शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

५०० शिक्षण सेवक नोकरीला मुकणार

By admin | Updated: September 1, 2014 23:49 IST

जिल्ह्यातील अधिकारी हे कायदे गुंंडाळून मनमानीपणे वागत असल्याच्या प्रत्यय विविध कामातून येतो. नागरिकांना याचा वेळोवेळी प्रत्यय असून याविरोधात कुठे तक्रार करावी हा प्रश्न आहे. वर्ध्याचे

वर्धा : जिल्ह्यातील अधिकारी हे कायदे गुंंडाळून मनमानीपणे वागत असल्याच्या प्रत्यय विविध कामातून येतो. नागरिकांना याचा वेळोवेळी प्रत्यय असून याविरोधात कुठे तक्रार करावी हा प्रश्न आहे. वर्ध्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी अत्यंत चुकीचे शाळा संच निर्धारण करून जिल्ह्यातील शाळांची शिक्षक संख्या कमी केली. याचा फटका परिविक्षा सहा महिन्यांनी संपणार असलेल्या ५०० शिक्षण सेवक शिक्षकांना बसला असून त्यांना न्याय देण्याकरिता शासनाने पावले उचलावी आणी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आहे. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी नवीन सोना यांना महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळालेला आहे. या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शासन निर्णय आणि नियम बासनात गुंडाळून ठेवत अधिकारी निर्णय घेतात. याचा प्रत्यय शिक्षण सेवकांना आला. अडीच वर्षे नोकरी केलेल्या व चुकीचे संच निर्धारण करून अतिरिक्त ठरविलेल्या या ५०० शिक्षकांना तात्काळ नोकरीतून काढून टाका असा तगादा शिक्षणाधिकारी यांनी चालविलेला आहे. हा शिक्षकांवरील अन्याय आहे. या अन्यायविरोधात शिक्षकांना सोबत घेवून कायद्याप्रमाणेच त्यांना न्याय मिळाला पाहिजे. शासन निर्णयाप्रमाणेच शाळांचे काटेकोरपणे संचनिर्धारण व्हावे म्हणून लोकशाही दिनात शिक्षणाधिकारी वर्धा व मुख्य कार्यपालन अधिकारी चौधरी यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. या अन्यायग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी शासनाने लक्ष देऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी यांना तक्रार व निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा संघटक विनय डहाके, प्रदिप महल्ले, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सतिश जगताप, लक्ष्मीकांत सोनवणे, विजय मुळे, प्राचार्य भगत, मिलींद मुडे, मनोहर बारस्कर, विनोद राऊत, योगेश्वर कलोडे, रामदास निम्रट, राजु सातपूते यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, अन्यायग्रस्त शिक्षण सेवक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)