार भरत असल्याचे चित्र आहे. यामुळे अशा इमारतींमुळे धोका उद्भवण्याची शक्यता आहे. याकडे इमारत मालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिकस्त इमारती पाडण्याकरिता पालिकेच्यावतीने इमारत मालकांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी घरमालकांची आहे. घर पाडण्याचे काम पालिकेला करणे नियमानुसार शक्य नाही. - अजय बागरे, प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धा. शहरातील या शिकस्त इमारतीत अनेक घरांमध्ये भाडेकरू राहतात. घरमालक दुसरीकडे राहत असल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा घरांचा कर भरण्यात येत नाही. ज्या घरात मालकांचे वास्तव्य आहे, त्यांच्याकडून नियमित कराचा भरणा होत असल्याचे पालिकेकडून होत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा इमारतींची संख्या वाढीवरच असल्याचे दिसून आले आहे. गत वर्षी शहरात शिकस्त इमारती म्हणून ३१ इमारतींची नोंद होती. यंदा तो आकडा ३३ वर पोहोचला आहे. हा आकडा असाच वाढत जाण्याची शक्यता पालकेच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. यामुळे घरमालकांनी त्यांच्या मालमत्तेची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. या खासगी मालकीच्या असल्याने पालिकेकडून कारवाईच्या नावावर केवळ नोटीसच बजावू शकते. ती पाडण्याची जबाबदारी त्या इमारत मालकांनाच सांभाळावी लागत आहे. यामुळे त्यांनी दुर्घटना घडण्यापूर्वी यावर त्यांनीच निर्णय घेणे गरजेचे असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.