शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज प्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:53 IST

आयपीएचच्यावतीने प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज प्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

ठळक मुद्देप्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज प्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सौमित्र कुलकर्णी  यांनी गीत सादर करुन कार्यक्रमाची केली सुरूवात नैराश्य माणसाला जगण्यापासून परावृत्त करते - डॉ. आनंद नाडकर्णी

ठाणे: आयपीएचच्यावतीने प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज व्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सायंकाळी सप्तसोपान डे केअर सेंटर येथे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. शुभा थत्ते, ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार, कवयित्री, लेखिका नीरजा, उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस, शिरीन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.

     सौमित्र कुलकर्णी  यांनी गीत सादर करुन कार्यक्रमाची सुरूवात केली. लेखक प्रवीण कुलकर्णी यांनी आपले मनोगत मांडले. ते म्हणाले की, मला जे सांगायचे होते ते या पुस्तकात मी मांडले आहे. माझ्या आयुष्यातील निवडक घटना या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचे लिखाण सुरू केले तेव्हा नेमके काय सांगायचे हा प्रश्न माझ्या समोर होता. हे आत्मचरित्र नाही तर मला नैराश्यात जाण्याचा अनुभव ते तिथून बाहेर पडण्याचा अनुभव याचा प्रवास आहे. हे आत्मशोध आहे. काय लिहायचं यापेक्षा काय टाळायचं हे मला जास्त महत्त्वाचे वाटले. डॉ. नाडकर्णी म्हणाले की, नैराश्य माणसाला जगण्यापासून परावृत्त करते. पण एक ड्राईव्ह असते की यातून बाहेर पडायचे, ड्राईव्ह आणि नॉन ड्राईव्हची मनात कुस्ती सुरू असते. मानसीक आरोग्य किंवा मानसीक आजार याबद्दल समाजात कलंक आहे असे असताना कुलकर्णी यांचे आत्मकथन पुढे येणे हे एक धैर्य आहे. हे पुस्तक वैयक्तीक पातळीवरचा लढा आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार म्हणाल्या की, गेल्या १० ते १५ वर्षांत जागरुकता वाढल्याने शारिरीक - मानसीक अपंगतव् किंवा उणीवा अशावर लेखण करण्याची संख्या वाढलेली दिसत आहे. कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे की, चार - पाच व्याधींनी ग्रासलेले असताना ते या व्याधींना हसत खेळत सामोरे गेले. कवयित्री, लेखिका नीरजा म्हणाल्या की, पत्रं हा जुना प्रकार आहे. पत्रातला संवाद एकाशी असतो परंतू या पुस्तकातील लेखकाने सर्वांशी संवाद साधला आहे. कादंबरी होता होता राहिलेले हे पुस्तक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. शुभा थत्ते यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. दरम्यान, प्रकाशक मोधा राजहंस यांनी मनोगत व्यक्त केले तर शिरीन कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई