शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

योगाचार्य अण्णा व्यवहारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 05:31 IST

योगाचार्य सहस्रबुद्धे गुरु जींच्या प्रेरणेने अंतर्बाह्य योगमय झालेल्या अण्णांनी घंटाळी मित्र मंडळाचा योग विभाग अथक प्रयत्नांनी सुरू केला.

ठाणे : ४५ वर्षांहून अधिक काळ योगाचा प्रचार आणि प्रसार करणारे ज्येष्ठ योगाचार्य अण्णा ऊर्फ श्रीकृष्ण व्यवहारे यांचे शनिवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि सुना असा परिवार आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. समस्त ठाणेकर त्यांना अण्णा म्हणून ओळखत.

योगाचार्य सहस्रबुद्धे गुरु जींच्या प्रेरणेने अंतर्बाह्य योगमय झालेल्या अण्णांनी घंटाळी मित्र मंडळाचा योग विभाग अथक प्रयत्नांनी सुरू केला. ठाण्याच्या एका गल्लीत सुरू झालेला योगा त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेला. सर्वसामान्य माणूस ते बंदी, दिव्यांगांनाही त्यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. २६ जानेवारी १९६५ रोजी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून आणि योगसाधनेतून त्यांनी हजारो कार्यकर्ते घडवले.पश्चिम रेल्वेत इमानेइतबारे नोकरी करून त्यांनी योगसाधना अव्याहृत सुरूच ठेवली. निवृत्तीनंतर योगासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले. त्यांनी भारतातील विविध मान्यताप्राप्त योग विद्यालयांतून योगशिक्षकवर्ग यशस्वीरीत्या पूर्ण केले. १९७८ मध्ये स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी त्यांना योगाचार्य ही पदवी बहाल केली. १९८९ मध्ये त्यांनी घाटकोपरला गुजरातीबांधवांच्या मदतीने योगशाखा काढली. त्यानंतर गोवा, नेपाळ येथेही योगकेंद्रे सुरू केली. ठाण्याच्या कारागृहातील बंदीसाठी त्यांनी योगाचे वर्ग घेतले.

मुंगेरच्या बिहार योग विद्यालयाने बिहारमधल्या आठ तुरु ंगांतील १६५ बंदींनी प्रशिक्षित योगशिक्षक म्हणून घडवले. या प्रकल्पावरील शोधनिबंधास १९८८ साली बँकॉक येथे भरलेल्या जागतिक योग परिषदेत रौप्यपदक प्राप्त झाले. स्मृतिसंवर्धन, एकाग्रतेकरिता त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मेधासंस्कार प्रकल्प सुरू केला. याशिवाय, अग्निशमन दलातील जवान, बॅडमिंटनपटू, आदिवासी मुले, तबलावादक अशा अनेक घटकांपर्यंत त्यांनी योगाचे महत्त्व रुजवले. गर्भवती स्त्रियांसाठी त्यांनी योगांकुर तसेच स्त्रियांच्या मासिकपाळीच्या तक्रारींसाठी त्यांनी आनंदयोग, अथध्यानम्, प्राणायामदर्शन, मेधासंस्कार हे विशेष योगवर्ग सुरू केले. योगतरंग हे मासिकही सुरू केले. १९७८ पासून २०१० पर्यंत त्यांनी १७ योगसंमेलनांचे आयोजन केले. २००२ च्या योग महोत्सवात स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी अण्णांना कर्मसंन्यासाची दीक्षा देऊन त्यांचे स्वामी सत्यकर्मानंद असे नामकरण केले. मुंगेर येथे भरलेल्या जागतिक योग संमेलनात बिहार स्कूल आॅफ योगाने अण्णांना सुवर्णयोगी ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता.