शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

२.६१ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य

By admin | Updated: August 14, 2015 02:20 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना ....

दोन रुपये गहू व तीन रुपये किलो तांदूळ : केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्यवर्धा : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रतिमहा प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. २ लक्ष ६१ हजार २६५ पात्र लाभार्थ्यांना आॅगस्ट महिन्यापासून लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरुवारी दिली आहे.अनियमित पावसामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसोबतच हवालदिल होऊन शेतकरी आत्महत्या होण्याच्या घटना होऊ नयेत, यादृष्टीने राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धरतीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतकरी लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ५ किलो गहू व तांदूळ देण्यात येणार आहे. दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.सवलतीच्या दरामध्ये शेतकऱ्यांना अन्नधान्य ही योजना शेती व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी राबविण्यात येत आहे. तालुकास्तरावर निवड करण्यात आलेल्या लाभाधारक शेतकऱ्यांची यादी तहसील व तलाठी कार्यालय, तसेच रास्त भाव दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. या योजनेत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक तसेच त्यांच्या शेतजमिनीचा सातबारा रास्त भाव दुकानदाराकडे घोषणापत्रासह उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभासंदर्भात शिधापत्रिकांवर विशेष नोंद राहणार आहे. या योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यापासूनच धान्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी)