शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

तूर पिकावर मर रोग; वेळीच उपाययोजना करणे गरजेचे

By admin | Updated: August 1, 2016 00:39 IST

तूर हे राज्यातील महत्वाच्या कडधान्यापैकी एक आहे. सध्या तूर व तूर डाळीचे भाव पाहता एकेकाळी दुय्यम असलेले

कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा : खतांच्या फवारणी आणि निगराणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन वर्धा : तूर हे राज्यातील महत्वाच्या कडधान्यापैकी एक आहे. सध्या तूर व तूर डाळीचे भाव पाहता एकेकाळी दुय्यम असलेले तूर पीक महत्त्वाचे मुख्य नगदी पीक म्हणून समोर आले आहे. मागील हंगामाचा विचार करता तूर पिकाने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तारले. या पिकाचा लागवड खर्च अत्यल्प व बाजारभाव अधिक असल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तूर पिकाला प्राधान्य दिले. सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी झाली आहे. या पिकाचे वेळीच व्यवस्थापन केल्यास ते वाचविता येऊ शकते, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांनी दिला आहे. मागील आठवड्यात जि.प. कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी दिल्या. यात संततधार पावसामुळे तूर पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यात बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया न करता पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर तसेच पानबसन जमिनीवरील तूर पिकावर अधिक प्रमाणात मर रोग आढळून आला. मर रोग हा तूर पिकासाठी घातक आहे. हा रोग जमिनीतून उद्भवतो. मागील पिकाचे अवशेषामध्ये बुरशीचे वास्तव्य असल्यास पुढील वर्षीच्या तूर पिकात हा रोग येतो. हा रोग मुख्यत: पीक रोप अवस्थेत, फुलोऱ्यावर असताना तसेच शेंगा धरण्याच्या कालावधीत आढळतो. फुलोरा व शेंगा धरण्याच्या कालावधीत रोगाची लागण झाल्यास काही वेळा १०० टक्केपर्यंत नुकसान होते. फ्युजारियम आॅक्झीस्पोरम (उडम) या बुरशीमुळे हा रोग होतो. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुलूल होतात. पिकास पाणी देऊनही पाण्याचे वहन या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे थांबल्याने झाडांच्या वरच्या भागात पाणी पोहोचत नाही. यामुळे पाने पिवळी पडतात व नंतर झाड मरते. झाडाची मूळे उपटून पाहिल्यास ते इतर सशक्त झाडांप्रमाणेच असतात; पण त्याचा उभा काप घेतल्यास त्यात मुळाचे झायलम-उती काळी पडलेली दिसते. एका वर्षात ही बुरशी २७५ सेंमीपर्यंत जमिनीत पसरते व ३ ते ८ वर्षेपर्यंत पीक नसताना पिकाच्या अवशेषामध्ये वास्तव्य करू शकते. यामुळे तुरीचे पीक वारंवार एका ठिकाणी घेतल्यास रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. काही विशिष्ट ठिकाणी मर रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. यावरून तेथे बुरशीची संख्या अधिक असल्याचे समजावे. या बुरशीजन्य मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी वेळीच उपाययोजना करणे तथा रोगाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही केंद्राद्वारे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी) रोग आढळताच डवरणी तसेच बुरशीनाशकाची ड्रेचिंग गरजेची पिकांची फेरपालट करणे, तुरीनंतर ज्वारी पिकाची फेरपालट वा ज्वारीचे आंतरिक फायदेशिर आढळून येते. उन्हाळ्यात खोल नांगरटी करावी. मर रोगाची लागण झाल्यास त्वरित डवरणी करणे गरजेचे आहे. डवरणी केल्यास जमिनीमध्ये हवा खेळती ठेवता येते. कॉपर आॅक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून तूर पिकाच्या बुडाशी ड्रेंचिग करावे. या उपाययोजना केल्यास मर रोगावर नियंत्रण मिळविता येते. तूर पिकावर येणारा दुसरा रोग म्हणजे खोडावरील करपा होय. यामध्ये कोलोटोट्रिकम या बुरशीमुळे खोडावर तसेच फांद्यांवर काळ्या करड्या रंगाचे डाग पडतात व पीक करपल्यासारखे दिसते. या रोगाची तिव्रता अधिक असल्यास झाडे वाळतात. या रोगाच्या व्यवस्थापनेसाठी रोगट झाडांना उपटून जाळणे गरजेचे असते. मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणे गरजेचे असते. फायटोप्थोरा करपा हा रोग फायटोप्थोरा बुरशीमुळे होतो. अधिक व संततधार पाऊस या बुरशीला पोषक असतो. ८० टक्के आर्द्रता व २२- २५ सेमी तापमान रोग वाढण्याचे कारण ठरते. यामुळे पानावर ओलसर चट्टे, खोडावर तपकिरी व गर्द तपकिरी चट्टे आढळतात. ते वाढून खोडाभोवती खोलगट भाग तयार होतो. याचे व्यवस्थापनासाठी पाण्याचा निचरा गरजेचा आहे. या रोगाचा रोप अवस्थेतही प्रादुर्भाव आढळतो. यावेळी फॅसीटील अ‍ेएल या बुरशीनाशकाची २० ग्रॅम वा मेटॅलॅक्झिल २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.