शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

शोषणरहित समाजाची निर्मिती हाच संविधानाचा खरा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:32 IST

भारतीय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. या संविधानामुळे भारताची एकात्मता व अखंडता टिकून आहे. सर्व भारतीयांना मानवी हक्क व समान सधी संविधानामुळे प्राप्त झाली आहे; पण काही सांप्रदायिक व विघातक शक्ती समाताधिष्ठीत समाज निर्मितीमुळे आदर्श रूप असलेले भारतीय संविधान बदलून जुनी भेदाभेदाची व्यवस्था आणू पाहत आहे.

ठळक मुद्देबी.जी. कोळसे पाटील : ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. या संविधानामुळे भारताची एकात्मता व अखंडता टिकून आहे. सर्व भारतीयांना मानवी हक्क व समान सधी संविधानामुळे प्राप्त झाली आहे; पण काही सांप्रदायिक व विघातक शक्ती समाताधिष्ठीत समाज निर्मितीमुळे आदर्श रूप असलेले भारतीय संविधान बदलून जुनी भेदाभेदाची व्यवस्था आणू पाहत आहे. भांडवलदार व पुरोहितशाही यांच्या युतीतून संविधानाच्या मूळ उद्देशाला धोका पोहोचविला जात आहे. शोषणरहित समाजाची निर्मिती हाच संविधानाचा खरा अर्थ आहे, असे मत सुप्रसिद्ध विचारवंत माजी न्यायमूर्ती बी.सी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख जयंती समारोहानिमित्त यशवंत महा. च्या प्रांगणात ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख तर अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत, प्राचार्य डॉ. विलास देशमुख उपस्थित होते. न्यायमूर्ती कोळसे पाटील पूढे म्हणाले की, देशात सध्या असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असंवेदनशीलता वाढीस लागून विषमतेला पूरक अनेक प्रकार वारंवार घडताना दिसत आहे. पुरोगामी विचार संपविण्याचे कारस्थाने रचली जात असून पुरोगामी विचारवंताचा खून केला जात आहे. आपण वेळीच जागे झाला नाही व अन्यायाचा प्रतिकार केला नाही, तर देश संकटात आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.प्रा. सुरेश देशमुख म्हणाले की, भारतीय संविधानाची विशिष्ट अशी संस्कृती आहे. ही समता, स्वातंत्र्य व न्यायाची आहे. या संस्कृतीला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक भारतीयाने प्रयत्न केले पाहिजे. बापूरावजी देशमुख यांचे राजकीय कार्य व विचार त्यांनी विषद केले.प्रारंभी शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. देशमुख यांनी समाज प्रबोधनासाठी अशा परिवर्तनवादी विचारांची गरज प्रतिपादित केली. याप्रसंगी माजी आमदार वसंतराव कार्लेकर, बा.दे. फाऊंडेशनचे अध्यक्ष शरद देशमुख, समीर देशमुख, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. किशोर अहेर, स्वाती देशमुख, प्रतिभा निशाणे, शशांक घोडमारे, किशोर माथनकर, सुनील राऊत, प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत, प्रदीप दाते, डॉ. कासारे उपस्थित होते. संचालन डॉ. के.पी. निंबाळकर यांनी केले तर आभार सतीश राऊत यांनी मानले.१९७५ च्या आणीबाणीपेक्षा बिकट परिस्थिती१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्याला संवैधानिक आधार होता; पण विद्यमान सरकारने लोकांचे संवैधानिक अधिकार गुंडाळून ठेवत देशावर आणीबाणी लागू केल्याची बोचरी टीकाही माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी केली. ज्या लोकांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता, ते आज देशावर राज्य करीत आहे. घटनेची मोडतोड करीत आहे. ज्यांचे देशाशी कमिटमेंट नाही, असे लोक नेतृत्व करीत आहे. अशा लोकांच्या माध्यमातून बहुजन समाजाला नेहमीच आणीबाणीच्या स्थितीत अडकविण्याचा प्रयत्न होतो. भीतीदायक वातावरण निर्माण केले जाते. मोदींवर टिका करणे व त्यांच्याविरूद्ध संघर्ष उभा करण्यासाठी विरोधकांतही स्वच्छ चारित्र्यांची माणसं उरलेली नसल्याची टीकाही त्यांनी केली.