शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

शोषणरहित समाजाची निर्मिती हाच संविधानाचा खरा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:32 IST

भारतीय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. या संविधानामुळे भारताची एकात्मता व अखंडता टिकून आहे. सर्व भारतीयांना मानवी हक्क व समान सधी संविधानामुळे प्राप्त झाली आहे; पण काही सांप्रदायिक व विघातक शक्ती समाताधिष्ठीत समाज निर्मितीमुळे आदर्श रूप असलेले भारतीय संविधान बदलून जुनी भेदाभेदाची व्यवस्था आणू पाहत आहे.

ठळक मुद्देबी.जी. कोळसे पाटील : ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. या संविधानामुळे भारताची एकात्मता व अखंडता टिकून आहे. सर्व भारतीयांना मानवी हक्क व समान सधी संविधानामुळे प्राप्त झाली आहे; पण काही सांप्रदायिक व विघातक शक्ती समाताधिष्ठीत समाज निर्मितीमुळे आदर्श रूप असलेले भारतीय संविधान बदलून जुनी भेदाभेदाची व्यवस्था आणू पाहत आहे. भांडवलदार व पुरोहितशाही यांच्या युतीतून संविधानाच्या मूळ उद्देशाला धोका पोहोचविला जात आहे. शोषणरहित समाजाची निर्मिती हाच संविधानाचा खरा अर्थ आहे, असे मत सुप्रसिद्ध विचारवंत माजी न्यायमूर्ती बी.सी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख जयंती समारोहानिमित्त यशवंत महा. च्या प्रांगणात ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख तर अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत, प्राचार्य डॉ. विलास देशमुख उपस्थित होते. न्यायमूर्ती कोळसे पाटील पूढे म्हणाले की, देशात सध्या असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असंवेदनशीलता वाढीस लागून विषमतेला पूरक अनेक प्रकार वारंवार घडताना दिसत आहे. पुरोगामी विचार संपविण्याचे कारस्थाने रचली जात असून पुरोगामी विचारवंताचा खून केला जात आहे. आपण वेळीच जागे झाला नाही व अन्यायाचा प्रतिकार केला नाही, तर देश संकटात आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.प्रा. सुरेश देशमुख म्हणाले की, भारतीय संविधानाची विशिष्ट अशी संस्कृती आहे. ही समता, स्वातंत्र्य व न्यायाची आहे. या संस्कृतीला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक भारतीयाने प्रयत्न केले पाहिजे. बापूरावजी देशमुख यांचे राजकीय कार्य व विचार त्यांनी विषद केले.प्रारंभी शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. देशमुख यांनी समाज प्रबोधनासाठी अशा परिवर्तनवादी विचारांची गरज प्रतिपादित केली. याप्रसंगी माजी आमदार वसंतराव कार्लेकर, बा.दे. फाऊंडेशनचे अध्यक्ष शरद देशमुख, समीर देशमुख, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. किशोर अहेर, स्वाती देशमुख, प्रतिभा निशाणे, शशांक घोडमारे, किशोर माथनकर, सुनील राऊत, प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत, प्रदीप दाते, डॉ. कासारे उपस्थित होते. संचालन डॉ. के.पी. निंबाळकर यांनी केले तर आभार सतीश राऊत यांनी मानले.१९७५ च्या आणीबाणीपेक्षा बिकट परिस्थिती१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्याला संवैधानिक आधार होता; पण विद्यमान सरकारने लोकांचे संवैधानिक अधिकार गुंडाळून ठेवत देशावर आणीबाणी लागू केल्याची बोचरी टीकाही माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी केली. ज्या लोकांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता, ते आज देशावर राज्य करीत आहे. घटनेची मोडतोड करीत आहे. ज्यांचे देशाशी कमिटमेंट नाही, असे लोक नेतृत्व करीत आहे. अशा लोकांच्या माध्यमातून बहुजन समाजाला नेहमीच आणीबाणीच्या स्थितीत अडकविण्याचा प्रयत्न होतो. भीतीदायक वातावरण निर्माण केले जाते. मोदींवर टिका करणे व त्यांच्याविरूद्ध संघर्ष उभा करण्यासाठी विरोधकांतही स्वच्छ चारित्र्यांची माणसं उरलेली नसल्याची टीकाही त्यांनी केली.