शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शिक्षकांकडे थकले ओडीचे २३ कोटी

By admin | Updated: August 10, 2015 01:51 IST

अनुत्पादित कर्जाचा पुरवठा केल्यामुळे संकटात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने काढून घेतल्याने गत तीन वर्षांपासून बँकेचे व्यवहार ठप्प आहे.

वसुलीकडे दुर्लक्ष : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू होण्यास अडथळेलोकमत विशेषअमोल सोटे  आष्टी (शहीद)अनुत्पादित कर्जाचा पुरवठा केल्यामुळे संकटात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने काढून घेतल्याने गत तीन वर्षांपासून बँकेचे व्यवहार ठप्प आहे. आता बँक सुरू करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातील महत्त्वाचा दुवा असलेल्यआ जि.प. व खासगी शिक्षकांनी बँकेकडून ओडी (ओव्हर ड्रॉप) म्हणून घेतलेले २३ कोटी ७७ लाख रुपये देण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती आहे.बँकेतून वेतन सुरू असताना जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेच्या शिक्षकांनी ओडीच्या स्वरूपात २३ कोटी ७७ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केली. अशात बँकेची स्थिती ढासळल्याने जानेवारी २०१३ पासून शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून सुरू झाले. या शिक्षकांचे कर्ज भरण्याची जबाबदारी शिक्षकांचे वेतन देणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेने दिली. जि.प. प्रशासन व बॅक व्यवस्थापनात तसा करारही झाला होता; मात्र या कराराचा साऱ्यांनाच विसर पडला असून बँकेची मोठी रक्कम शिक्षकांकडे थकली आहे. ही रक्कम मिळाल्यास बँकेचा परवाना परत मिळण्याची शाश्वती आहे. बँकेचे अनुत्पादित कर्ज वाढल्यामुळे नाबार्डने परवानगी नाकारली होती. जिल्ह्यातील ५१ शाखांपैकी नऊ शाखा पूर्वीच बंद झाल्या होत्या. आजा ४२ शाखा परवान्याअभावी बंद झाल्या. शासनाने बँकेला कर्ज वसुली करण्याची सक्ती केली. यात काही शेतकऱ्यांनी प्रामाणिक कर्जाचा परतावा केला. वेळा साखर कारखान्याला ३० कोटी कर्ज दिले होते. सदर कारखाना बँकेने जप्त करून लिलाव काढला आहे. लिलाव घ्यायला कुणीही पुढे आले नाही. बापुराव देशमुख सुतगिरणीला दिलेल्या कर्जाचीही परतफेड करण्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. जिनिंग प्रेसिंगला दिलेल्या कर्जापैकी ११ जिनिंग प्रेसिंग लिलावातून सर्व वसुली करण्यात आली आहे.झालेल्या वसुलीमधून जानेवारी २०१५ पर्यंत बँकेच्या जिल्ह्याभरातील २७० कर्मचारी आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १२० गटसचिवाचे वेतन देण्यात आले. बँकेमध्ये शेतकरी तथा मध्यमवर्गीय कुटुंबाच्या ठेवी आहेत. रक्कम नसल्याने कर्मचारी ठेवीदार दोन्ही अडचणीत आले आहेत. बँकेचे सर्व कर्मचारी बँक सुरू होत नसेल तर आमची सेवा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळती करा, अशी विनवनी शासनाला करीत आहे. रिझर्व्ह बँकेने परवाना देण्यासाठी सोने तारण योजना व ठेवी जमा करण्यासाठी सक्ती केली आहे. असे झाले तरच बँकेला २०१७ पर्यंत परवाना मिळू शकतो. याला कोणी तयार नसल्याने बँकेचे भविष्य सध्या तरी धोक्यात आले आहे.