शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सुदृढ आरोग्यासाठी किमान सात तास झोप आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

स्टार ११०० अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : आपण झोप किती घेतो, यावर आपले आरोग्य तसेच रोगप्रतिकारक शक्ती ...

स्टार ११००

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : आपण झोप किती घेतो, यावर आपले आरोग्य तसेच रोगप्रतिकारक शक्ती अवलंबून असते. त्यामुळे कमी झोपेमुळे रोग प्रतिकारशक्तीही खालावते. शरीर सुदृढ राहण्यासाठी किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. मात्र, ज्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आहे, त्यांना त्यापेक्षा जास्त झोपेचीही गरज नाही. पण ज्यांची झोप पूर्ण होणार नाही, त्यांना भविष्यात खूप आजार-विकारांना सामोरे जावे लागू शकते, अशी धोक्याची सूचना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विजय चिंचोले यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वच जण आरोग्याबाबत अधिक सजग झाले आहेत. स्वत:ची तसेच घरातील, कार्यालयांतील, आपल्या परिसरातील स्वच्छतेलाही अधिक महत्त्व आले आहे. मात्र, या काळात वर्क फ्रॉम होमचा प्रकार वाढला आहे. त्यात कार्यालयांतील वेळेपेक्षा अधिक काम नोकरदार करू लागले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा वाढता ताणही अनेकांना असहाय्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुरेशी झोप आवश्यक असल्याचे डॉ. चिंचोले म्हणाले. लहान मुलांनी म्हणजे शिशु मुलांनी १२ तास, त्यापेक्षा थोड्या मोठ्यांनी १० तास, कुमार मुलांनी आठ ते १० तास आणि त्यापुढे १८ ते ६० पर्यंतच्या वयोगटांतील नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनाही सात ते आठ तासांची झोप गरजेची असल्याचे चिंचोले म्हणाले.

-----------

अपुऱ्या झोपेचे तोटे

- मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार होऊ शकतात.

- अस्थिरता, चंचलता वाढण्याची भीती.

- एकाग्रता कमी होऊ शकते.

-----------------------

रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल

कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्तीची सगळ्यांना जाणीव झाली. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी त्यांना आजाराचा संसर्ग लवकर होतो. त्यामुळे आहार, विहार, निद्रा ही आरोग्याची त्रिसूत्री पाळायला हवी. जे पाळतील त्यांना उत्तम आरोग्य लाभेल असे तज्ज्ञ सांगतात.

---------------

व्यायामही आवश्यक

योग्य झोपेसाठी संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक आहेच. परंतु झोपण्याआधी दोन तास मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही पाहाणे टाळावे. शक्यतोवर सूर्यास्तानंतर उत्तेजक पेय टाळावीत. यासह योग, आहारावर नियंत्रण, वेळेचे नियोजन आदी मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

---------------

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झोपेची खूप गरज आहे. त्यासाठी झोपेचे नियोजन करणे गरजेचे आहे. शक्यतोवर ठराविक वेळेला झोपायला अंथरुणावर जायला हवे, पण तसे अलीकडे होत नाही. त्यामुळे झोप, आहार आणि विहार या सगळ्या मुख्य आरोग्य त्रिसूत्रीची सांगड बदलली असल्याने गुंतागुंत वाढल्याने अनेकांना निद्रानाश विकार जडतात. ते टाळायला हवे.

- डॉ. विजय चिंचोले, मानसोपचार तज्ज्ञ

---------------