शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

‘गांधी को कैसे पढा जाये’ हेच मोठे आव्हान

By admin | Updated: August 26, 2016 02:07 IST

गांधीला वेगळ्या दृष्टीकोणातून समजण्याची आणि वाचण्याची गरज आहे. ‘गांधी को कैसे पढा जाये’, हे मोठे आव्हान आहे.

मनोज कुमार : ‘चला घडू या! देशासाठी’ या युवा श्रमसंस्कार शिबिराचा समारोपसेवाग्राम : गांधीला वेगळ्या दृष्टीकोणातून समजण्याची आणि वाचण्याची गरज आहे. ‘गांधी को कैसे पढा जाये’, हे मोठे आव्हान आहे. गांधी विचाराचा होत असलेला ऱ्हास आणि दुरूपयोग चिंतेचा विषय आहे. भौतिक व बाजारू मूल्यांना येत असलेले महत्त्व यामुळे गांधीला नव्या दृष्टीने बघण्याची गरज आहे, असे मत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय गांधी विद्यापीठाचे निदेशक डॉ. मनोज कुमार यांनी व्यक्त केले. गांधींच्या २०१९ ला होणाऱ्या १५० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचा एक भाग म्हणून नई तालीम समिती आणि गांधी स्मृती व दर्शन समिती राजघाट नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २३ आॅगस्ट दरम्यान नई तालीम आश्रम परिसरात ‘चला घडू या! देशासाठी’ युवा श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाच दिवसाच्या निवासी शिबिरात वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यातील ५३ महाविद्यालयीन, चळवळीतील आणि सामाजिक कार्याच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.समारोपीय कार्यक्रमात मगन संग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता यांनी गांधी समजून घ्यायचा असेल तर गतीची आणि विकासाची संकल्पना समजून घ्यावी लागेल. अति गतीमय विकासामुळे समाजातील अनेक घटक बाहेर फेकले जातात. कारागिर, लहान शेतकरी, कलाकार, मजूर वंचित होत जातात. त्यांना समजून घेण्याची गरज आहे. गतीमध्ये हा समाजाचा मोठा घटक वेगळा होतो व फक्त थोड्यांच्या वाट्याला सर्व येते. त्यामुळे समाजात आक्रोश निर्माण होतो. तो कधी हिंसात्मक पवित्रा घेईल, सांगता येत नाही. तेव्हा सांस्कृतिक, जीवन मूल्य जोपासणे गरजेचे आहे, असे संगितले. डॉ. सुगन बरंठ यांनी ग्रामविकास, ग्रामसभा व ग्रामस्वराज्य याचा अर्थ स्पष्ट करीत युवकांची भूमिका, कार्यदिशा किती महत्त्वाची आहे, हे सांगितले. प्रा. प्रदीप दासगुप्ता यांनी विज्ञान व वैज्ञानिक पद्धतीने चिकित्सा करीत विवेकाने सत्य समजून घेतले पाहिजे. गांधी, आंबेडकर, मार्क्स यांचे तत्वज्ञान समग्रतेने समजण्याची गरज आहे, असे सांगितले. डॉ. उल्हास जाजू यांनी स्वत:च्या जीवनानूभव व प्रसंगातून वेदनेचे नाते असेल तर कुठल्याही व्यवसायात असो, तुमच्यातील माणूस जागा असतो आणि तो प्रकट असतो, असे सांगितले. संचालन पुसदकर व अनुश्री दोडके यांनी केले तर आभार स्वाती दूधकोहळे यांनी मानले. शिबिराला शिवचरणसिंग ठाकूर, पवन भार्ई, रूपेश कडू, विनय करूळे, प्राजक्ता पुसदकर माथनकर आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)ग्राम विकासाच्या पैलूंवर चर्चाशिबिरात समूह चर्चा, फिल्म शो, स्लाईड शो, मैदानी व बौद्धिक खेळ, संवादात्मक व्याख्यान, श्रमदान, श्रमकार्य, नाट्य प्रस्तुती, सादरीकरण, चळवळीची व प्रेरणादायी गाणी, सफाई आणि कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी माध्यमातून गांधींच्या विचारांचा आणि त्यांच्या रचनात्मक कार्याचा परिचय करून देण्यात आला. ग्राम विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. मार्गदर्शकांनीही भाषण न करता संवाद आणि स्वत:च्या जीवानुभवाच्या आधारे मांडणी केली.डॉ. प्रवीण खैरकार यांनी युवकातील बदलती व अस्थिर मानसिकता, डॉ. माधुरी झाडे यांनी जैविक व सामाजिक लिंग भेदामुळे विकासाच्या प्रक्रियेत येणारे अडथळे, प्रभाकर पुसदकर यांनी स्पेस व डोक्यातील शिपाई संकल्पना, सुषमा शर्मा यांनी नई तालिमची शिक्षण पद्धती, दिनकर चौधरी यवतमाळ यांनी महिला सक्षमीकरण व युवकांची भूमिका तर विवेक कुमार दिल्ली यांनी समितीच्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.