शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर वाहने उभे केली जात असल्याने वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना झाली आहे.

ठळक मुद्देरस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा : नगरपालिका, पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरात वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची स्थिती, अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, वाहनतळाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे.छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर वाहने उभे केली जात असल्याने वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक अडथळे पार करीत वाहनधारकांना अमरावतीकडे कसेबसे जावे लागत आहे. वाहनतळाअभावी नागरिक वाटेल तेथे वाहन उभे करतात. वाहन उभे केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, मात्र याचा कुणीच विचार करीत नाही. मुख्य रस्त्यावर वाहन उभे करून चर्चा करणारे अनेक महाभाग शहरात आहेत.शहरातील अनेक ठिकाणे अपघातप्रवण स्थळ झाले आहे. बसस्थानक तसेच एलआयसी कार्यालयासमोर आॅटो, काळीपिवळी व ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे केले जात असल्यामुळे वसंतनगर येथून येणाºया लोकांना मुख्य रस्त्यावरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच साईनगरकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेलसमोर उभी केली जाणारी वाहने, चौकातील गर्दी यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. तरूणांच्या गर्दीमुळे शासकीय विश्राम गृहासमोरसुद्धा बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. शहरातील वाहतूक सुरळीत कशी करता येईल व वाहतुकीच्या समस्या कशी सोडविता येईल याचा विचार करणे गजरेचे झाले आहे. पोलीस विभाग, नगरपालिका व प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी