शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

केडीएमसीत ‘रिंग रिंग रिंगा’

By admin | Updated: March 25, 2017 01:15 IST

२७ गावांत पाणीपुरवठ्यासाठी ३७ कोटी खर्चून जलवाहिनी टाकण्यासाठी केडीएमसीने निविदा मागवल्यावर तिला दोघांनी प्रतिसाद दिला.

कल्याण : २७ गावांत पाणीपुरवठ्यासाठी ३७ कोटी खर्चून जलवाहिनी टाकण्यासाठी केडीएमसीने निविदा मागवल्यावर तिला दोघांनी प्रतिसाद दिला. मात्र, त्यातील एका निविदाधारकाने प्रक्रियेतून माघार घ्यावी, यासाठी त्याला दमबाजी केली जात असल्याचा आरोप झाल्याने पालिकेची ई-टेंडरिंग प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे पुन्हा समोर आले. टेंडरमध्ये पुन्हा रिंग काम करत असल्याचे स्पष्ट आले.२७ गावांतील पाणीप्रश्न बिकट आहे. त्यासाठी तेथील ग्रामस्थ व नागरिक मोर्चे काढत आहेत. महापालिकेच्या योजनेतील पाणी मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच काहीही करा, पण २७ गावांची तहान भागवा, असा आदेश स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे, तर गावांना पाणी देण्यास माजी महापौर वैजयंती घोलप यांनी विरोध केला आहे. अमृत योजनेंतर्गत केडीएमसीने गावांसाठी ४०० कोटींची पाणीयोजना तयार केली आहे. ती मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ती मंजूर झाल्यास पाण्याच्या वितरणासाठी जलवाहिन्या टाकण्याची गरज आहे. ३७ कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी केडीएमसीने तीन वेळा निविदा मागवल्या. मात्र, गावे महापालिकेत राहणार की वगळणार, याविषयी संभ्रमावस्था असल्याने कंत्राटदार पुढे येत नव्हते. आता पाटील आणि अन्य एकाने निविदा भरली आहे. सध्या निविदांची छाननी सुरू आहे. त्यानंतरच केडीएमसी कंत्राटदार नेमणार आहे. मात्र, पाटील यांनी निविदा प्रक्रियेतून माघार घ्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. भीतीपोटी त्यांनी माघार घेतल्यास रिंगमास्टरच्या मर्जीतल्या कंत्राटदाराची निविदा मंजूर होऊ शकते. तसेच त्यानेही काम न केल्यास ते अर्धवट राहू शकते. या सगळ्या प्रकारामुळे निकोप स्पर्धा न होता जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रिंग करून दमबाजी व दबाव टाकणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे, अशी अपेक्षा रिंगला कंटाळलेल्या कंत्राटदारांकडून केली जात आहे.केडीएमसीची ई-गव्हर्नन्स प्रणाली राज्यात पथदर्शी ठरली आहे. मात्र, ही प्रक्रिया पारदर्शी होत नाही. याबाबत, दोन वर्षांपूर्वी मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही. (प्रतिनिधी)