शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

घोडबंदरचा शिलेदार कोण?

By admin | Updated: January 11, 2017 07:22 IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर हा नव्याने विकसित झालेला पट्टा. तेथील पांढरपेशा, उच्चभ्रू मतदारांमुळे या पट्ट्याला

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर हा नव्याने विकसित झालेला पट्टा. तेथील पांढरपेशा, उच्चभ्रू मतदारांमुळे या पट्ट्याला प्रत्येक निवडणुकीत अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने-शिवसेनेला कडवी झुंज दिली. निसटत्या विजयावर शिवसेनेला समाधान मानावे लागले. विधानसभेतील भाजपाची ही कडवी झुंज आता ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल. ओवळा - माजिवडा या मतदारसंघातील काही भाग ठाणे, तर काही भाग मीरा-भाईंदर महापालिकेत जात असला तरी ठाण्याच्या भागातही भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आताच्या घडीला बदललेल्या राजकीय समीकरणांचा आणि प्रभाग रचनेचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे येथे फारसे कडवे आव्हान दिसून येत नाही. नव्या समीकरणांचा विचार करून येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना येथे भाजपाचे संजय पांडे यांनी कडवी झुंज दिली होती. सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली, तर पांडे यांना फारसा प्रभावी प्रचार न करता ५७ हजार ६६५ मते या भागातून मिळाली होती. पहिल्या १७ फेऱ्यापर्यंत पांडे आघाडीवर होते. वर्तकनगर भागातील पेट्या उघडण्यात आल्या आणि तेथूनच सरनाईक यांनी आघाडी घेतली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला काँटे की टक्कर दिली होती. राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे यांना २० हजार ६८६, मनसेचे सुधाकर चव्हाण यांना २० हजार ५६८ आणि कॉंग्रेसचे प्रभात पाटील यांना १३ हजार ५८९ मते मिळाली होती.विधानसभा निवडणुकीत घोडबंदर पट्ट्यात भाजपाचा वरचष्मा दिसून आला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह कॉंग्रेस आणि शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत येथून २४ नगरसेवक निवडून आले होते. त्यात शिवसेनेचे १५, मनसेचे दोन, तीन जागांवर अपक्ष, दोन जागांवर राष्ट्रवादी आणि एका जागेवर कॉंग्रेसने विजय मिळविला होता. आता ही परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेला येथे पोषक वातावरण असले, तरी भाजपाने विधानसभा निवडणुकीत ज्या पध्दतीने मुसंडी मारली होती ते पाहता येत्या ठाणे पालिका निवडणुकीतही भाजपा येथे करिष्मा दाखविणार हे नक्की. येथील मतदारांचा वर्गही बदलला आहे. पूर्वी हा पट्टा आगरी कोळ्यांचा म्हणून ओळखला जात असे. गेल्या काही वर्षात येथील रस्त्यांचे जाळे मोठे झाले आणि नवनवीन गृहसंकुले उभी राहिली. त्यामुळे उच्च्भ्रू, मध्यमवर्गीय मतदारांचे प्रमाण वाढत गेले. एका जातीचे परंपरागत वर्चस्व उरले नाही. आजवरची मते जरी शिवसेनेच्या पारड्यात पडली, तरी नव्या मतदारांचा कौल निर्णायक ठरू शकतो. त्यामुळेच आता येथील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ओवळा माजिवड्यात सेना - भाजपा टक्करच्भाजपाने दिव्याबरोबरच घोडबंदर भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेला लढत देऊ शकतील, असे तगडे उमेदवार भाजपाकडेही आहेत. त्यामुळे येथे शिवसेना विरुध्द भाजपा या लढतीतील चुरस दिसून येईल.च्विधानसभा निवडणुकीत सेनेचे प्रताप सरनाईक यांना येथे भाजपाचे संजय पांडे यांनी कडवी झुंज दिली होती. सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली, तर पांडे यांना फारसा प्रभावी प्रचार न करता ५७ हजार ६६५ मते येथून मिळाली होती. पहिल्या १७ फेऱ्यापर्यंत पांडे आघाडीवर होते. वर्तकनगर भागातील पेट्या उघडल्या आणि सरनाईक यांनी आघाडी घेतली.