शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

जिल्ह्यात आम आदमी विमा योजना कागदावरच

By admin | Updated: September 8, 2014 01:33 IST

ग्रामीण भागातील शेतमजूर तथा भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली.

अमोल सोटे आष्टी (शहीद)ग्रामीण भागातील शेतमजूर तथा भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली. ही योजना राबविताना संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव आहे. सन २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात केवळ ३० व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.आम आदमी विमा योजनेसाठी केंद्राकडून शंभर तर राज्याकडून शंभर रुपये असा एकूण २०० रुपयांचा वार्षिक हप्ता आहे. योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी, शेतमजुरांचे अर्ज तलाठ्यांमार्फत भरावे लागतात. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, अवयव निकामी झाल्यास ३७ हजार ५०० व दोन्ही अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपयांचे विमा संरक्षण दिल्या जाते. गत वर्षी एप्रिल २०१३ पासून मार्च २०१४ पर्यंत आष्टी तालुक्यात १७ हजार ४२५ कुटुंब, आर्वीत २२ हजार, कारंजात १९ हजार, देवळीत १३ हजार ४७०, वर्धेत १७ हजार ९००, सेलूत १२ हजार ६८५, हिंगणघाट येथे १९ हजार ४३०, आणि समुद्रपूर तालुक्यातील ११ हजार कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले.या योजनेत पात्र झालेल्याचे पाल्य इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिमहिना शंभर रुपये प्रमाणे १० महिन्याचे एक हजार रुपये देण्यात येते. जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल केले; परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या हाती एक रुपयाही पडला नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने शासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शिष्यवृत्तीचा पाठपुरावा न झाल्यामुळे संबंधित शाळेचे विद्यार्थी व त्यांचे पालक, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांना भेटून माझ्या पाल्याच्या शिष्यवृत्तीचे काय झाले असा प्रश्न विचारत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय ही योजना योग्य रित्या राबविण्यासाठी कुचराई करीत असल्याची माहिती आहे. शासनाने तत्काळ लाभ देण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे.