शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

दीप पर्वासाठी सज्ज मिष्टान्न ‘अनहेल्दी’?

By admin | Updated: October 22, 2014 23:21 IST

हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून दिवाळीचा उल्लेख केला जातो़ गरीब-श्रीमंत सर्वच हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी खटाटोप करीत असतो़ दिवाळी म्हटली की, विविध पक्वान्नाचा

प्रशांत हेलोंडे - वर्धाहिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून दिवाळीचा उल्लेख केला जातो़ गरीब-श्रीमंत सर्वच हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी खटाटोप करीत असतो़ दिवाळी म्हटली की, विविध पक्वान्नाचा आस्वाद आलाच! अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ दिवाळी सणासाठी तयार केले जातात़ बाजारपेठाही मिष्टान्नांनी सजलेल्या दिसतात़ सणोत्सवात कुणाच्या आरोग्याला अपाय होऊ नये म्हणून बाजारातील खाद्यपदार्थांची तपासणी अनिवार्य केली आहे; पण जिल्ह्यात यंदा बाजारातील खाद्य पदार्थ व मिष्टान्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालाची तपासणीच झाली नसल्याचे समोर आले आहे़दिवाळी सणाची चाहुल लागताच मिठाईच्या बाजारातील हालचालींना वेग येतो़ महिनाभरापूर्वीपासून कच्चा माल बुक करणे, जिल्ह्यात वा परिसरातील ग्रामीण भागातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होत नसल्यास दुसऱ्या राज्यातून दूध, खवा, पनीर, मैदा आदी पदार्थ मागविणे सुरू होते़ हा माल पोहोचण्यासही बराच कालावधी लागतो़ यामुळे आधीच आॅर्डर दिली जाते़ मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची मागणी राहत असल्याने याच काळात भेसळीच्या प्रमाणातही वाढ होते़ सर्वच पदार्थांमध्ये सर्रास भेसळ केली जाते़ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते़ अन्नपदार्थांमध्ये होणारी ही भेसळ नागरिकांच्या जीविताला धोकादायक ठरते़ हा प्रकार लक्षात घेऊनच शासनाने सणोत्सवामध्ये बाजारात उपलब्ध होणारे मिष्टान्न, संबंधित कच्चा माल यांची तपासणी करावी, भेसळयुक्त माल आढळल्यास तो जप्त करावा, असे कडक निर्देश अन्न व औषधी प्रशासन विभागाला दिले आहेत़ यामुळेच अन्न व औषधी प्रशासन विभागाद्वारे दिवाळीपूर्वी तपासणी मोहीम हाती घेतली जाते़ भेसळयुक्त पदार्थांपासून तयार मिष्टान्नातून विषबाधा होऊ नये म्हणून बाजारातील उपहारगृह, हॉटेल, स्वीटमार्ट आदींची तपासणी केली जाते़ यात दूध, खवा, पनीर, मैदा यासह अन्य दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली जाते़ भेसळ केलेले पदार्थ आढळून आल्यास ते जप्त केले जातात़ शिवाय मिष्टान्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचीही तपासणी केली जाते़ दिवाळीपूर्वी संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविली जाते; मात्र वर्धा जिल्ह्यात यंदा ही मोहीम राबविण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे़ यामुळे शहरासह जिल्ह्यातील अन्य भागात मिळणारे मिष्टान्न नागरिकांच्या आरोग्यास योग्य असतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ एकवेळ शहरातील उपहारगृह, स्वीटमार्ट तपासण्यात आले असतील; पण जिल्ह्यातील अन्य ग्रामीण भागातील दुकानांची तपासणी झाली काय, हा प्रश्नच आहे़ ग्रामीण भागात मिष्टान्नामध्ये सर्रास भेसळ केली जाते़ मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार केले जात असल्याने त्यांचा दर्जाही सूमार असतो़ यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे़ जिल्ह्यात लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात खवा आयात केला जातो़ या खव्याची तपासणी होते काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ या खव्यामध्ये विविध पदार्थांची भेसळ केली जात असल्याचे विके्रतेच नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात़ याबाबत माहितीसाठी अन्न व औषधी प्रशासनाचे मनोज तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता़