शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

एप्रिलपासून अंगणवाड्या बंद

By admin | Updated: January 12, 2017 05:59 IST

स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या आणि कॅशलेसच्या गप्पा मारणारे सरकार अजूनही आदिवासी बालकांचे कुपोषण थांबविण्याबाबत

हितेन नाईक / पालघरस्मार्ट, डिजिटल इंडियाच्या आणि कॅशलेसच्या गप्पा मारणारे सरकार अजूनही आदिवासी बालकांचे कुपोषण थांबविण्याबाबत संवेदनशील नाही. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर ही आश्वासनापलिकडे हाती काही पडत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी श्रमजीवीने जिल्हा परिषदेवर काढलेल्या मोर्चात येत्या दोन महिन्यात उपाययोजना न झाल्यास १ एप्रिल पासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद करण्याचा इशारा दिला.पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून शासनाने घोषित केल्याला आज अडीच वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर हि जिल्ह्यात रोजगार, कुपोषण, आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न भेडसावत आहेत. हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम प्रत्यक्ष गावपातळी वरून राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर, गट प्रवर्तक हे जीवतोडून कामे करीत असतात. परंतु त्यांना कामाचा योग्य मोबदला न देता अल्प मानधनावर कंत्राटी पद्धतीने राबविले जाते. समान काम समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी ही केली जात नाही. याबाबत यापुढे कोणतीही चालढकल सहन केली जाणार नाही असा इशारा देऊन अंगणवाडी सेविकांच्या आणि इतर घटकांच्या मागण्या ३१ मार्चपर्यंत मान्य झाल्या नाही तर १ एप्रिल पासून पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाड्याचे काम बंद करतील, असा गंभीर इशारा विवेक पंडित यांनी आज दिला. यावेळी अस्थायी बीएएमएस डॉक्टरांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. या मोर्चात श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, दिनेश पवार, सरिता जाधव, पुतळा कदम, अंगणवाडी सेविका प्रतिनिधी सीता घाटाळ, रेखा धांगडे, कैलास तुंबडा यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता. (वार्ताहर)सीईओ अनुपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना साकडे जुलै २०१६ पासून अंगणवाडी मध्ये शिजविल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा निधी मिळालेला नाही, मानधन अत्यंत तुटपुंजे ते ही वेळेवर मिळत नाही. एका पाठोपाठ एक जबाबदारी लादून कंत्राटी घटकांना राबवले जाते याचा पंडित यांनी तीव्र शब्दात निषेध केला. मोर्चात अंगणवाडी सेविका, मदतनीस, गट प्रवर्तक, वाहन चालक, सफाई कामगार, हिवताप कर्मचारी, आशा वर्कर यासह सर्व घटक मोर्चात सहभागी होता. त्यांच्या प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केलीत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी उपस्थित नसल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले.