शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

नऊ लाखांची उचल करून कंपनी परांगदा

By admin | Updated: May 21, 2015 02:00 IST

येथील पाच किमी वन्यजमिनीला कुंपण घालण्याचे कंत्राट स्थानिक वनविभागाने नागपूरच्या एका कंपनीला सन २०११ मध्ये दिले.

रितेश वालदे वर्धायेथील पाच किमी वन्यजमिनीला कुंपण घालण्याचे कंत्राट स्थानिक वनविभागाने नागपूरच्या एका कंपनीला सन २०११ मध्ये दिले. त्या कंपनीने केवळ दीड किमी क्षेत्राला सौरकुंपण घालून चक्क नऊ लाख रूपयांची उचल केली. उर्वरित भागाला कुंपण न घालताच कंत्राट दिलेली कंपनी परागंदा झाल्याने वनविभागाचा निधी बुडाला. हा सर्व प्रकार माहिती अधिकारात उघड झाला. हिंगणी वनपरिक्षेत्रातील वन्यजमिनीला सौरऊर्जा कुंपण घालण्याची योजना सन २०१०-११ या आर्थिक वर्षात समोर आली. या योजनेंंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती बोरी (कोकाटे) च्या वतीने सन २०११-१२ या आर्थिक वर्षात ५ हजार मीटर लांबीचे सौरउर्जा कुंपण वनजमिनीला घालण्याचा प्रस्ताव पुढे केला. त्याला मंजुरी मिळताच वनविभागाने नागपूरच्या धंतोली भागातील कानेट्राम सपाटे ब्लॉक्स साठेमार्ग या कंपनीसोबत ५ हजार मीटर कुंपणाचा करार केला. या कुंपणाकरिता एकूण खर्च १९ लाख ४९ हजार इतका करण्यात येणार होता. झालेल्या करारानुसार कुंपणाचे क्षेत्र ५ हजार मीटर, कुंपणाची उंची ९ फुट त्यापैकी २ फुट जमिनीत व ७ फुट जमिनीच्या वर अशी होती. या कुंपणाला एका विशिष्ट कंपनीची बॅटरी लावण्याची देखील नोंद करारात आहे. कुंपणाची हमी ५ वर्षाची, वॉरंटी १० वर्षाची, २ वर्ष विनामुल्य सेवा अशा अटी देखील करारामध्ये ठेवण्यात आल्या. ४५ दिवसात काम पूर्ण करण्याचा करार झाला. प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्याने ३० टक्के रक्कम, काम सुरू असताना ५० टक्के रक्कम व काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक तपासणी अहवाल प्राप्त होताच उर्वरित २० टक्के रक्कम अदा करण्यात येईल, अशी नोंद करारात आहे. त्यानुसार ३१ मार्च २०१२ ला हा करार पार पडला. त्या करारावर विशाल भागे, अनिल चौधरी या दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. कामाला सुरूवात झाल्यानंतर वनविभागाने ३१ मार्च २०१२ ला २ लाख, २७ एप्रिल २०१२ ला ४ लाख तर २३ आॅक्टोबर २०१२ ला ३ लाख असे ९ लाख रूपये कुंपणाचे काम करणाऱ्या कंपनीला चुकते केले. परंतु कंपनीने ४५ दिवसाच्या कालावधीत केवळ दीड कि़मी. जागेलाच सौरउर्जा कुंपण घातले. त्या कुंपणावर अंदाजे दीड लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित पैसा घेऊन कंपनी फरार झाली आहे. या कंपनीचा वनविभाग शोध घेऊन थकली. पण कंपनी व कंपनीचा मालक वनविभागाला आजपर्यंत आढळलेला नाही. ज्यावेळी कुंपणाचा करार झाला. त्यावेळी हिंगणी वनपरिक्षेत्रात कार्यरत अधिकारी कोणत्या ना कोणत्या प्रकरणात निलंबित झाले तर काही अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या. सध्या कार्यरत अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास उत्तर मिळत नाही. माहितीच्या अधिकारात संपूर्ण प्रकरणाची विचारणा केल्यावर उत्तर देण्यास येथे टाळाटाळ होते. हा संपूर्ण घडलेला प्रकार माहितीच्या अधिकारात मिळालेल्या उत्तरामध्ये उघडकीस आला आहे. दीड लाखाचे काम करून साडे सात लाख कंपनीने लुटले.