शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

एमआयडीसीतील महावितरणचे रोहित्र बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:42 IST

त्यात झाडेझुडपे वाढलेली लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एमआयडीसीमधील महावितरणचे बहुतांशी रोहित्र अतिधोकादायक बनली आहेत. ते रस्ते व ...

त्यात झाडेझुडपे वाढलेली

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एमआयडीसीमधील महावितरणचे बहुतांशी रोहित्र अतिधोकादायक बनली आहेत. ते रस्ते व इमारतींच्या कडेला असून, बहुतेक ठिकाणी त्यांचे संरक्षक कुंपण तुटल्याने एखादे वाहन त्यावर धडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच झाडेझुडपे व परिसरात पडलेला कचरा याला आग लागल्यास अपघातही घडू शकतो.

अशाच तांत्रिक कारणांकडे दुर्लक्ष केल्याने यापूर्वी गेल्या वर्षभरात अनेक वेळा रोहित्राला आग लागून स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. वेळोवेळी पत्र देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन सांगूनही देखभाल होत नसल्याची खंत तेथील रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केली.

नियमित साफसफाई, रोहित्रामधील ऑइल याची तपासणी योग्य वेळी झाली पाहिजे. रोहित्राला लागणारे किमती ऑइल रोहित्रामधून काढून चोरणारे समाजकंटक त्या ठिकाणी कुंपण नसल्याचा फायदा घेत असल्याचे ते म्हणाले. अशा अतिधोकादायक, देखभाल होत नसलेल्या रोहित्राची माहिती स्थानिक एमआयडीसी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी देऊनही त्यांच्याकडून कार्यवाही होताना दिसत नाही. काही वेळेस हे सर्व आमचा सिव्हिल खात्याकडे किंवा वरिष्ठांना पत्र देऊन कळवितो, असे महावितरणचे अधिकारी तोंडी सांगतात. मात्र, खरेच असे पत्र दिले आहे का, हे मात्र समजू शकलेले नसल्याचे ते म्हणाले. सध्या उन्हाळा असल्याने वीज वितरणवर ताण येत आहे. आताही काही भागात तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. वाढत उष्मा, वर्क फ्रॉम होम तसेच काही जण कोरोनामुळे घरातच विलगीकरणात आहे. त्यात वीजपुरवठा नसल्यास नागरिक मेटकुटीला आले आहेत. येथील रोहित्राच्या स्थितीबद्दल वारंवार महावितरणचा वरिष्ठ अभियंत्यांना फोटोसह समाजमाध्यमांवर, मोबाइलवर कळवण्यात येत असूनही कार्यवाही का होत नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे नलावडे म्हणाले.

--------------