शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

प्रदूषणाला एमआयडीसीच जबाबदार

By admin | Updated: July 24, 2016 03:39 IST

रासायनिक कारखाने सांडपाणी प्रक्रिया केंद्रात योग्य प्रकारे प्रक्रिया करून निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारखानदारांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी

डोंबिवली : रासायनिक कारखाने सांडपाणी प्रक्रिया केंद्रात योग्य प्रकारे प्रक्रिया करून निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारखानदारांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. २५ वर्षांत एमआयडीसीने सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन टाकलेली नाही. प्रदूषणाचे खापर कारखानदारांवर फोडले जाते. प्रत्यक्षात यास एमआयडीसी जबाबदार आहे, असा आरोप ‘कामा’ संघटनेने केला आहे.सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे संचालक मंडळातील सदस्य व ‘कामा’च्या प्रतिनिधींनी काही कारखानदारांसोबत राज्यममंत्री रवींद्र चव्हाण यांची शनिवारी कल्याण जिल्हा भाजपा कार्यालयात भेट घेतली. यावेळी कारखानदारांनी चव्हाण यांना निवेदन दिले. यासंदर्भात चव्हाण यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कारखानदारांचे म्हणणे मांडतो, असे आश्वासन कारखानदारांना दिले आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालकांनी चव्हाण यांच्याकडे त्यांचे म्हणणे मांडले. त्यांच्या निवेदनानुसार, एमआयडीसीच प्रदूषणाला जबाबदार आहे. सोयीसुविधा न पुरवता प्रदूषण मंडळाद्वारे कारखानदारांना वेठीस धरल्याचा आरोप त्यात केला आहे. विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ११ जुलैच्या पाहणी दौऱ्यात एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण सचिवांना दिले होते. त्यानुसार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव मिराशी यांनी एमआयडीसीला नोटीस बजावली होती. त्यानंतर, शुक्रवारी महामंडळाच्या मुंबई कार्यालयात एक बैठक झाली. डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्रात ३०० घनमीटर सांडपाणी गोळा होते. मात्र यापैकी दोन टक्केच पाणी आहे. त्यापैकी ५० टक्के कारखान्यांचा दररोजचा वापर १० हजार लीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे कारखाने व सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करून सुधारणा होईल, असे वाटत नाही. डोंबिवली फेज-२ मधील दीड दशलक्ष लीटर क्षमतेचे सांडपाणी बंद करण्याची नोटीस काढली आहे. एक हजार लीटर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ७५ रुपये खर्च येतो. दिवसाला दीड दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १ लाख १२ हजार रुपये खर्च होतात. हा खर्च कारखानदारांकडून वसूल केला जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्हीओडी-बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांडचा निकष १०० हून ३० वर आणला आहे. त्यामुळे या निकषाची पूर्तता करण्यासाठी प्रक्रिया केंद्रावरील खर्च वाढणार आहे. कारखाने प्रक्रिया करून पाणी सोडतात. मात्र, नाल्यात प्रदूषित पाणी सोडणाऱ्यांवर एमआयडीसी कारवाई करीत नाही. (प्रतिनिधी)१९९० च्या दशकात जलप्रदूषण नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणी काळात जागतिक बँकेची अर्थिक मदत मिळवताना ही मदत उपभोक्त्याला दिली पाहिजे. तसेच सांडपाणी वाहून नेण्याची जबाबदारी एमआयडीसीची व कायदेशीर जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची होती. या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्यांवर टाकल्या आहेत. तर उद्योगांचे स्थलांतर - चांगले काम करणाऱ्यास प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्याविरोधात कारवाईचे हत्यार उपसून बळीचा बकरा करण्याचा उद्योगच सरकारी यंत्रणांनी थाटला आहे. ही मानसिकता असेल तर येथील उद्योग बंद होतील. तसेच ते इतर राज्यांत स्थलांतरितहोऊ शकतात. एखाद्या यंत्रणेत त्रुटी असल्यास त्यात सुधारणा होऊ शकते. ते कायमचे बंद करून त्यातून साध्य काय होणार. - कामगारांना व कारखानदारांना काय पर्याय देणार, असा सवाल निरुत्तरीतच आहे, याकडे कारखानदारांनी लक्ष वेधले आहे. २९ जुलैला लवादाकडे सुनावणी आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलासा द्यावा, अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली आहे.