शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

केंद्रीय पर्यावरण संचालक ‘हाजीर हो!’

By admin | Updated: May 24, 2016 02:15 IST

डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील औद्योगिक कारखान्यांतून होत असलेल्या प्रदूषणप्रकरणी केंद्रीय वन व पर्यावरण विभागाच्या संचालकांनी २७ मे रोजी रोजी राष्ट्रीय हरित लवादासमोर

डोंबिवली : डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील औद्योगिक कारखान्यांतून होत असलेल्या प्रदूषणप्रकरणी केंद्रीय वन व पर्यावरण विभागाच्या संचालकांनी २७ मे रोजी रोजी राष्ट्रीय हरित लवादासमोर हजर राहावे, असे आदेश लवादाने दिले आहेत.डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यांतील रासायनिक कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रित पाण्यावर निकषांप्रमाणे प्रक्रिया न करता ते थेट उल्हास नदी, कल्याण खाडी आणि वालधुनी नदीत सोडले जाते. निकषांची पूर्तता सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून केली जात नाही. त्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे दुर्लक्ष होत असल्याने ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे नोव्हेंबर २०१३ मध्ये याचिका दाखल केली. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. लवादाने वारंवार होणाऱ्या सुनावणीदरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या थंड कारभारावर ताशेरे ओढले होते. तसेच विविध संस्थांना प्रदूषणप्रकरणी १०० कोटींचा दंड ठोठावला. दंडाचा वादही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. त्याची सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अपेक्षित आहे. कारखान्यांतून प्रदूषण होत असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्य केल्यावर लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बंद करावे. त्याचा कारभार केंद्राने ताब्यात घ्यावा, असे आदेश दिले होते. या कारवाईचा अहवाल केंद्रीय प्रदूषण मंडळाने २९ एप्रिलच्या सुनावणीच्या वेळी सादर करण्यास लवादाने स्पष्ट केले होते. मात्र, हा अहवाल सादर न केल्याने लवादाने नाराजी व्यक्त करीत १० दिवसांत कारवाई करण्याची मुदत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास दिली होती. तसेच केंद्रीय वन व पर्यावरण विभागाच्या संचालकांना १० कोटींचा दंड व तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्याचा गंभीर इशारा दिला होेता. मात्र, संचालकांनी १९ मे रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी लवादाला कारवाईचा अहवाल सादर करण्याऐवजी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावर लवादाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. प्रतिज्ञापत्राद्वारे प्रदूषण नियंत्रण मंडळास तीन महिन्यांचा अवधी द्यावा. त्यात सुधारणा होईल, असा आशावाद व्यक्त केला होता. प्रत्यक्षात प्रदूषण रोखण्याचे काम ४० वर्षांत झाले नाही. ते तीन महिन्यांत कसे होईल, असा सवाल लवादाने केला. त्यावर समोरच्या मंडळींची बोलतीच बंद झाली. सुनावणीकडे लक्ष : २७ मे रोजी संचालक स्वत: लवादासमोर हजार राहून काय बाजू मांडणार, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, वनशक्ती आणि संबंधित कंपन्यांचे लक्ष लागले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी काय कार्यवाही केली जाणार आहे, त्याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागणार आहे. त्यांची बाजू लवादाने मान्य न केल्यास लवादाने सूचित केलेल्या आधीच्या आदेशानुसार त्यांना प्रदूषणप्रकरणी १० कोटींचा दंड व तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले.