शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

२० वर्षात गेले १७५ बळी

By admin | Updated: August 5, 2015 00:35 IST

ठाणे महापालिकेने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींपैकी ३६ इमारतींवर पाडकाम कारवाई सुरुवात केली असली तरी मागील

अजित मांडके, ठाणे ठाणे महापालिकेने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींपैकी ३६ इमारतींवर पाडकाम कारवाई सुरुवात केली असली तरी मागील २० वर्षात शहरात विविध ठिकाणी १४ इमारत दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये आतापर्यंत १७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर १३७ जण जखमी झाले असून यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. परंतु या इमारती का उभ्या राहतात, त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे शहरात दरवर्षी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची संख्या ही वाढतच असून भय इथले संपत नाही, नव्हे तर ‘भय इथले कधीच संपणार नाही’ असे म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर ओढवली आहे. अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल त्यांच्याकडून होऊ लागला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत अथवा धोकादायक इमारतींचा प्रश्न हा आजचा नाही, मागील २० वर्षे या शहराला अशा इमारतींचा प्रश्न भेडसावत आहे. १४ डिसेंबर १९९५ रोजी ठाण्यात पहिली इमारत दुर्घटना घडली. ती सुद्धा मुंब्य्रातील रशिद कंपाऊंड परिसरात. या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले होते. त्यानंतर वागळे इस्टेट भागात ०७ नोव्हेंबर १९९८ मध्ये साईराज इमारत दुर्घटना घडली. यामध्ये १६ जणांचा बळी जाऊन १४ जण जखमी झाले होते. दरम्यान अशा इमारत दुर्घटना घडत असतांनाच ४ एप्रिल २०१३ रोजी, मुंब्य्रात लकी कंपाऊंडमध्ये केवळ सात महिन्यात उभारण्यात आलेली सात मजली इमारत कोसळून तब्बल ७४ जणांचा बळी गेला आणि ५६ जण जखमी झाले होते. त्यानंतर पालिका प्रशासन, वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य म्हणजे राजकीय मंडळी खडबडून जागे झाले आणि त्यांनी ठाण्यासाठी क्लस्टर लागू करा अशी मागणी रेटून धरली. यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही झाली. मागील वर्षी ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्यासाठी क्लस्टर लागू केले. परंतु अंमलबजावणी मात्र झाली नाही.ही चर्चा आता केवळ पावसाळ्यापुरती मर्यादीत राहिली असून, पावसाळा संपला की पुढील पावसाळ्यापर्यंत यावर सर्व पक्षीय नेत्यांचे मौन असते. परंतु, यामुळे ठाण्यात इमारत कोसळण्याच्या दुर्घटना वाढतच असून याला जबाबदार कोण आणि किती बळी घेणार असा सवाल मात्र या निमित्ताने ठाणेकर उपस्थित करु लागले आहेत.