शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

२.६१ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य

By admin | Updated: August 14, 2015 02:20 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना ....

दोन रुपये गहू व तीन रुपये किलो तांदूळ : केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्यवर्धा : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रतिमहा प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. २ लक्ष ६१ हजार २६५ पात्र लाभार्थ्यांना आॅगस्ट महिन्यापासून लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरुवारी दिली आहे.अनियमित पावसामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसोबतच हवालदिल होऊन शेतकरी आत्महत्या होण्याच्या घटना होऊ नयेत, यादृष्टीने राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धरतीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतकरी लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ५ किलो गहू व तांदूळ देण्यात येणार आहे. दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.सवलतीच्या दरामध्ये शेतकऱ्यांना अन्नधान्य ही योजना शेती व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी राबविण्यात येत आहे. तालुकास्तरावर निवड करण्यात आलेल्या लाभाधारक शेतकऱ्यांची यादी तहसील व तलाठी कार्यालय, तसेच रास्त भाव दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. या योजनेत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक तसेच त्यांच्या शेतजमिनीचा सातबारा रास्त भाव दुकानदाराकडे घोषणापत्रासह उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभासंदर्भात शिधापत्रिकांवर विशेष नोंद राहणार आहे. या योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यापासूनच धान्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी)