शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

केडीएमसीत ‘रिंग रिंग रिंगा’

By admin | Updated: March 25, 2017 01:15 IST

२७ गावांत पाणीपुरवठ्यासाठी ३७ कोटी खर्चून जलवाहिनी टाकण्यासाठी केडीएमसीने निविदा मागवल्यावर तिला दोघांनी प्रतिसाद दिला.

कल्याण : २७ गावांत पाणीपुरवठ्यासाठी ३७ कोटी खर्चून जलवाहिनी टाकण्यासाठी केडीएमसीने निविदा मागवल्यावर तिला दोघांनी प्रतिसाद दिला. मात्र, त्यातील एका निविदाधारकाने प्रक्रियेतून माघार घ्यावी, यासाठी त्याला दमबाजी केली जात असल्याचा आरोप झाल्याने पालिकेची ई-टेंडरिंग प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे पुन्हा समोर आले. टेंडरमध्ये पुन्हा रिंग काम करत असल्याचे स्पष्ट आले.२७ गावांतील पाणीप्रश्न बिकट आहे. त्यासाठी तेथील ग्रामस्थ व नागरिक मोर्चे काढत आहेत. महापालिकेच्या योजनेतील पाणी मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच काहीही करा, पण २७ गावांची तहान भागवा, असा आदेश स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे, तर गावांना पाणी देण्यास माजी महापौर वैजयंती घोलप यांनी विरोध केला आहे. अमृत योजनेंतर्गत केडीएमसीने गावांसाठी ४०० कोटींची पाणीयोजना तयार केली आहे. ती मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ती मंजूर झाल्यास पाण्याच्या वितरणासाठी जलवाहिन्या टाकण्याची गरज आहे. ३७ कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी केडीएमसीने तीन वेळा निविदा मागवल्या. मात्र, गावे महापालिकेत राहणार की वगळणार, याविषयी संभ्रमावस्था असल्याने कंत्राटदार पुढे येत नव्हते. आता पाटील आणि अन्य एकाने निविदा भरली आहे. सध्या निविदांची छाननी सुरू आहे. त्यानंतरच केडीएमसी कंत्राटदार नेमणार आहे. मात्र, पाटील यांनी निविदा प्रक्रियेतून माघार घ्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. भीतीपोटी त्यांनी माघार घेतल्यास रिंगमास्टरच्या मर्जीतल्या कंत्राटदाराची निविदा मंजूर होऊ शकते. तसेच त्यानेही काम न केल्यास ते अर्धवट राहू शकते. या सगळ्या प्रकारामुळे निकोप स्पर्धा न होता जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रिंग करून दमबाजी व दबाव टाकणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे, अशी अपेक्षा रिंगला कंटाळलेल्या कंत्राटदारांकडून केली जात आहे.केडीएमसीची ई-गव्हर्नन्स प्रणाली राज्यात पथदर्शी ठरली आहे. मात्र, ही प्रक्रिया पारदर्शी होत नाही. याबाबत, दोन वर्षांपूर्वी मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही. (प्रतिनिधी)