शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

गतिरोधकाच्या उंचीमुळे वाहनचालक त्रस्त

By admin | Updated: February 20, 2015 01:39 IST

शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक लावण्यात आले आहेत; पण या गतिरोधकांना मापदंडच नाही़ यामुळे वाहन चालक तसेच वृद्ध नागरिकांना त्रास सहन

वर्धा : शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक लावण्यात आले आहेत; पण या गतिरोधकांना मापदंडच नाही़ यामुळे वाहन चालक तसेच वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ अनेक नागरिकांच्या मागे या उंच गतिरोधकांमुळे पाठदुखीचा ससेमिरा लागला आहे़ यामुळे गतिरोधक निर्मितीमध्ये मापदंड पाळावेत, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ कुठल्याही रस्त्यावर गतिरोधक निर्माण करताना कोणते मापदंड वापरावे, याचे कुठलेही भान ठेवले जात नाही़ हा प्रकार सध्या अनेक रस्त्यांवर असलेल्या गतिरोधकांची स्थिती पाहिल्यास लक्षात येते़ काही गतिरोधकांची उंची अधिक व सरळ असल्यामुळे गाडी थांबवून नंतरच जावे लागते़ यामुळे कंबर व पाठीच्या मणक्यांना झटका बसतो़ याचा अनुभव अनेक नागरिकांनी घेतला आहे़ यामुळे कंबर व मणक्याचे आजार वाढले आहेत़ याचा सर्वाधिक त्रास वृद्धांनाच सहन करावा लागत असून थेट वैद्यकीय उपचारांचाच आधार घ्यावा लागतो़ वर्धा शहरात तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधकांच्या नावावर वाटेल त्या उंचीचे सरळ उंचवटे तयार करण्यात आले आहेत़ गतिरोधक कुठे आहे, हे कळण्यासही वाव नाही. गतिरोधकावर पांढरे पट्टेही लावण्यात आलेले नाहीत़ रात्रीच्या वेळी तेथे प्रकाश व्यवस्थाही करण्यात आलेली नाही़ यामुळे गतिरोधक सित नसल्याने अपघात होतात़ शहरातील गजानन सायकल स्टोर्स ते श्रीनिवास कॉलनी रस्त्यावर प्रथम गतिरोधक, रत्नीबाई शाळेजवळ शाळेच्या मुख्य दाराजवळील पुलावर व जवळ, बुरड वस्ती पुलावर तसेच इतर ठिकाणी असलेले गतिरोधक त्रासदायक आहेत़ मधुबाबा देवस्थान येथील नागपूर रोडवर गतिरोधक आहे; पण प्रकाश व्यवस्था नाही़ यामुळे अपघात होतात़ केसरीमल कन्या शाळेसमोर रोडवर बसविलेले गतिरोधकही त्रासदायक होते़ यात बांधकाम विभागाने डांबर टाकल्याने थोडा त्रास कमी झाला आहे़ यामुळे शहरातील तसेच शहराबाहेरील गतिरोधकांचीही पाहणी करावी़ यातील योग्य मापदंडात असलेले गतिरोधक ठेवून उर्वरित गतिरोधक मापदंडात बसवावेत आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)