शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी तयार करणार कचऱ्यापासून बायोगॅस

By admin | Updated: January 25, 2016 01:22 IST

कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाकरिता मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळत

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाकरिता मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने कचऱ्यापासून बायोगॅस, खत निर्मिती आणि प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर हे तीन पर्याय महापालिका निवडणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनाकरिता महापालिकेने काय उपाययोजना केली याचा जाब २७ जानेवारीस उच्च न्यायालयात द्यायचा असल्याने प्रशासनाची अक्षरश: धडपड सुरु झाली आहे.कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ५७० मे.ट. कचरा दररोज गोळा होता. महापालिकेत २७ गावे समाविष्ट झाल्याने या गावातून निर्माण होणारा ७० मे.ट. कचऱ्याची वाढ झाली आहे. महापालिकेने घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारा प्रकल्प न उभारल्याने उच्च न्यायालयाने शहरातील नव्या इमारतींच्या बांधकाम परवानगीस एप्रिल २०१५ मध्ये स्थगिती दिली. महापालिका आधारवाडी येथील क्षमता संपलेल्या डंपिंग ग्राऊंडवर प्रक्रिया न करता कचरा टाकते त्याला न्यायालयाने बंदी केली. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत आठवेळा निविदा मागविल्या. यावेळी केवळ एक निविदा प्राप्त झाली असून लवकरच अंतिम फैसला होणार आहे. महापालिकेस बारावे व मांडा या दोन ठिकाणी भरावभूमी तयार करायची आहे. मांडा येथील काही जागाच महापालिकेच्या ताब्यात आहेत. उर्वरित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. बारावेकरीता मागवलेली निविदा २५ जानेवारी रोजी उघडण्यात येणार आहे. उंबर्डे व तिसगांव येथे कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचे दहा टन क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. या निविदेस तीन कंत्राट कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. प्रकल्प उभारण्यासाठी किमान दोन कोटी ५० लाख ते तीन कोटी रुपये खर्च येतो. प्रकल्प सुरु केल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा तीन कोटी रुपये खर्च येतो. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी ५६ टक्के कचरा हा जैव विविध व विघनटशील स्वरुपाच आहे. ५७० शहरातील व २७ गावातील ७० मेट्रीक टन कचरा मिळून एकूण कचरा ६४० मेट्रीक टन गोळा होता. त्यापैकी विघटनशील कचऱ्याचे प्रमाण ५६ टक्के धरले तर ६४० मेट्रीक टन कचऱ्यापैकी ३५० मेट्रीक टन ओला कचरा हा विघटनशील स्वरुपाचा असेल. दहा टन क्षमतेचे किमान ३५ बायोगॅस प्रकल्प उभारावे लागतील. शहरात किमान दहा ते १५ मोकळ््या जागेवर कचऱ्यापासून खत निर्मिती करता येऊ शकते. त्यासाठी फार खर्च नाही. एका ठिकाणी किमान एक लाख खर्च येऊ शकतो. पंधरा जागी राबविण्याचे ठरविल्यास त्याला विघटनशील सुका कचरा आवश्यक असेल. याशिवाय ई वेस्ट गोळा करणारे एक स्टेशन एका कंत्राटदारामार्फत सुरु करण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा मागविली जाणार आहे.