शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४३ टक्केच पेरण्या

By admin | Updated: June 30, 2015 02:42 IST

मान्सूनच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाचे आगमण होताच पेरण्याच्या कामांना वेग आला. असे

दीड लाखावर कपाशी : ६२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा वर्धा: मान्सूनच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाचे आगमण होताच पेरण्याच्या कामांना वेग आला. असे असले गत आठवड्यापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळल्याचे कृषी विभागाच्यावतीने गुरुवारपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. जिल्ह्यात केवळ ४३ टक्के पेरण्या झाल्याची नोंद यात आहे. सोयाबीनच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ असल्याने त्यांच्याकडून कपाशीची लागवड जोरात सुरू असल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ४९ हजार ५१५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे. त्याची टक्केवारी ६२ आहे. तर ६१ हजार ३४१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. याची टक्केवारी ५५ टक्के आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यात निम्मी पेरणी शिल्लक असल्याचे दिसते. जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. आलेला पाऊस पेरणीयोग्य असल्याने पेरा पूर्ण होईल असे वाटत होते; मात्र तसे झाले नाही. जून महिना संपण्याच्या मार्गावर आला असताना अद्यापही पूर्णत: पेरा झाला नसल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षनानंतरच्या चार दिवसात आणखी किती पेरा झाला याची माहिती त्यांच्याकडे आली नाही.(प्रतिनिधी)कृषी विभागाकडे नोंद झालेल्या पेरणीनुसार जिल्ह्यात सोयाबीनच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांनी अद्यापही पाठ असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीनच्या पेऱ्याची टक्केवारी ५५ असल्याचे दिसून आले आहे. यामुळे नियोजनाच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा निम्माच झाल्याचे दिसून आले आहे. याचे महत्त्वाचे कारण बेभरवशाचा पाऊस असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे. त्याची टक्केवारी ६२ टक्के आहे. कपशीसोबतच शेतकऱ्यांनी तुरीची लागवडही केली. जिल्ह्यात ३१ हजार १०१ हेक्टरवर तूर लावण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ४७ आहे. या व्यतिरिक्त ज्वारी वगळता इतर कोणत्याही तालुक्यात ज्वारीचा पेरा झाल्याचे दिसून आले नाही. त्याची टक्केवारी ०.६७ एवढी आहे. पीक विमा योजनेची आज अंतिम तारीख निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांना होत असलेले नुकसान टाळण्याकरिता हवामान आधारित पीक विमा योजना उतरविण्यात येत आहे. या योजनेचा गत वर्षी शेतकऱ्यांना लाभ झाला होता. त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली होती. या योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. या योजनेची अंतिम तारीख मंगळवार (३० जून ) आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.