शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

दीप पर्वासाठी सज्ज मिष्टान्न ‘अनहेल्दी’?

By admin | Updated: October 22, 2014 23:21 IST

हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून दिवाळीचा उल्लेख केला जातो़ गरीब-श्रीमंत सर्वच हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी खटाटोप करीत असतो़ दिवाळी म्हटली की, विविध पक्वान्नाचा

प्रशांत हेलोंडे - वर्धाहिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून दिवाळीचा उल्लेख केला जातो़ गरीब-श्रीमंत सर्वच हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी खटाटोप करीत असतो़ दिवाळी म्हटली की, विविध पक्वान्नाचा आस्वाद आलाच! अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ दिवाळी सणासाठी तयार केले जातात़ बाजारपेठाही मिष्टान्नांनी सजलेल्या दिसतात़ सणोत्सवात कुणाच्या आरोग्याला अपाय होऊ नये म्हणून बाजारातील खाद्यपदार्थांची तपासणी अनिवार्य केली आहे; पण जिल्ह्यात यंदा बाजारातील खाद्य पदार्थ व मिष्टान्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालाची तपासणीच झाली नसल्याचे समोर आले आहे़दिवाळी सणाची चाहुल लागताच मिठाईच्या बाजारातील हालचालींना वेग येतो़ महिनाभरापूर्वीपासून कच्चा माल बुक करणे, जिल्ह्यात वा परिसरातील ग्रामीण भागातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होत नसल्यास दुसऱ्या राज्यातून दूध, खवा, पनीर, मैदा आदी पदार्थ मागविणे सुरू होते़ हा माल पोहोचण्यासही बराच कालावधी लागतो़ यामुळे आधीच आॅर्डर दिली जाते़ मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची मागणी राहत असल्याने याच काळात भेसळीच्या प्रमाणातही वाढ होते़ सर्वच पदार्थांमध्ये सर्रास भेसळ केली जाते़ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते़ अन्नपदार्थांमध्ये होणारी ही भेसळ नागरिकांच्या जीविताला धोकादायक ठरते़ हा प्रकार लक्षात घेऊनच शासनाने सणोत्सवामध्ये बाजारात उपलब्ध होणारे मिष्टान्न, संबंधित कच्चा माल यांची तपासणी करावी, भेसळयुक्त माल आढळल्यास तो जप्त करावा, असे कडक निर्देश अन्न व औषधी प्रशासन विभागाला दिले आहेत़ यामुळेच अन्न व औषधी प्रशासन विभागाद्वारे दिवाळीपूर्वी तपासणी मोहीम हाती घेतली जाते़ भेसळयुक्त पदार्थांपासून तयार मिष्टान्नातून विषबाधा होऊ नये म्हणून बाजारातील उपहारगृह, हॉटेल, स्वीटमार्ट आदींची तपासणी केली जाते़ यात दूध, खवा, पनीर, मैदा यासह अन्य दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली जाते़ भेसळ केलेले पदार्थ आढळून आल्यास ते जप्त केले जातात़ शिवाय मिष्टान्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचीही तपासणी केली जाते़ दिवाळीपूर्वी संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविली जाते; मात्र वर्धा जिल्ह्यात यंदा ही मोहीम राबविण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे़ यामुळे शहरासह जिल्ह्यातील अन्य भागात मिळणारे मिष्टान्न नागरिकांच्या आरोग्यास योग्य असतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ एकवेळ शहरातील उपहारगृह, स्वीटमार्ट तपासण्यात आले असतील; पण जिल्ह्यातील अन्य ग्रामीण भागातील दुकानांची तपासणी झाली काय, हा प्रश्नच आहे़ ग्रामीण भागात मिष्टान्नामध्ये सर्रास भेसळ केली जाते़ मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार केले जात असल्याने त्यांचा दर्जाही सूमार असतो़ यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे़ जिल्ह्यात लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात खवा आयात केला जातो़ या खव्याची तपासणी होते काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ या खव्यामध्ये विविध पदार्थांची भेसळ केली जात असल्याचे विके्रतेच नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात़ याबाबत माहितीसाठी अन्न व औषधी प्रशासनाचे मनोज तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता़