शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

कोरड्या दुष्काळाचे सावट टळले

By admin | Updated: September 14, 2014 00:08 IST

जिल्ह्यात सर्वत्र आठवडाभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात घोंगावत असलेल्या कोरड्या दुष्काळाने सावट टळले आहे. सर्वत्र शिवारांमध्ये पराटी सोयाबीन लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील

वर्धा : जिल्ह्यात सर्वत्र आठवडाभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात घोंगावत असलेल्या कोरड्या दुष्काळाने सावट टळले आहे. सर्वत्र शिवारांमध्ये पराटी सोयाबीन लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे. पण असे असतानाही काही शिवारांमध्ये मररोगही पिकांवर दिसून येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला. अनेक पिके अळ्यांनी फस्त केली होती. तसेच पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता होती. परंतु पाऊस यायला तयार नव्हता. त्यामुळे यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल असे चित्र निर्माण झाले होते. पण गणरायाच्या निरोपाला वरुणराजाची दमदार हजेरी लागल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. पावसाआभावी शेवटच्या घटका मोजत पिवळी पडत चाललेली कोरडवाहू पराटी शेवटच्या घटका मोजत होती. परंतु पावसाने वेळेवर चांगली हजेरी लावल्याने पराटी जगली. तसेच खरीप हंगामातील पिकांवर आलेल्या रोगराईचे संकट संततधार पावसाने धुवून काढले असले तरी काही ठिकाणी मररोगाचे सावट पहावयास मिळत आहे. पाऊस येत नसल्याचे अनेक लोकांना नक्षत्राची जाणीवच संपली होती. सर्वत्रच उष्णतेचे वातावरण पसरले होत. उष्णतेची झळ ग्रामीण भागासोबतच नागरिकांनाही बसत होती. पावसाळ्यातही उन्हाचा त्रास होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पाणी नसल्याने कपाशी तसेच इतर पिके कोमेजली होती सोयाबीन पिकांनाही थोड्याफार पावसाची गरज होती. तूर,मिरची व इतर पिकांनाही पाणी येत नसल्याने फटका बसत होता. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून संततधार पावसाने गणेशाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यात आगमन केले. त्यामुळे कोमेजलेली खरीप हंगामातील पिके ताजीतवानी दिसू लागली.पिवळे पडलेले शेतशिवार आता हिरवेगार दिसू लागले आहे. संततधार पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकाला जीवदान दिले. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आता पावसाने अशीच साथ द्यावी आणि उत्पन्न चांगले व्हावे अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)