शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

जलसंधारणाची योजना नसल्याने तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: April 27, 2016 02:22 IST

पाणी तारक आहे, पाणी विध्वंसक आहे आणि पाणी विवेकी आहे. पाण्याचे स्रोत नदी, नाले, झरे, भूजल आणि सर्वात महत्त्वाचे पावसाचे पाणी आहे.

सोहम पंड्या : ‘रेन हॉर्वेस्टिंग अ‍ॅण्ड वॉटर कन्झर्वेशन’वर कार्यशाळावर्धा : पाणी तारक आहे, पाणी विध्वंसक आहे आणि पाणी विवेकी आहे. पाण्याचे स्रोत नदी, नाले, झरे, भूजल आणि सर्वात महत्त्वाचे पावसाचे पाणी आहे. प्रचंड पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याच्या संधारणाची आणि नियोजनाची कोणतीही योजना प्रभावीपणे राबविली जात नाही. यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी अनमोल नैसर्गिक देणगी आहे. तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शासकीय योजनांवर विसंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारण करावे, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. सोहम पंड्या यांनी केले.स्थानिक जनहित मंचच्यावतीने ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूर येथील सभागृहात ‘रेन हार्वेस्टिंग अ‍ॅण्ड वॉटर कन्झर्वेशन’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. मार्गदर्शक म्हणून जलतज्ज्ञ डॉ. सोहम पंड्या उपस्थित होते. उद्घाटन जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, सोशल फोरमचे अभ्युदय मेघे, आॅर्किटेक्ट असो.चे पंडित, जनहित मंचचे डॉ. राजेश पावडे आदी उपस्थित होते.डॉ. पंड्या पुढे म्हणाले की, उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन व संधारण शास्त्रियदृष्ट्या पावसाचे पाणी गोळा करणे, पाण्याचे साठवण करणे, पावसाचे पाणी शुद्ध करून त्याच्या साह्याने जमिनीत पाण्याच्या साठ्याची पातळी वाढविणे, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करणे या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यास संपूर्ण प्रक्रियेत लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून अधिकाधिक लोकांनी आपल्या राहत्यास घरी पाणी बचतीचा विडा उचलला पाहिजे. जलसंधारण करण्यासाठी इमारतीचे छत, घराचे छत, गच्ची यांचा उपयोग करून जल संधारण केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळतील. जलसंधारण केल्याने जल स्त्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागेल. भूजल पातळी वाढेल. पाणी खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होईल. जमिनीची धूप काही प्रमाणात थांबते. गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती सोप्या आहे. त्या बांधणे, वापरणे व निगा राखण्यास अत्यंत सोप्या आहेत, असेही डॉ. पंड्या यांनी सांगितले.सतीश बावसे यांनी या गंभीर समस्येवर उपाय म्हणून नागरिकांनी घराचे बांधकाम करताना ‘रेन हॉर्वेस्टिंग’ प्रणालीचा उपयोग केला तर पाण्याची समस्या कमी होऊ शकते, असे सांगितले. डॉ. आसमवार यांनी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई व दुष्काळसदृश स्थिती चिंतेची बाब आहे. पाण्याचे संवर्धन व संरक्षण करणे हाच उपाय आहे, असे सांगितले.कार्यशाळेला संयोजक डॉ. जयंत मकरंदे, प्रमोद गिरडकर, प्रशांत वकारे, सुभाष पाटणकर, प्रा. दिनेश चन्नावार, मनोहर पंचारिया, अलोक बेले, डॉ. दिनकर पुनसे, पदम ठाकरे, नंदू नरोटे, अनूप भुतडा, दीपक भुतडा, डॉ. अरविंद घोंगडे, प्रशांत लांबट, सीमा लांबट, मकरंद उमाळकर, अनिल पाखोडे, दिव्यांश वकारे, प्राचार्य देशपांडे, पवन बोधनकर, अविनाश सातव, डॉ. विलास ढगे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. मेशकर, डॉ. सातपुते, डॉ. भलमे, मिलिंद व सोनाली केदार, श्रीकांत दोड आदी हजर होते.(कार्यालय प्रतिनिधी)