शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जागांचे वाटप झाले, पण आव्हाने कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 01:38 IST

‘ग’ आणि ‘फ’ प्रभागांतील पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना सोडतीद्वारे बुधवारी जागांचे वाटप केले असले, तरी पुनर्वसनाची प्रक्रिया पार पाडायला १५ दिवस लागणार आहेत.

प्रशांत माने डोंबिवली : केडीएमसीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत येथील ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागांतील पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना सोडतीद्वारे बुधवारी जागांचे वाटप केले असले, तरी पुनर्वसनाची प्रक्रिया पार पाडायला १५ दिवस लागणार आहेत. परंतु, शहरातील अरुंद रस्ते आणि त्या रस्त्यांवरील वाहनांचे पार्किंग पाहता याची ठोस अंमलबजावणी करणे एक प्रकारचे आव्हान असणार आहे. त्यात धोरणांतर्गत दिलेल्या जागेचे आकारमान कमी असल्याने जागावाटपाची प्रक्रिया पार पडल्यानंतर उच्च न्यायालयात वाढीव जागेसाठी धाव घेण्याचा पवित्रा फेरीवाला संघटनांनी घेतला आहे.केडीएमसीकडून उशिरा का होईना फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आयुक्त व शहर फेरीवाला समितीचे अध्यक्ष गोविंद बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पहिल्या टप्प्यात डोंबिवलीतील ‘फ’ प्रभागातील ५०३ व ‘ग’ प्रभागातील ४१० फेरीवाल्यांना सोडतीद्वारे जागेचे वाटप करण्यात आले. याच्यानंतर उर्वरित प्रभागांमध्ये सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांसाठी जागावाटपाची सोडत होणार आहे.फेरीवाला धोरणांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के, असे फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी त्यासाठी काही प्रभागांमध्ये पांढरे पट्टे मारले गेले होते. परंतु, पुढे कार्यवाही झाली नव्हती. मात्र, बुधवारच्या जागावाटपाच्या सोडतीनंतर पांढरे पट्टे मारण्याची प्रक्रिया नव्याने पार पाडावी लागणार आहे. पात्र ठरलेल्या आणि जागा जाहीर झालेल्या फेरीवाल्यांना प्रभागाच्या वतीने प्रमाणपत्रही सादर केले जाणार आहे. साधारण या प्रक्रियेसाठी १५ दिवस लागणार आहेत. मात्र, शहरातील बहुतांश रस्ते अरुंद आहेत. शिवाय, तेथे वाहनांचेही पार्किंग होते, अशी स्थिती असताना फे रीवाल्यांसाठी व्यवसाय करण्यासाठी जागा उरेल का, असाही सवाल उपस्थित होत आहे.सध्या न्यायालयाने मनाई केलेल्या हद्दीच्या बाहेर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना दुकानदारांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यावेळी लोकप्रतिनिधीही दुकानदारांच्या बाजूने उभे राहतात. हे चित्र काही महिन्यांपूर्वी पूर्वेतील फडके रोडवर झालेल्या वादाच्या वेळी पाहायला मिळाले होते. त्यामुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा हक्क मिळाला असला तरी दुकानदार आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून होणाºया विरोधात ते कसे टिकून राहतात, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.सुरुवातीच्या काळात जेथे व्यवसाय होईल, त्या जागेलाच पसंती असेल, यावर ठाम असलेल्या फेरीवाला संघटनांनी सध्या मात्र जे पडेल ते सध्या पदरात पाडून घ्या, नंतर काय ते बघू, अशी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. असे असले तरी फेरीवाल्यांची दिलेल्या जागी व्यवसाय करण्याची मानसिकता आहे का? हे देखील अंमलबजावणी झाल्यावर समोर येणार आहे.>न्यायालयात मागणार दाद - अरविंद मोरेउच्च न्यायालयाने दिलेल्या निकषांन्वये एक बाय एक मीटरची जागा पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना देण्यात आली आहे. परंतु, ती पुरेशी नसल्याकडे फेरीवाला संघटनांनी बुधवारी बोडके यांचे लक्ष वेधले. परंतु, न्यायालयाच्या आदेशानुसारच जागेचे आकारमान उपलब्ध करून दिल्याचे बोडके यांनी स्पष्ट केले. यावर जागावाटपाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जागेचे आकारमान वाढवून मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची भूमिका संघटनांनी घेतली आहे. धोरण राबविण्यास सुरुवात झाली, याबाबत निश्चितच आनंद आणि समाधान आहे. परंतु, जागेचे आकारमान वाढविण्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असे कल्याण येथील फेरीवाला संघर्ष समिती अध्यक्ष अरविंद मोरे यांनी सांगितले.>डीपी रस्त्यांचा आधार - जगतापनगररचना विभागाने फेरीवाल्यांना ज्या जागा सुचविल्या आहेत, त्या डीपी (विकास आराखडा) रोडवर देण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी कोणालाही वाहन पार्किंग करता येणार नाही. परंतु, ज्या रोडच्या ठिकाणी इमारतींचे गेट, ट्रान्सफॉर्मर असेल तो भाग वगळण्यात आला आहे.जे डीपी रस्ते अरुंद असतील, ते रुंदही केले जातील. ज्या जागा ठरवून दिल्या आहेत, तेथे पांढरे पट्टे मारण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या ठोस कार्यवाहीला साधारण १५ दिवसांचा कालावधी लागेल, असे ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी सांगितले.