शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

गवळाऊ जनावरांच्या प्रदर्शनात ३१६ पशुंचा सहभाग

By admin | Updated: March 2, 2015 00:13 IST

कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील कन्नमवार शाळेच्या प्रांगणावर शनिवारी विदर्भस्तरीय गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

वर्धा : कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील कन्नमवार शाळेच्या प्रांगणावर शनिवारी विदर्भस्तरीय गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून एकूण ३१६ गवळाऊ जनावरे यात सहभागी झाले होते. यावेळी सर्वोत्कृष्ट जनावरांच्या मालकांना पारितोषिक देण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटकीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे यांची उपस्थिती होती. मंचावर समाज कल्याण सभापती वसंता पाचोडे, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती श्यामलता अग्रवाल, महिला व बालकल्याण समिती सभापती चेतना मानमोडे, कारंजा पंचायत समिती सभापती मोरेश्वर भांगे, जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र रणनवरे, मारोतराव व्यवहारे, गोपाळ कालोकर, गजानन गावंडे, मोरेश्वर खोडके, मनोज चांदूरकर, कन्नमवारचे सरपंच अजय दिग्रसे, कारंजा पंचायत समिती सदस्य तेजराव बन्नगरे, पंचायत समिती उपसभापती शुभांगी पठाडे, भलावी, गजभिये, कन्नमवार विद्यालयाचे आर.व्ही. वसू, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, नागपूरच्या मापसूचे संचालक डॉ. नंदकिशोर झाडे, पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी आदींची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना रणनवरे म्हणाल्या, गवळाऊ प्रजातीचे संवर्धन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. ती वर्धा जिल्ह्याची देण आहे. पुरातन काळापासून गवळाऊ गायींचा इतिहास जिल्ह्याला लाभलेला आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे. याकरिता शासनस्तरावरही प्रयत्न करण्यात येत असून शेतकरी, गोपालकांनी यामध्ये पुढाकार घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित सदस्यांनी विचार व्यक्त केले. प्रारंभी टाकरखेडे येथील लहानूजी महाराज या संस्थेच्या गायीचे पुजन चित्रा रणनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविकातून डॉ. राजू यांनी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे संचालन शिरास, डॉ. अनिल ठाकरे यांनी केले तर आभार डॉ. मांडेकर यांनी मानले.(प्रतिनिधी)आर्वीतील अक्षय अजमिरे यांचा वळू चॅम्पियनचार विभागात असलेल्या या स्पर्धेत गट अ मध्ये गवळाऊ वळूंमधून आर्वी तालुक्यातील रोहणा येथील अक्षय अजमिरे यांचा वळू प्रथम आला. त्यांना चॅम्पियन आॅफ चॅम्पियनने सन्मानित करण्यात आले. त्यांना फेटा, चषक, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. याच गटातून द्वितीय क्रमांक गणपत निकोसे तर तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर उईके यांना प्राप्त झाला. गट ब गटामध्ये सर्वोत्तम गाय सुधाकर हिंगणे यांची ठरली. गवळाऊ गायी या गटातून द्वितीय क्रमांक राजू लाड तर तृतीय क्रमांक यशवंत उमाटे यांना प्राप्त झाला. क गटामधून कालवडीमध्ये शंकर अहाके, नितीन निकोसे, गुणवंत घंगाळ तर गट ड गवळाऊ वासरांधमून धनराज बारंगे, कुणाल पराळे आणि दादाराव अरबट यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाले. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.