शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची भरमार, माहितीचा अनुशेष मात्र कायम

By admin | Updated: July 18, 2015 01:59 IST

ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असे म्हणत श्रमिकांचा आवाज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मजबूत केला.

अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन विशेष : दुर्बल घटकांच्या उत्थानाच्या बऱ्याच योजना बंदपराग मगर वर्धाही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असे म्हणत श्रमिकांचा आवाज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मजबूत केला. त्यामुळे या समाजाला समाजभान आले. मातंग समाजात अंतर्भूत असलेल्या १२ पोटजातीच्या विकासासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबईची स्थापना करून अनेक योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात २०११ ते १५ या चार वर्षात जवळपास १६७ समाजबांधवांना विविध योजनांना लाभ मिळाला आहे. मातंग समाजातील दुर्बल घटकांतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक विकास व्हावा यासाठी राज्यशासनामार्फत ११ जुलै १९८७ पासून या महामंडळाची स्थापना केली. महामंडळामार्फत बीज भांडवल योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना, शिष्यवृती योजना राबविल्या जातात. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ मर्यादित दिल्ली (एनएसएफडीसी) मार्फतही मुदत कर्ज योजना, लघुॠण वित्त योजना, महिला समृद्धी योजना, महिला विकास योजना शैक्षणिक कर्ज योजना आदी योजना राबविल्या जातात. असे असतानाही जागृतीचा अभाव लाभार्थ्यांच्या संख्येवरून पहावयास मिळतो. लवकर लाभ मिळत नसल्याच्याही तक्रारी पुढे आल्या आहेत. तसेच अनेक योजनांमध्ये अर्ज करूनही लाभ मिळाला नसल्याचेही लाभार्थी सांगत असतात. त्यामुळे महामंडळाला आणखी बळकटीची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आणखी बळकटी देण्याची गरजसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.), मुंबई आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ मर्यादित दिल्ली (एनएसएफडीसी) मार्फत अनेक योजना अण्णाभाऊसाठे यांच्या नावे राबविल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागात महामंंडळाचा स्वतंत्र विभाग असतो; परंतु योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत उदासीनता आणि शासनामार्फत पैसे मिळण्यासाठी लागत असलेला अवधी यामुळे योजनांच्या लाभार्थ्यांचा आकडा पाहिजे त्या प्रमाणात वाढलेला दिसत नाही.