शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

कठड्यांविना पूल ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: April 23, 2015 01:50 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने रस्ते व पुलांची निर्मिती केली जाते़ ...

वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने रस्ते व पुलांची निर्मिती केली जाते़ जिल्ह्यात तीनही शासकीय विभागांमार्फत तयार करण्यात आलेले रस्ते, पूल आहेत; पण बहुतांश पुलांवर कठडेच नाहीत़ यामुळे कठड्यांविना हे पूल धोक्याचे ठरत आहेत़ अपघाताचा धोका टाळण्याकरिता संबंधित विभागांनी आपापल्या पुलांवर कठडे बसवावेत, अशी मागणी सामान्यांतून करण्यात येत आहे़ रहदारी सुलभ व्हावी म्हणून रस्त्यांची निर्मिती होते़ आवागमन प्रभावित होऊ नये म्हणून ठेंगणे पूल काढून उंच पुलांचे बांधकाम केले जाते; पण या पुलांवर कठडे लावण्याकडे कानाडोळा केला जात असल्याचेच दिसते वा क्षतिग्रस्त झालेले कठडे बदलण्याकडे दुर्लक्ष केले जाते़ या प्रकारामुळे ग्रामींणांसह शहरी नागरिकांचीही रहदारी धोक्यात आल्याचे चित्र आहे़ पुलगाव शहरात नागपूर ते औरंगाबाद एक्स्प्रेस वे ची निर्मिती करून उंच पूल बांधण्यात आले़ या पुलांना कठडेही लावण्यात आले; पण वर्धा नदीवर असलेल्या जुन्या पुलाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले़ सध्या विटाळा, झाडगाव, मंगरूळ, निंबोली, धामणगाव आदी ठिकाणी जाण्याकरिता तसेच देवगाव येथून आर्वीकडे जाणाऱ्या वाहनांद्वारे या पुलाचा वापर होतो़ सदर पुलावर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे़ कुठलीही प्रकाश व्यवस्था रात्री नसल्याने सर्व काळोख पसरलेला असतो़ शिवाय या पुलाला कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ ठेंगणा असलेला हा पूल जुना आहे़ सध्या मुख्य वाहतूक या पुलावरून होत नसली तरी बहुतांश ग्रामस्थांना याच पुलाचा वापर करावा लागतो़ असाच प्रकार आर्वी ते अंजनगाव (सुर्जी) मार्गावर पाहावयास मिळतो़ या मार्गावर वर्धा नदीवर पुलांचे बांधकाम करण्यात आलेले आहे; पण एकाही ठिकाणी पुलाला कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ नव्याने बांधलेले पुलही कठड्यांविनाच ठेवल्याने एकूण बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते़ आर्वी येथून अमरावती जिल्ह्यात जाण्याकरिता हा जवळचा मार्ग आहे़ शिवाय या मार्गावर टाकरखेडे, जऊरवाडा, जगागिरपूर ही देवस्थाने आहेत़ यामुळे भाविकांची नेहमी वर्दळ असते़ या मार्गावरील पुलांना कठडे लावणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसते़ पवनार या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या गावातही हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो़ नागपूर ते वर्धा या राज्य मार्गावर असलेल्या पवनार येथे धाम नदीवर उंच पुलाची निर्मिती करण्यात आली़ या पुलाला कठडे लावण्यात आले; पण जुन्या ठेंगण्या पुलावरील कठडे काढून घेण्यात आले़ वास्तविक, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम, नदीवर जाताना जुन्या पुलाचा वापर केला जातो़ लहान पुलावरून अनेक वाहनेही ये-जा करतात़ यामुळे या पुलावर कठडे असणे गरजेचे आहे; पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुलांवर कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देत नागरिकांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी पुलांना कठडे लावणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)ग्रामीण भागात होते केवळ पुलांची निर्मिती; कठड्यांचा पडतोय विसरगत २०१३-१४ च्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठेंगणे असलेले पूल वाहून गेलेत़ अनेक रपट्यांची वाताहत झाली़ यानंतर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागांनी आपापल्या हद्दीतील पुलांचे बांधकाम केले़ यात बहुतांश पुलांना कठडेच लावण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे़ शिवाय जुन्या कठडे नसलेल्या पुलांकडेही दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे़ यामुळे ग्रामीण भागातील रहदारी धोक्यात आली आहे़कठडे नसलेल्या पुलांवरून वाहनांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे़ अनेकदा या पुलांवरून वाहने कोसळून अपघात झाले आहेत़ या अपघातानंतरही प्रशासनाला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़