शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कठड्यांविना पूल ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: April 23, 2015 01:50 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने रस्ते व पुलांची निर्मिती केली जाते़ ...

वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने रस्ते व पुलांची निर्मिती केली जाते़ जिल्ह्यात तीनही शासकीय विभागांमार्फत तयार करण्यात आलेले रस्ते, पूल आहेत; पण बहुतांश पुलांवर कठडेच नाहीत़ यामुळे कठड्यांविना हे पूल धोक्याचे ठरत आहेत़ अपघाताचा धोका टाळण्याकरिता संबंधित विभागांनी आपापल्या पुलांवर कठडे बसवावेत, अशी मागणी सामान्यांतून करण्यात येत आहे़ रहदारी सुलभ व्हावी म्हणून रस्त्यांची निर्मिती होते़ आवागमन प्रभावित होऊ नये म्हणून ठेंगणे पूल काढून उंच पुलांचे बांधकाम केले जाते; पण या पुलांवर कठडे लावण्याकडे कानाडोळा केला जात असल्याचेच दिसते वा क्षतिग्रस्त झालेले कठडे बदलण्याकडे दुर्लक्ष केले जाते़ या प्रकारामुळे ग्रामींणांसह शहरी नागरिकांचीही रहदारी धोक्यात आल्याचे चित्र आहे़ पुलगाव शहरात नागपूर ते औरंगाबाद एक्स्प्रेस वे ची निर्मिती करून उंच पूल बांधण्यात आले़ या पुलांना कठडेही लावण्यात आले; पण वर्धा नदीवर असलेल्या जुन्या पुलाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले़ सध्या विटाळा, झाडगाव, मंगरूळ, निंबोली, धामणगाव आदी ठिकाणी जाण्याकरिता तसेच देवगाव येथून आर्वीकडे जाणाऱ्या वाहनांद्वारे या पुलाचा वापर होतो़ सदर पुलावर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे़ कुठलीही प्रकाश व्यवस्था रात्री नसल्याने सर्व काळोख पसरलेला असतो़ शिवाय या पुलाला कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ ठेंगणा असलेला हा पूल जुना आहे़ सध्या मुख्य वाहतूक या पुलावरून होत नसली तरी बहुतांश ग्रामस्थांना याच पुलाचा वापर करावा लागतो़ असाच प्रकार आर्वी ते अंजनगाव (सुर्जी) मार्गावर पाहावयास मिळतो़ या मार्गावर वर्धा नदीवर पुलांचे बांधकाम करण्यात आलेले आहे; पण एकाही ठिकाणी पुलाला कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ नव्याने बांधलेले पुलही कठड्यांविनाच ठेवल्याने एकूण बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते़ आर्वी येथून अमरावती जिल्ह्यात जाण्याकरिता हा जवळचा मार्ग आहे़ शिवाय या मार्गावर टाकरखेडे, जऊरवाडा, जगागिरपूर ही देवस्थाने आहेत़ यामुळे भाविकांची नेहमी वर्दळ असते़ या मार्गावरील पुलांना कठडे लावणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसते़ पवनार या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या गावातही हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो़ नागपूर ते वर्धा या राज्य मार्गावर असलेल्या पवनार येथे धाम नदीवर उंच पुलाची निर्मिती करण्यात आली़ या पुलाला कठडे लावण्यात आले; पण जुन्या ठेंगण्या पुलावरील कठडे काढून घेण्यात आले़ वास्तविक, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम, नदीवर जाताना जुन्या पुलाचा वापर केला जातो़ लहान पुलावरून अनेक वाहनेही ये-जा करतात़ यामुळे या पुलावर कठडे असणे गरजेचे आहे; पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुलांवर कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देत नागरिकांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी पुलांना कठडे लावणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)ग्रामीण भागात होते केवळ पुलांची निर्मिती; कठड्यांचा पडतोय विसरगत २०१३-१४ च्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठेंगणे असलेले पूल वाहून गेलेत़ अनेक रपट्यांची वाताहत झाली़ यानंतर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागांनी आपापल्या हद्दीतील पुलांचे बांधकाम केले़ यात बहुतांश पुलांना कठडेच लावण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे़ शिवाय जुन्या कठडे नसलेल्या पुलांकडेही दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे़ यामुळे ग्रामीण भागातील रहदारी धोक्यात आली आहे़कठडे नसलेल्या पुलांवरून वाहनांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे़ अनेकदा या पुलांवरून वाहने कोसळून अपघात झाले आहेत़ या अपघातानंतरही प्रशासनाला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़