शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

उन्हाळ्यातच होतोय वृक्षांचा कोळसा

By admin | Updated: April 28, 2016 02:02 IST

पावसाळा सुरू होताच शासनामार्फत वृक्ष लागवडीसाठी विविध कार्यक्रम आखले जातात; पण संवर्धनाची विशेष काळजी घेतली जात नाही.

लाकूड चोर सक्रीय : वन विभागासह बांधकाम विभागाचेही दुर्लक्षवर्धा : पावसाळा सुरू होताच शासनामार्फत वृक्ष लागवडीसाठी विविध कार्यक्रम आखले जातात; पण संवर्धनाची विशेष काळजी घेतली जात नाही. परिणामी, खर्च व्यर्थ जातो. शिवाय शासकीय विभाग लाकूड चोरांवर अंकुश लावण्यातही अपयशी ठरत आहे. यामुळे उन्हाळ्यातच मोठ-मोठ्या वृक्षांचा कोळसा होत असल्याचे दिसते. सध्या जिल्ह्यात सर्वत्र झाडांतूनच धूर निघत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.पर्यावरणाचा समतोल राखता यावा म्हणून वृक्ष लागवडीसह संवर्धन आणि वृक्षतोडीवर आळा घालण्याचे कार्य हाती घेतले जात आहे. असे असताना वृक्षतोड कमी होताना दिसत नाही. रस्त्याच्या कडेला असलेली महाकाय झाडेही लाकूड चोरांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसते. जिल्ह्यात अनेक मार्गांवरील झाडे उन्हाळ्यात पेटविली जातात. परिणामी, संपूर्ण झाड कोसळते. हे धराशाही झालेले झाड लाकूड चोर कापून नेतात. यात प्रशासनाला कुठलाही महसूल मिळत नाही आणि पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. काही झाडे धुरे पेटविल्याने जळत असल्याचे दिसते. वन व बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)अजस्त्र चिंचेचे झाड आगीच्या भक्ष्यस्थानीसेवाग्राम : मुख्य मार्गावरील अजस्त्र चिंचेचे झाड जळाल्याने कोसळले आहे. सेवाग्राम ते हमदापूर मार्गावर मोठ्या प्रमाणावर चिंंच, बाभूळ, आंबा आदी झाडे होती; पण गत दहा वर्षांच्या कालावधीत झाडे तोडण्याकडे शेतकरी व अन्य लोकांचा कल वाढला आहे. रस्त्याच्या दुतर्फा, बांधावरील झाडे यामुळे दिसेणासी झाली आहेत. उन्हाळ्यात धुरा पेटविण्याच्या नावाखाली मुद्दाम मोठ्या झाडांना आगी लावल्या जातात. या आगीमध्ये झाड जळून कोसळते. यानंतर ते इंधनासाठी घेऊन हातात. या प्रकारात सध्या वाढ झाली आहे. या परिसरातून दोन नद्या, नाले व बंधारे असून ओलिताची व्यवस्था आहे. झाडांचे प्रमाण अधिक असल्याने माकडांच्या झुंडीचे आश्रय स्थान होते. यामुळे शेतकरीही कंटाळले आहेत. यातूनच झाडे तोडण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे बोलले जात आहे. आता सर्वत्र भकास व रखरख वातावरण असून झाडाशिवाय पर्याय राहिलेला नाही.(वार्ताहर)