शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

मोहिमेअंती १४ बालके बेपत्ताच

By admin | Updated: August 15, 2015 02:06 IST

जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या बालकांच्या तक्रारी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत.

आॅपरेशन मुस्कान : महिन्याभरात सापडली २५ बालके वर्धा : जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या बालकांच्या तक्रारी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत. या बेपत्ता बालकांचा शोध पोलीस विभागाच्यावतीने सुरू असताना राज्य शासनाच्या आदेशाने आॅपरेशन मुस्कान राबविण्याच्या सूचना आल्या. ही विशेष मोहीम राबविण्याचा कालावधी संपला असताना अद्यापही १४ बालके बेपत्ता असल्याचे दिसून आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार १ ते ३१ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम ‘आॅपरेशन मुस्कान’च्या नावाने राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलताना व इतर कामे करताना आढळलेल्या बालकांचा शोध घेण्याचे आदेशित होते. यानुसार जिल्हा पोलिसांच्यावतीने शोध मोहीम राबविण्यात आली. या एका महिन्यात केलेल्या कारवाईत जानेवारी २०१० ते ३० जून २०१५ या काळातील बेपत्ता बालकांचा शोध घेण्यात आला. या काळात १३ मुले व २६ मुलींचा अशी एकूण ३९ मुले बेपत्ता होती. यापैकी २५ बालकांचा शोध लागला आहे. त्यात ८ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. पोलीस विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली असतानाही एकूण १४ मुले बेपत्ताच असल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात नऊ मुली व पाच मुलांचा समावेश आहे.शहरात व जिल्ह्यात पोलीस विभागाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली. यात पोलिसात गुन्हे दाखल नसलेली बरीच बालके पोलिसांच्या हाती आली आहे. त्या बालकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. अशी १४ बालके पोलिसांच्या हाती आली असून यात सहा मुले व आठ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १२ मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यात पाच मुले व सात मुलींचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन बालकांना बालसंरक्षण समितीकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.बालमजुरी व बालकामगारांवर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली होती. या विशेष मोहिमेचा कालावधी संपला असला तरी बालकांचा शोध सुरूच राहणार असल्याचे जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)