शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलपासून अंगणवाड्या बंद

By admin | Updated: January 12, 2017 05:59 IST

स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या आणि कॅशलेसच्या गप्पा मारणारे सरकार अजूनही आदिवासी बालकांचे कुपोषण थांबविण्याबाबत

हितेन नाईक / पालघरस्मार्ट, डिजिटल इंडियाच्या आणि कॅशलेसच्या गप्पा मारणारे सरकार अजूनही आदिवासी बालकांचे कुपोषण थांबविण्याबाबत संवेदनशील नाही. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर ही आश्वासनापलिकडे हाती काही पडत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी श्रमजीवीने जिल्हा परिषदेवर काढलेल्या मोर्चात येत्या दोन महिन्यात उपाययोजना न झाल्यास १ एप्रिल पासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद करण्याचा इशारा दिला.पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून शासनाने घोषित केल्याला आज अडीच वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर हि जिल्ह्यात रोजगार, कुपोषण, आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न भेडसावत आहेत. हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम प्रत्यक्ष गावपातळी वरून राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर, गट प्रवर्तक हे जीवतोडून कामे करीत असतात. परंतु त्यांना कामाचा योग्य मोबदला न देता अल्प मानधनावर कंत्राटी पद्धतीने राबविले जाते. समान काम समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी ही केली जात नाही. याबाबत यापुढे कोणतीही चालढकल सहन केली जाणार नाही असा इशारा देऊन अंगणवाडी सेविकांच्या आणि इतर घटकांच्या मागण्या ३१ मार्चपर्यंत मान्य झाल्या नाही तर १ एप्रिल पासून पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाड्याचे काम बंद करतील, असा गंभीर इशारा विवेक पंडित यांनी आज दिला. यावेळी अस्थायी बीएएमएस डॉक्टरांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. या मोर्चात श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, दिनेश पवार, सरिता जाधव, पुतळा कदम, अंगणवाडी सेविका प्रतिनिधी सीता घाटाळ, रेखा धांगडे, कैलास तुंबडा यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता. (वार्ताहर)सीईओ अनुपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना साकडे जुलै २०१६ पासून अंगणवाडी मध्ये शिजविल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा निधी मिळालेला नाही, मानधन अत्यंत तुटपुंजे ते ही वेळेवर मिळत नाही. एका पाठोपाठ एक जबाबदारी लादून कंत्राटी घटकांना राबवले जाते याचा पंडित यांनी तीव्र शब्दात निषेध केला. मोर्चात अंगणवाडी सेविका, मदतनीस, गट प्रवर्तक, वाहन चालक, सफाई कामगार, हिवताप कर्मचारी, आशा वर्कर यासह सर्व घटक मोर्चात सहभागी होता. त्यांच्या प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केलीत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी उपस्थित नसल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले.