शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पर्यावरण संचालक ‘हाजीर हो!’

By admin | Updated: May 24, 2016 02:15 IST

डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील औद्योगिक कारखान्यांतून होत असलेल्या प्रदूषणप्रकरणी केंद्रीय वन व पर्यावरण विभागाच्या संचालकांनी २७ मे रोजी रोजी राष्ट्रीय हरित लवादासमोर

डोंबिवली : डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील औद्योगिक कारखान्यांतून होत असलेल्या प्रदूषणप्रकरणी केंद्रीय वन व पर्यावरण विभागाच्या संचालकांनी २७ मे रोजी रोजी राष्ट्रीय हरित लवादासमोर हजर राहावे, असे आदेश लवादाने दिले आहेत.डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यांतील रासायनिक कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रित पाण्यावर निकषांप्रमाणे प्रक्रिया न करता ते थेट उल्हास नदी, कल्याण खाडी आणि वालधुनी नदीत सोडले जाते. निकषांची पूर्तता सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून केली जात नाही. त्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे दुर्लक्ष होत असल्याने ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे नोव्हेंबर २०१३ मध्ये याचिका दाखल केली. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. लवादाने वारंवार होणाऱ्या सुनावणीदरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या थंड कारभारावर ताशेरे ओढले होते. तसेच विविध संस्थांना प्रदूषणप्रकरणी १०० कोटींचा दंड ठोठावला. दंडाचा वादही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. त्याची सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अपेक्षित आहे. कारखान्यांतून प्रदूषण होत असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्य केल्यावर लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बंद करावे. त्याचा कारभार केंद्राने ताब्यात घ्यावा, असे आदेश दिले होते. या कारवाईचा अहवाल केंद्रीय प्रदूषण मंडळाने २९ एप्रिलच्या सुनावणीच्या वेळी सादर करण्यास लवादाने स्पष्ट केले होते. मात्र, हा अहवाल सादर न केल्याने लवादाने नाराजी व्यक्त करीत १० दिवसांत कारवाई करण्याची मुदत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास दिली होती. तसेच केंद्रीय वन व पर्यावरण विभागाच्या संचालकांना १० कोटींचा दंड व तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्याचा गंभीर इशारा दिला होेता. मात्र, संचालकांनी १९ मे रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी लवादाला कारवाईचा अहवाल सादर करण्याऐवजी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावर लवादाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. प्रतिज्ञापत्राद्वारे प्रदूषण नियंत्रण मंडळास तीन महिन्यांचा अवधी द्यावा. त्यात सुधारणा होईल, असा आशावाद व्यक्त केला होता. प्रत्यक्षात प्रदूषण रोखण्याचे काम ४० वर्षांत झाले नाही. ते तीन महिन्यांत कसे होईल, असा सवाल लवादाने केला. त्यावर समोरच्या मंडळींची बोलतीच बंद झाली. सुनावणीकडे लक्ष : २७ मे रोजी संचालक स्वत: लवादासमोर हजार राहून काय बाजू मांडणार, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, वनशक्ती आणि संबंधित कंपन्यांचे लक्ष लागले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी काय कार्यवाही केली जाणार आहे, त्याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागणार आहे. त्यांची बाजू लवादाने मान्य न केल्यास लवादाने सूचित केलेल्या आधीच्या आदेशानुसार त्यांना प्रदूषणप्रकरणी १० कोटींचा दंड व तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले.