शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

जिल्ह्यात आम आदमी विमा योजना कागदावरच

By admin | Updated: September 8, 2014 01:33 IST

ग्रामीण भागातील शेतमजूर तथा भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली.

अमोल सोटे आष्टी (शहीद)ग्रामीण भागातील शेतमजूर तथा भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली. ही योजना राबविताना संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव आहे. सन २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात केवळ ३० व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.आम आदमी विमा योजनेसाठी केंद्राकडून शंभर तर राज्याकडून शंभर रुपये असा एकूण २०० रुपयांचा वार्षिक हप्ता आहे. योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी, शेतमजुरांचे अर्ज तलाठ्यांमार्फत भरावे लागतात. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, अवयव निकामी झाल्यास ३७ हजार ५०० व दोन्ही अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपयांचे विमा संरक्षण दिल्या जाते. गत वर्षी एप्रिल २०१३ पासून मार्च २०१४ पर्यंत आष्टी तालुक्यात १७ हजार ४२५ कुटुंब, आर्वीत २२ हजार, कारंजात १९ हजार, देवळीत १३ हजार ४७०, वर्धेत १७ हजार ९००, सेलूत १२ हजार ६८५, हिंगणघाट येथे १९ हजार ४३०, आणि समुद्रपूर तालुक्यातील ११ हजार कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले.या योजनेत पात्र झालेल्याचे पाल्य इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिमहिना शंभर रुपये प्रमाणे १० महिन्याचे एक हजार रुपये देण्यात येते. जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल केले; परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या हाती एक रुपयाही पडला नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने शासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शिष्यवृत्तीचा पाठपुरावा न झाल्यामुळे संबंधित शाळेचे विद्यार्थी व त्यांचे पालक, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांना भेटून माझ्या पाल्याच्या शिष्यवृत्तीचे काय झाले असा प्रश्न विचारत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय ही योजना योग्य रित्या राबविण्यासाठी कुचराई करीत असल्याची माहिती आहे. शासनाने तत्काळ लाभ देण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे.