शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षीच्या शेकडो अपघातांमुळे ‘हायवे’ बनलाय ‘डायवे’

By admin | Updated: August 12, 2014 23:20 IST

खड्डे आणि काही ठिकाणी अरूंद असलेले रस्ते यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहनांचे अपघात

सुभाष कदम - चिपळूण-- मुंबई - गोवा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळाच. या महामार्गावर दरवर्षी शेकडो अपघात होत असतात. सन २००० ते एप्रिल २०१४ अखेर महामार्गावर झालेल्या २३४ अपघातात १३७ जणांचा बळी गेला आहे. २०१३मध्ये एकाचवेळी ३७ जणांचा बळी गेला. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा अपघात ठरला आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या मागणीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाली आहे. मुंबई - गोवा महामार्ग पळस्पे रायगडपासून सुरु होतो. परंतु, या महामार्गावर कशेडी घाट हा सर्वांत महत्त्वाचा पॉर्इंट आहे. पोलादपूर ते मोरवंडे (ता. खेड) दरम्यानच्या भागात अपघातांची संख्या मोठी असते. हे क्षेत्र अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यात अनेक जायबंदी होतात. त्यांना आपले हात, पाय व अन्य अवयव गमवावे लागले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल २०१४ अखेर गेल्या १४ वर्षांत महामार्गावर १५३४ अपघात झाले. वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या व अप्रशिक्षित चालकांमुळे महामार्गावर अपघात वाढत आहेत. रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे, दारु पिऊन वाहन चालवल्यामुळे, वेगावर नियंत्रण नसल्यामुळे म्हणजेच हलगर्जीपणामुळे अनेक अपघात झाले आहेत, यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. खेड येथे मार्च २०१३ मध्ये महाकाली ट्रॅव्हल्सच्या चालकाने मद्यपान करुन जगबुडी नदी पुलावर अपघात केला. यामध्ये ३७ जणांचा बळी गेला. ही घटना ताजी आहे. मात्र, यातून एकही चालक बोध घेत नाही. घरी आपली कोणी तरी वाट पाहात आहे, याची जाणीव त्यांना नसते. या महामार्गाचा पळस्पे ते पात्रादेवी असा विस्तार आहे. त्यातील पळस्पे ते इंदापूर हा ८४ किमीचा रस्ता व झाराप ते पात्रादेवी २१.५० किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. कशेडी ते पत्रादेवी या २१३ किलोमीटरच्या अंतरात ११ मोठे पूल व ४१ लहान पूल आहेत. अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होतात. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांसह माजी खासदार नीलेश राणे व विविध संघटनांनी पाठपुरावा केल्याने आता पुढील कामाला गती मिळाली आहे. इंदापूर ते कशेडी, कशेडी पायथा ते ओझरखोल, ओझरखोल ते राजापूर, राजापूर ते झाराप असे चौपदरीकरणाचे टप्पे आहेत. या महामार्गाच्या भूसंपादनाचे काम, महामार्गात येणाऱ्या दूरध्वनी व विद्युत वाहिन्या हटविण्याचे कामही सुरु झाले आहे. त्यामुळे लवकरच महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील मोठे पूल नदी वर्ष लांबी (मीटर) रुंदी (मीटर)जगबुडी १९३१११८ ६.१० वाशिष्ठी१९४३ ७३ ६वाशिष्ठी १९४३ ७३ ६ आरवली १९३२ ७३ १२ शास्त्रीपूल१९३९ ८३.५ ६.४० सोनवी १९७९ ६२ ५.७० सप्तलिंगी १९२५ ६५७.५० बावनदी १९३१ ९८ ६.६० अंजणारी १९३३ ६३ ९ वाकेड १९४० ६३ ८ राजापूर १९४७ १०० ५.४० -पळस्पे ते पत्रादेवीपर्यंतचा महामार्ग अवघड वळणावळणाचा.-महामार्गावर आहेत अवघड घाट रस्ते. -११ मोठे पूल. तर ४१ लहान पुलांचा समावेश-५२ पुलांपैकी ५ पूल अरुंद. -दरवर्षी जातात शेकडो बळी, तर हजारो होतात -चौपदरीकरणाच्या कामाला केंद्राचा हिरवा कंदील.1मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे आणि काही ठिकाणी अरूंद असलेले रस्ते यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहनांचे अपघात अशा घटना घडत आहेत.2खेडमध्ये २०१३मध्ये जगबुडी नदीवर झालेल्या अपघातात ३७जणांचा झालेला मृत्यू हा महामार्गावरचा सर्वात मोठा अपघात ठरला आहे. अरूंद पुल आणि त्यावरून हाराकिरीने चालवली जाणारी वाहने, हा नित्याचाच विषय ठरला आहे.